शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

By admin | Updated: November 17, 2015 00:05 IST

महामार्गापेक्षा पायवाट बरी : सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्ता खड्ड्यात; विकतच्या दुखण्यामुळे प्रवासी-वाहनधारक संतप्त--हाय काय... ‘न्हाय’ काय?

महेंद्र गायकवाड -- पाचवड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कमी वेळेत अन् सुखाचा प्रवास होत असतानाच महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाचा घाट घातला अन् महामार्ग अक्षरश: खड्ड्यात गेला. लिंब फाटा ते वेळेदरम्यान सध्या तब्बल आठ उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी वाहतूक वळविली असल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना असल्या महामार्गापेक्षा गावाकडची पायवाट बरी असे म्हणण्याची वेळ येत आहे. सातारा ते पुणे या सहा तासांच्या प्रवासासाठी १३५ रुपये टोलही भरावा लागतोय. हे विकतचं दुखणं कशासाठी सहन करायचं? हा संतप्त सवाल आहे प्रवासी व वाहनधारकाचा. रविवारी झालेला मेगाब्लॉक हा ‘न्हाय’च्या गचाळ कामाचे फलित असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम आॅगस्ट महिन्यापासून वेगाने सुरू झाले. परंतु ठेकेदारांनी सहापदरीकरण कामाचे योग्य नियोजन न करता उड्डाणपुलांची कामे हाती घेतल्याने सर्वच कामे अपूर्णावस्थेत आहेत. लिंंब फाटा ते वेळे दरम्यानच सुमारे आठ उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामध्ये अनुक्रमे लिंंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशी विहीर, बोपेगाव आणि सुरूर या मोठ्या रहदारी असलेल्या गावांचा समावेश होतो. ही आठही ठिकाणे महामार्गावरील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाची असून येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर प्रवाशांची रहदारी सुरू असते. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत यापैकी एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसून त्याठिकाणची वाहतूक सुरळीत झालेली दिसून येत नाही. (क्रमश:) मेगाब्लॉकने प्रवाशांना अक्षरश: रडविलेगावाकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेऊन पुणे-मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना रविवारी महामार्गावर झालेल्या मेगाब्लॉकने अक्षरश: रडविले. लिंबखिंड ते पाचवड या दहा किलोमीटर अंतरात वाहतूक जाम झाली. वाहतूक सुरळीत व्हायला पहाट झाली. तोपर्यंत लहान मुले, वृद्धांसह सर्वच प्रवासी, वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘न्हाय’वर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.कारणाविना झाली वाहतूक कोंडीरविवारी महामार्गावर झालेला मेगाब्लॉक हा महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठेपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर अशी कोणतीच घटना घडली नव्हती की ज्यामुळे एवढी मोठी वाहतूक कोंडी होईल. निव्वळ ‘न्हाय’ने सुरु केलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ही समस्या उद्भवली आणि त्याचा त्रास हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्ग तयार करून अच्छे दिन आणणाऱ्या राज्य सरकारचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पाचवडमध्ये दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील शनिवारपासून विस्कटलेली वाहतूक आजपर्यंत काही सुरळीत झालेली नाही. पाचवड ते उडतारेपर्यंत आजही (दि. १६) दुपारनंतर वाहतुकीचा फज्जा उडाला. महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या नियोजनाअभावी व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तीन दिवसांपासून प्रवासी व जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनांच्या मोठ्या लांबलचक रांगा लागल्या असून मोठ्या दुर्घटनेला जणू काही निमंत्रणच दिल्यासारखी स्थिती पाचवड फाटा ते उडतारे पर्यंतच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ‘न्हाय’चा असाही ‘अर्धवट’पणासहापदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला सुरूर येथील उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी सुरू केले. हे काम अजूनही अपूर्ण आहे. कहर म्हणजे हा अर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला असून पुलाच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहने ये-जा करतात. ‘न्हाय’चा हा ‘अर्धवट’पणा प्रवाशांच्या जिवावर बेतत असून आजपर्यंत याठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही झालेल्या आहेत.