शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Radhanagari Dam : सहा तासांत गेले तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून, तरीही भासणार नाही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 13:08 IST

राधानगरी धरणात काल, बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दुपारी हाच साठा ६.६८ पर्यंत खाली आला.

कोल्हापूर : सर्व्हिस गेटची अडचण आल्याने राधानगरीधरणातून सहा तासांत तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून गेले आहे. १ एफसीएफटी म्हणजे १० लाख घनफूट धरले तर १६ कोटी ६० लाख घनफूट पाणी भोगावती, पंचगंगा, कृष्णा असे करत थेट अलमट्टी धरणात जाऊन पोहचणार आहे. ०.२४ टीएमसी पाणी कमी झाले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अतिरिक्तच असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा फारसा प्रश्न येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

राधानगरी धरणातील सर्व्हिस गेटची दुरुस्ती सुरू असताना सकाळी अचानक अपघात होऊन पाण्याचा मोठा प्रवाह सांडव्यावरून थेट भोगावती नदीपात्रात कोसळू लागला. ही घटना सकाळी सव्वा नऊवाजता घडली आणि दुपारी सव्वातीन वाजता पाणी बाहेर पडणे बंद झाले. जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर यावर यश मिळवले, पण तोपर्यंत १६६ एमसीएफटी एवढे पाणी धरणातून निघून गेले होते.

राधानगरी धरणात बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दुपारी हाच साठा ६.६८ पर्यंत खाली आला. त्यातील ०.२४ टीमएमसी अर्थात १६६ एमसीएफटी पाणी वाहून गेल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी याच महिन्यात धरणात ६.४८ टीएमसी पाणी शिल्लक होते, आता ते ६.६८ राहिल्याने पाणीसाठ्यावर फार मोठा परिणाम होणार नाही. मुळातच यावर्षी अवकाळी पाऊस डिसेंबरपर्यंत पडत राहिल्याने धरणात अतिरिक्तच पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा अजूनही ०.२० टीएमसी पाणी धरणात जास्त आहे, त्यामुळे पाणी वाहून गेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे, भविष्यात मोठी पाणीटंचाई जाणवणार आहे, यापैकी काहीही घडणार नाही.

  • एमसीएफटी म्हणजे १ दशलक्ष अर्थात १० लाख घनफूट पाणी
  • घनफूट प्रतिसेंकद म्हणजे एक क्यूबिक
  • घनफूट म्हणजे २८ हजार ३१७ लिटर पाणी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण