शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
3
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
4
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
5
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
6
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
7
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
8
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
9
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
10
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
11
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
12
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
13
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
14
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
15
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
16
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
18
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
19
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
20
'आता मतदार काय ते ठरवतील', विरोध करूनही दिलीप मानेना प्रवेश, सुभाष देशमुखांचा भाजपला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

विकास सेवा संस्थांचे काम गतिमान होणार, संगणकीकरणासाठी १५३ कोटींची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 17:37 IST

गावपातळीवरील या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर कृषी कर्ज पुरवठा करण्याचे काम गेले अनेक वर्षे या संस्थांच्या माध्यमातून होत आले आहे.

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यातील प्राथमिक कृषी पतपुरवठा म्हणजेच विकास सेवा संस्थांच्या संगणकीकरणासाठी १५३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ योजनेंतर्गत हा प्रकल्प हाती घेण्यात आला असून तो पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.राज्यातील शेतकऱ्यांना कृषी कर्ज पुरवठा करण्यात त्रिस्तरीय सहकारी पतपुरवठा संरचनेची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. गावपातळीवरील या विविध कार्यकारी सेवा संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर कृषी कर्ज पुरवठा करण्याचे काम गेले अनेक वर्षे या संस्थांच्या माध्यमातून होत आले आहे.केंद्र सरकारने २९ जून २०२२ रोजी केंद्रपुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचा संगणकीकरण कार्यक्रम जाहीर केला असून त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिला आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाने आपल्या हिश्श्याचे १५३ कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यात ३१ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अंतर्गत असलेल्या २० हजार ९८६ सेवा संस्था कार्यरत आहेत. यातील १२ हजार संस्थांचे पहिल्या टप्प्यात संगणकीकरण होणार आहे.या संस्थांच्या माध्यमातून सभासदांना संगणकीय तंत्रज्ञानाच्या आधारे विविध सेवा पुरवण्याचा शासनाचा मानस असून यामुळे वार्षिक हिशोब, सुलभ कर्ज पुरवठा, निर्दोष कर्ज वसुली आणि गैरकारभारावर नियंत्रण यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

राज्यातील कृषी कर्ज पुरवठा

सन                 शेतकरी संख्या            झालेला पीक कर्ज पुरवठा२०२१/२२      ५४ लाख ४ हजार         ४८ हजार ९०८ कोटी रुपये[यातील १८ हजार ४१७ कोटी रुपयांचा कर्जपुरवठा सेवा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आला आहे. याचाच अर्थ ६० टक्के शेतकरी या कर्जासाठी प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांवर अवलंबून आहेत.]            

सध्या कर्ज पुरवठ्यापासून ते वसुलीपर्यंतची सर्व माहिती संकलित करताना मनुष्यबळाचा वापर होता. त्यामुळे माहिती संकलनामध्ये विलंब होतो. सेवा संस्थांच्या संगणकीकरणामुळे ही माहिती विनाविलंब मिळेल. त्यामध्ये एकवाक्यता राहील. महत्त्वाचे म्हणजे रोजची माहिती रोजच भरावी लागणार असल्यामुळे गैरकारभारावरही नियंत्रण येऊ शकेल. -डॉ. ए. बी. माने, मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक, कोल्हापूर

टॅग्स :kolhapurकोल्हापूर