शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

‘सहा तासांत पुणे’साठी १३५ रुपये टोल!

By admin | Updated: November 17, 2015 00:05 IST

महामार्गापेक्षा पायवाट बरी : सहापदरीकरणाच्या कामामुळे रस्ता खड्ड्यात; विकतच्या दुखण्यामुळे प्रवासी-वाहनधारक संतप्त--हाय काय... ‘न्हाय’ काय?

महेंद्र गायकवाड -- पाचवड पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गामुळे कमी वेळेत अन् सुखाचा प्रवास होत असतानाच महामार्ग प्राधिकरणाने (न्हाय) सहापदरीकरणाचा घाट घातला अन् महामार्ग अक्षरश: खड्ड्यात गेला. लिंब फाटा ते वेळेदरम्यान सध्या तब्बल आठ उड्डाणपुलाची कामे सुरू आहेत. ठिकठिकाणी वाहतूक वळविली असल्याने खड्ड्यातून मार्ग काढताना असल्या महामार्गापेक्षा गावाकडची पायवाट बरी असे म्हणण्याची वेळ येत आहे. सातारा ते पुणे या सहा तासांच्या प्रवासासाठी १३५ रुपये टोलही भरावा लागतोय. हे विकतचं दुखणं कशासाठी सहन करायचं? हा संतप्त सवाल आहे प्रवासी व वाहनधारकाचा. रविवारी झालेला मेगाब्लॉक हा ‘न्हाय’च्या गचाळ कामाचे फलित असल्याचे बोलले जात आहे.राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम आॅगस्ट महिन्यापासून वेगाने सुरू झाले. परंतु ठेकेदारांनी सहापदरीकरण कामाचे योग्य नियोजन न करता उड्डाणपुलांची कामे हाती घेतल्याने सर्वच कामे अपूर्णावस्थेत आहेत. लिंंब फाटा ते वेळे दरम्यानच सुमारे आठ उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. यामध्ये अनुक्रमे लिंंब फाटा, आनेवाडी, उडतारे, पाचवड, भुर्इंज, जोशी विहीर, बोपेगाव आणि सुरूर या मोठ्या रहदारी असलेल्या गावांचा समावेश होतो. ही आठही ठिकाणे महामार्गावरील बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाची असून येथे मोठ्या प्रमाणात महामार्गावर प्रवाशांची रहदारी सुरू असते. महामार्गाचे काम करणाऱ्या ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे आजपर्यंत यापैकी एकाही उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले नसून त्याठिकाणची वाहतूक सुरळीत झालेली दिसून येत नाही. (क्रमश:) मेगाब्लॉकने प्रवाशांना अक्षरश: रडविलेगावाकडे दिवाळीच्या सुटीचा आनंद घेऊन पुणे-मुंबईकडे निघालेल्या प्रवाशांना रविवारी महामार्गावर झालेल्या मेगाब्लॉकने अक्षरश: रडविले. लिंबखिंड ते पाचवड या दहा किलोमीटर अंतरात वाहतूक जाम झाली. वाहतूक सुरळीत व्हायला पहाट झाली. तोपर्यंत लहान मुले, वृद्धांसह सर्वच प्रवासी, वाहनचालकांचे मोठे हाल झाले. प्रवाशांच्या जिवाशी खेळणाऱ्या ‘न्हाय’वर कडक कारवाई करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांमधून होत आहे.कारणाविना झाली वाहतूक कोंडीरविवारी महामार्गावर झालेला मेगाब्लॉक हा महामार्ग प्राधिकरणाच्या आडमुठेपणामुळे झाल्याचे बोलले जात आहे. महामार्गावर अशी कोणतीच घटना घडली नव्हती की ज्यामुळे एवढी मोठी वाहतूक कोंडी होईल. निव्वळ ‘न्हाय’ने सुरु केलेल्या उड्डाणपुलाच्या कामामुळे ही समस्या उद्भवली आणि त्याचा त्रास हजारो प्रवाशांना सहन करावा लागला. राष्ट्रीय महामार्ग तयार करून अच्छे दिन आणणाऱ्या राज्य सरकारचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. पाचवडमध्ये दुसऱ्या दिवशीही वाहतूक कोंडी पाचवड : राष्ट्रीय महामार्गावरील शनिवारपासून विस्कटलेली वाहतूक आजपर्यंत काही सुरळीत झालेली नाही. पाचवड ते उडतारेपर्यंत आजही (दि. १६) दुपारनंतर वाहतुकीचा फज्जा उडाला. महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या नियोजनाअभावी व ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे तीन दिवसांपासून प्रवासी व जनतेला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. वाहनांच्या मोठ्या लांबलचक रांगा लागल्या असून मोठ्या दुर्घटनेला जणू काही निमंत्रणच दिल्यासारखी स्थिती पाचवड फाटा ते उडतारे पर्यंतच्या परिसरात निर्माण झालेली आहे. ‘न्हाय’चा असाही ‘अर्धवट’पणासहापदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. सुरुवातीला सुरूर येथील उड्डाणपुलाचे काम ठेकेदारांनी सुरू केले. हे काम अजूनही अपूर्ण आहे. कहर म्हणजे हा अर्धवट उड्डाणपूल वाहतुकीसाठी सुरू केला असून पुलाच्या एकाच बाजूने दोन्ही बाजूची वाहने ये-जा करतात. ‘न्हाय’चा हा ‘अर्धवट’पणा प्रवाशांच्या जिवावर बेतत असून आजपर्यंत याठिकाणी छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटनाही झालेल्या आहेत.