शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
3
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
4
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
5
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
6
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
7
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
8
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
9
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
10
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
11
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
12
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
13
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
14
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
15
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
16
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
17
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
18
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
19
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
20
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

Radhanagari Dam : सहा तासांत गेले तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून, तरीही भासणार नाही पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 13:08 IST

राधानगरी धरणात काल, बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दुपारी हाच साठा ६.६८ पर्यंत खाली आला.

कोल्हापूर : सर्व्हिस गेटची अडचण आल्याने राधानगरीधरणातून सहा तासांत तब्बल १६६ एफसीएफटी पाणी वाहून गेले आहे. १ एफसीएफटी म्हणजे १० लाख घनफूट धरले तर १६ कोटी ६० लाख घनफूट पाणी भोगावती, पंचगंगा, कृष्णा असे करत थेट अलमट्टी धरणात जाऊन पोहचणार आहे. ०.२४ टीएमसी पाणी कमी झाले तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत ते अतिरिक्तच असल्याने भविष्यातील पाणीटंचाईचा फारसा प्रश्न येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाचे म्हणणे आहे.

राधानगरी धरणातील सर्व्हिस गेटची दुरुस्ती सुरू असताना सकाळी अचानक अपघात होऊन पाण्याचा मोठा प्रवाह सांडव्यावरून थेट भोगावती नदीपात्रात कोसळू लागला. ही घटना सकाळी सव्वा नऊवाजता घडली आणि दुपारी सव्वातीन वाजता पाणी बाहेर पडणे बंद झाले. जलसंपदा विभागाच्या यंत्रणेने तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर यावर यश मिळवले, पण तोपर्यंत १६६ एमसीएफटी एवढे पाणी धरणातून निघून गेले होते.

राधानगरी धरणात बुधवारी सकाळी ८ वाजता ६.९२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. दुपारी हाच साठा ६.६८ पर्यंत खाली आला. त्यातील ०.२४ टीमएमसी अर्थात १६६ एमसीएफटी पाणी वाहून गेल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या वर्षी याच महिन्यात धरणात ६.४८ टीएमसी पाणी शिल्लक होते, आता ते ६.६८ राहिल्याने पाणीसाठ्यावर फार मोठा परिणाम होणार नाही. मुळातच यावर्षी अवकाळी पाऊस डिसेंबरपर्यंत पडत राहिल्याने धरणात अतिरिक्तच पाणीसाठा होता. गतवर्षीपेक्षा अजूनही ०.२० टीएमसी पाणी धरणात जास्त आहे, त्यामुळे पाणी वाहून गेल्याने फार मोठे नुकसान झाले आहे, भविष्यात मोठी पाणीटंचाई जाणवणार आहे, यापैकी काहीही घडणार नाही.

  • एमसीएफटी म्हणजे १ दशलक्ष अर्थात १० लाख घनफूट पाणी
  • घनफूट प्रतिसेंकद म्हणजे एक क्यूबिक
  • घनफूट म्हणजे २८ हजार ३१७ लिटर पाणी
टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीDamधरण