शहरं
Join us  
Trending Stories
1
१० टक्के पगारवाढ राहुद्या...! दिवाळी दोन दिवसांवर आली, NHM कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांपासून पगारच नाही...
2
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला
3
IND vs WI : दिल्लीच्या बालेकिल्ल्यात टीम इंडियाचा मोठा पराक्रम! दक्षिण आफ्रिकेच्या वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी
4
Cough Syrup : मोठा खुलासा! १०% कमिशनच्या नादात २३ मुलांचा मृत्यू; कफ सिरपसाठी डॉक्टरला मिळायचे पैसे
5
IND vs WI : KL राहुलचं नाबाद अर्धशतक; कसोटीत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकली पहिली ट्रॉफी
6
बिहार निवडणूक: तेजस्वी यादव काँग्रेससोबतच्या बैठकीतून निघून आले; राहुल गांधी, खर्गेंना न भेटताच बिहारला पोहोचले...
7
बँकांच्या मागण्यांना कंटाळला विजय मल्ल्या; म्हणाला,"माझ्याकडून पैसे मागणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे," भारतातच प्रकरण मिटवण्याची दिली ऑफर
8
ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का! पहिल्याच वन-डेमधून 'हे' दोन महत्त्वाचे खेळाडू बाहेर; भारतीय संघाने टाकला सुटकेचा नि:श्वास...
9
ईपीएफओने पैसे काढण्यासंबंधी तब्बल १३ नियम बदलले; आता संपूर्ण शिल्लक काढता येणार नाही
10
दिवाळीच्या साफसफाईत आईला सापडला 'खजिना'; २ हजारांच्या तब्बल २ लाखांच्या नोटा, पण...
11
शांततेचे दूत! ट्रम्प यांच्यासाठी शाहबाज शरीफ यांच्याकडून नोबेलची मागणी; मेलोनींनी तोंडावर ठेवला हात
12
Diwali 2025: वास्तुशास्त्रानुसार दिवाळीत 'या' सहा वस्तू कोणाकडून भेट घेऊ नका आणि देऊही नका!
13
LG Electronics IPO Listing: बंपर लिस्टिंग, शेअर बाजारात एन्ट्री घेताच प्रत्येक शेअरवर ₹५७५ चा फायदा; एलजी आयपीओनं केलं मालामाल
14
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ‘मोदी चांगले मित्र आहेत’; बाजूलाच उभे असलेले पाकिस्तानचे शाहबाज शरीफ अवाक, व्हिडीओ व्हायरल
15
दिवाळी २०२५: धन-सुख-समृद्धीची इच्छा पूर्ण होईल, ‘अशी’ करा लक्ष्मी आगमनाची तयारी; शुभच घडेल!
16
दिवाळी २०२५ धमाका: या स्मार्टफोनवर मिळतोय मोठा डिस्काउंट! तुम्ही घेण्याच्या विचारात असाल तर... 
17
नेपाळनंतर 'Gen-Z' ने या देशातील सत्ता घालवली; राष्ट्रपती देश सोडून पळून गेले
18
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, निफ्टीमध्ये ७० अंकांची तेजी; IT आणि मेटल शेअर्स सुस्साट
19
Swami Samartha: पुष्य नक्षत्रावर सुरु करा स्वामीभक्ती, अध्यात्मात मिळेल गती, आयुष्यात होईल दुप्पट प्रगती!
20
५०० वर्षांनी हंस केंद्र त्रिकोण राजयोग: ९ राशींना बोनस, अकल्पनीय लाभ; भाग्योदय-पैसा-भरभराट!

१३ जागांसाठी १७ उमेदवार रिगणात

By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST

पंचगंगा साखर कारखाना निवडणूक : ‘ब’ वर्ग संस्था गटातून बंडा माने बिनविरोध

इचलकरंजी : येथील पंचगंगा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज, अंतिम दिवशी उत्पादक गटातील १२ जागांसाठी १७ उमेदवार व ‘ब’ वर्ग अनुत्पादक व्यक्ती गटाच्या जागेसाठी दोन उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. परिणामी दोन्ही गटांच्या निवडणुकीसाठी २४ जानेवारीला मतदान होणार आहे.‘ब’ वर्ग अनुत्पादक संस्था गटामध्ये बंडा आप्पा माने यांचा एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे माने यांची निवड बिनविरोध झाली. या गटातून पी. एम. पाटील यांनी माघार घेतली. ‘अ’ वर्ग उत्पादक गटात विद्यमान अध्यक्ष पी. एम. पाटील यांच्या पॅनेलच्या उमेदवारांमध्ये अध्यक्ष पाटील (कबनूर), कुमार खूळ (रुई), धनगोंडा पाटील (कोथळी), जयपाल कुंभोजे (गौरवाड), एम. आर. पाटील (लाट), जिवनधर पाटील (बोरगाव), कल्लू पिराई (पट्टणकोडोली), सुनील तोरगल (सदलगा) हे सर्व विद्यमान संचालक, रावसाहेब भगाटे (नांदणी), प्रताप नाईक (घालवाड), लक्ष्मण निंबाळकर (हेर्ले) व राजगोंडा पाटील (टाकवडे) या नवीन चेहऱ्यांचा समावेश आहे. याच गटात विरोधी मगदूम गटातून माजी अध्यक्षा रजनीताई मगदूम (निमशिरगाव), रमेश चौगुले (चिंचवाड), बाबूराव सादळकर (ढोणेवाडी), नारायण कांबळे (शिरदवाड) व सातगोंडा पाटील (जांभळी) हे निवडणूक लढवीत आहेत.‘ब’ वर्ग व्यक्ती गटात पाटील पॅनेलचे दिलीप महाजन (माणगाव) विरुद्ध मगदूम गटाचे सुकुमार गडगे (इचलकरंजी) यांच्यात लढत होईल. ‘अ’ वर्ग व ‘ब’ वर्ग अशा स्वतंत्र मतदान पत्रिका असून, कारखाना कार्यस्थळावर रत्नदीप हायस्कूलमध्ये २९ मतदान केंद्रांवर २४ जानेवारीला मतदान होईल, तर २५ जानेवारीला मतमोजणी व निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक अधिकारी डॉ. महेश कदम व सहायक निवडणूक अधिकारी सुनील धायगुडे यांनी दिली. बहुराज्य सहकार कायद्याप्रमाणे निवडणुकीची घोषणा उद्या, बुधवारी होणाऱ्या सभेत करण्यात येईल. (प्रतिनिधी)समझोत्याचा प्रयत्न निष्फळपंचगंगा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, याकरिता सत्तारूढ पाटील पॅनेलकडून चिकाटीने प्रयत्न करण्यात आले. कोल्हापूर येथील एका विद्यमान आमदाराचा ‘विरोधी मगदूम गटाबरोबर समझोता करा’, असा निरोप सत्तारुढांना आल्याने उमेदवारी माघार घेण्याची मुदत तीन वाजता संपली असली, तरी सायंकाळी सहा वाजेपर्यंत केलेले प्रयत्न हेकेखोरपणामुळे निष्फळ ठरले.