शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
3
उल्हासनगरला पावसाने झोडापले, नाल्यावरील पूल कोसळला 
4
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
5
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
6
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
7
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
8
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
9
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
10
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
11
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
12
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
13
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
14
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
15
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
16
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
17
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
18
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
19
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
20
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू

कोल्हापुरातील इंटरनेट सेवा बंदमुळे १५ हजार कर्मचारी बसून, आयटी क्षेत्राचे १० कोटींचे नुकसान

By संदीप आडनाईक | Updated: June 9, 2023 11:44 IST

कर्मचाऱ्यांना आता शनिवारी सुटीच्या दिवशी कामावर यावे लागणार

संदीप आडनाईककोल्हापूर : कोल्हापूर बंदला हिंसक वळण लागल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा ३१ तासांसाठी खंडित करण्यात आली होती. याचा फटका कोल्हापुरातील आयटी क्षेत्राला बसला. यामुळे या क्षेत्राचे सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. कोल्हापुरात वर्क फ्रॉम होमनुसार काम करणाऱ्या सुमारे १५ हजार कर्मचाऱ्यांना सक्तीने घरी बसावे लागले.कोल्हापुरात बुधवारच्या हिंसक घडामोडीनंतर जिल्हा प्रशासनाने ३१ तासांसाठी इंटरनेट सेवा खंडित केली. मात्र याचा अनेक व्यवसायांवर परिणाम झाला. कोल्हापुरातील हॉकी स्टेडियम परिसरातील आयटी पार्कमध्ये असलेल्या विविध कंपन्यांच्या शिफ्ट पहाटे तीन वाजल्यापासून सुरु होतात. यात अनेक बीपीओ कंपन्यांचा समावेश आहे. विमा, विविध सॉफ्टवेअर कंपन्यांपासून उद्योग व्यवसायांशी संबंधित सुमारे ३५० कंपन्यांसाठी अनेक कर्मचारी काम करतात. यात प्रत्यक्ष ऑफिसला येऊन काम करणाऱ्या स्थानिक कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे पाच हजार आहे, तर वर्क फ्रॉम होम काम करणारे १५ हजार कर्मचारी आहेत.बुधवारी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून इंटरनेट सेवा बंद पडल्याने सायंकाळनंतरच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करता आले नाही. याबरोबरीनेच पहाटे सुरु होणाऱ्या आणि दुपारच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कार्यालयातील काम करता आले नाही. हे कर्मचारी कामावर आले परंतु इंटरनेटची सेवा खंडित असल्याने त्यांना कोणतेही काम करता आले नाही.दरम्यान, आयटी असोसिएशनचे अध्यक्ष प्रताप पाटील यांनी सांगितले, की जिल्हा प्रशासनाने इंटरनेट सेवा अशाप्रकारे अचानक खंडित केल्यामुळे आयटी क्षेत्राचे सुमारे १० कोटी रुपयांचे तरी नुकसान झालेले आहे. अनेक बँका या सेवेतून वगळण्यात आल्यामुळे ज्यांच्या उलाढाली मोठ्या प्रमाणात आहेत, अशा कोल्हापूर जिल्ह्यातील किमान पाच ते सहा बड्या कंपन्यांनाही या सेवेतून वगळण्यात यायला पाहिजे हाेते. सर्वसामान्य व्यक्तींच्या सोशल मीडियावर बंधने आणता आली असती, मात्र सरसकट हा निर्णय लादण्यात आला.

शनिवारी करावे लागणार काम

अनेक कंपन्या या लीज लाईनवर काम करतात तर काही कंपन्या फायबर ऑप्टिकलने पुरविण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवांवर अवलंबून होत्या. या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतेही काम दिवसभरात करता आले नाही. त्यामुळे त्यांना सक्तीने घरी जावे लागले. या कर्मचाऱ्यांना आज मिळालेल्या सुटीमुळे त्यांच्या शनिवारच्या सुटीवर गंडांतर आले आहे. या कर्मचाऱ्यांना आता शनिवारी सुटीच्या दिवशी कामावर यावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरInternetइंटरनेट