शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

By admin | Updated: November 17, 2015 00:05 IST

महामार्गापेक्षा पायवाट बरी : सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्ता खड्ड्यात; विकतच्या दुखण्यामुळे प्रवासी-वाहनधारक संतप्त--हाय काय... ‘न्हाय’ काय?

महेंद्र गायकवाड -- पाचवड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कमी वेळेत अन् सुखाचा प्रवास होत असतानाच महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाचा घाट घातला अन् महामार्ग अक्षरश: खड्ड्यात गेला. लिंब फाटा ते वेळेदरम्यान सध्या तब्बल आठ उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी वाहतूक वळविली असल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना असल्या महामार्गापेक्षा गावाकडची पायवाट बरी असे म्हणण्याची वेळ येत आहे. सातारा ते पुणे या सहा तासांच्या प्रवासासाठी १३५ रुपये टोलही भरावा लागतोय. हे विकतचं दुखणं कशासाठी सहन करायचं? हा संतप्त सवाल आहे प्रवासी व वाहनधारकाचा. रविवारी झालेला मेगाब्लॉक हा ‘न्हाय’च्या गचाळ कामाचे फलित असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम आॅगस्ट महिन्यापासून वेगाने सुरू झाले. परंतु ठेकेदारांनी सहापदरीकरण कामाचे योग्य नियोजन न करता उड्डाणपुलांची कामे हाती घेतल्याने सर्वच कामे अपूर्णावस्थेत आहेत. लिंंब फाटा ते वेळे दरम्यानच सुमारे आठ उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामध्ये अनुक्रमे लिंंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशी विहीर, बोपेगाव आणि सुरूर या मोठ्या रहदारी असलेल्या गावांचा समावेश होतो. ही आठही ठिकाणे महामार्गावरील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाची असून येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर प्रवाशांची रहदारी सुरू असते. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत यापैकी एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसून त्याठिकाणची वाहतूक सुरळीत झालेली दिसून येत नाही. (क्रमश:) मेगाब्लॉकने प्रवाशांना अक्षरश: रडविलेगावाकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेऊन पुणे-मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना रविवारी महामार्गावर झालेल्या मेगाब्लॉकने अक्षरश: रडविले. लिंबखिंड ते पाचवड या दहा किलोमीटर अंतरात वाहतूक जाम झाली. वाहतूक सुरळीत व्हायला पहाट झाली. तोपर्यंत लहान मुले, वृद्धांसह सर्वच प्रवासी, वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘न्हाय’वर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.कारणाविना झाली वाहतूक कोंडीरविवारी महामार्गावर झालेला मेगाब्लॉक हा महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठेपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर अशी कोणतीच घटना घडली नव्हती की ज्यामुळे एवढी मोठी वाहतूक कोंडी होईल. निव्वळ ‘न्हाय’ने सुरु केलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ही समस्या उद्भवली आणि त्याचा त्रास हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्ग तयार करून अच्छे दिन आणणाऱ्या राज्य सरकारचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पाचवडमध्ये दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील शनिवारपासून विस्कटलेली वाहतूक आजपर्यंत काही सुरळीत झालेली नाही. पाचवड ते उडतारेपर्यंत आजही (दि. १६) दुपारनंतर वाहतुकीचा फज्जा उडाला. महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या नियोजनाअभावी व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तीन दिवसांपासून प्रवासी व जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनांच्या मोठ्या लांबलचक रांगा लागल्या असून मोठ्या दुर्घटनेला जणू काही निमंत्रणच दिल्यासारखी स्थिती पाचवड फाटा ते उडतारे पर्यंतच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ‘न्हाय’चा असाही ‘अर्धवट’पणासहापदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला सुरूर येथील उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी सुरू केले. हे काम अजूनही अपूर्ण आहे. कहर म्हणजे हा अर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला असून पुलाच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहने ये-जा करतात. ‘न्हाय’चा हा ‘अर्धवट’पणा प्रवाशांच्या जिवावर बेतत असून आजपर्यंत याठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही झालेल्या आहेत.