शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
4
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
5
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
6
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
7
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
8
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
9
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
10
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
11
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
12
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
13
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
14
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
15
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
16
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
17
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
18
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
19
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
20
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची

१७ अधिकाऱ्यांना दिलासा

By admin | Updated: January 13, 2015 00:50 IST

मनपा भरती : कर्मचारी संघटनेची न्यायालयातून माघार; पडद्यामागे घडल्या घडामोडी

कोल्हापूर : औद्योगिक न्यायालयाने महापालिकेने १५ एप्रिल २००२ ला सरळ सेवा भरतीद्वारे केलेल्या १७ अधिकाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ दाखविण्याचे आदेश दिले. त्यानंतर ‘त्या’ अधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेत आदेशाला स्थगिती मिळविली. याबाबत आज, सोमवारी न्यायालयात सुनावणीदरम्यान तक्रारदार कर्मचारी संघटनेने माघार पत्र सादर केले. संपूर्ण प्रकरणालाच आता कलाटणी मिळणार असल्याने अधिकाऱ्यांनी सुस्कारा टाकला.महापालिकेने २००२ मध्ये आदेशाद्वारे २४ अधिकाऱ्यांची सरळ सेवेद्वारे भरती केली होती. त्यामध्ये मुख्य लेखपाल संजय सरनाईक, दिवाकर कारंडे, शर्मिली भांडवले, प्रशांत पंडत, सचिन जाधव, उमाकांत कांबळे, विलास साळोखे आदींचा समावेश आहे. २४ पैकी तीन अधिकारी मयत आहेत तर चार लोक हजरच झाले नाहीत. कर्मचारी संघटनेने या अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला आव्हान देत औद्योगिक न्यायालयातून सेवा संपुष्टात आणण्याचा आदेश आणला. त्यास उच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती आदेश दिले असले तरी, त्यामुळे सेवेत असलेल्या १७ अधिकाऱ्यांच्या नोकरीचा प्रश्न निर्माण झाला होता. थेट वरिष्ठ लिपिक किंवा अधीक्षक पदावर हे कर्मचारी रूजू झाले होते. सध्या यातील बहुतांश कर्मचारी आता ‘प्रभारी अधिकारी’ म्हणून कित्येक वर्षे सेवा बजावत आहेत. कर निर्धारण व संग्राहक अधिकारी, विधि विभागप्रमुख, पाणीपट्टी अधीक्षक, पवडी लेखपाल, सीएफसी प्रमुख, मुख्य लेखपाल, आदी उच्च पदांवर हे कर्मचारी ‘प्रभारी’ म्हणून आहेत. औद्योगिक न्यायालयाच्या दणक्याने या प्रभारींत अस्वस्थता पसरली होती. उच्च न्यायालयानेही औद्योगिक न्यायालयाचा निर्णय कायम राखल्यास घरी जाण्याशिवाय या अधिकाऱ्यांसमोर पर्याय नव्हता. तक्रारदार संघटनेने न्यायिक प्रक्रियेतून माघार घेतल्याने या अधिकाऱ्यांची नोकरी कायम राहणार आहे. (प्रतिनिधी)५हातमिळवणीची चर्चामहापालिकेत अनेक ज्येष्ठांना डावलून अनेकांची प्रभारीपदी वर्णी लागली. रोस्टरप्रमाणे हक्क असूनही कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला. महापालिका कायद्यातील पळवाट शोधत ‘प्रभारी’ झालेले पूर्वी कार्यालयात कनिष्ठ पदांवरच कार्यरत होते. त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या भरती प्रक्रियेला कर्मचारी संघटनेने न्यायालयात आव्हान दिले होते. या भरतीमुळे इतर कर्मचाऱ्यांवर अन्याय झाल्याने संघटना न्यायालयात गेली होती. अपेक्षित निकाल टप्प्यात असताना संघटनेच्या नेत्यांनी न्यायालयातून माघार घेतली. या माघारीमागे झालेल्या हातमिळवणीबाबत महापालिकेत जोरदार चर्चा सुरू आहे.