शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

लॉकडाऊनच्या काळात रेल्वेने ही महत्वपूर्ण भूमिका बजावली...१४५० मालवाहतूक रेल्वेने पोहोचले अत्यावश्यक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 18:29 IST

संपूर्ण देशात आवश्यक वस्तूंचे लोडींग अनलोडिंग करणे या बाबीला प्राधान्य देण्याची भारतीय रेल्वेची नीती आहे, तिला अनुसरून पुणे रेल्वे मंडळ कार्य करत आहे. मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व हितधारकांना आश्वासन दिले आहे की सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉक डाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा निरंतर चालू राहील.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉकडाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा चालू राहील--मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा

कोल्हापूर : कोविड-19 विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉक डाऊन लागू झाल्याने देश जणू काही थांबला आहे. या लॉक डाऊन च्या कठीण काळात राष्ट्रीय ट्रान्सपोर्टर भारतीय रेल्वे पुणे, सातारा ,कोल्हापूर आणि देशाच्या इतर भागात पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी मालगाड्या चालवीत आहे. पुणे रेल्वे मंडळाने लॉक डाऊन च्या या काळात 1450 मालगाड्या अत्यंत कुशलता व गतीने चालवल्या आहेत.

मंडळावर 25 मार्च ते 26 एप्रिल पर्यंत 27 रेक म्हणजे 1 लाख टनांहून अधिक खाद्यान्नाची अनलोडिंग झाली. हे अनलोडिंग पुणे, बारामती, कोल्हापूर, मिरज व सातारा येथील माल गोदामात केले गेले जे खाद्य वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याव्यतिरिक्त मंडळाने या भागात एलपीजी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे 15 रेक एलपीजी अनलोडींग केले जे 15लाख सिलेंडर समकक्ष आहे. याव्यतिरिक्त राज्य सरकार सोबत समन्वय ठेवून लॉक डाऊन च्या या काळात कृषी खत 21 रेक, सिमेंट 9 रेक, लोखंड व स्टीलचे 9 रेक व मीठ 1 रेक असे पुणे रेल्वे मंडळाच्या विविध टर्मिनल वर उतरवले आहे.

मंडळाच्या लोणी स्टेशन येथून पेट्रोलियम उत्पादनाचे 18 रेक (9लाख लिटर्स पेट्रोलियम उत्पादन) बंगलोर, मंगळूर, सोलापूर, नवलूर, जबलपूर, सागर या ठिकाणी पाठवले गेले. बारामती स्टेशन येथून 3500 टन साखर तामिळनाडूतील दिंडीगुल व जवळील क्षेत्रात पाठवली गेली. कोल्हापूर स्टेशन येथून साखरेचे 3 रेक निर्यातीसाठी पाठवले गेले. याच बरोबर कृषी खत ,पेट्रोलियम उत्पादन ,साखर ,सिमेंट आणि ड्राय ऑइल केक सारख्या अत्यावश्यक वस्तू उत्पादन , उत्तर क्षेत्रामधून दक्षिण क्षेत्रामध्ये खाद्यान्न वेळेवर पोहोचविण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.

यासाठी स्टेशन मास्टर, पॉइंट्समन, गार्ड ,लोको पायलट ,कंट्रोलर इत्यादी कामगार वर्ग मालगाड्यांचे संचालन व रेल्वेची चाके सदैव गतीमान ठेवण्यासाठी 24 तास काम करीत आहेत . मंडळ रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा यांनी सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी लॉक डाऊन च्या वाढलेल्या काळात देखील रेल्वेची सेवा निरंतर चालू राहील असा विश्वास दिला असल्याचे रेल्वेचे पुणे विभगाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरrailwayरेल्वेCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या