शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

उद्यापासून बारावी परीक्षेला सुरुवात; कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 13:38 IST

जिल्ह्यात ७३ केंद्र : भरारी पथकांद्वारे कॉपीला आळा

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी बारावीची परीक्षा उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७३ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ५१ हजार १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सात भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत शिवाय प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्यासह विविध अधिकारीही केंद्रांना भेटी देणार आहेत.

बारावीच्या परीक्षेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १७५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी विभागातील १ लाख १९ हजार १६८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. उद्या, बुधवारी इंग्रजीच्या पेपरपासून या परीक्षेला प्रारंभ होईल. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.विभागाचे चित्र असेकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मिळून १७५ केंद्रे, एक लाख १९ हजार १६८ विद्यार्थी, २१ भरारी पथके.

परीक्षा केंद्रांवर कडेकोट व्यवस्थापरीक्षा काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, गैरप्रकार टाळण्याच्यादृष्टीने परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. परीक्षार्थी, शिक्षणाधिकारी व शिक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशास प्रतिबंध केलेला आहे. याशिवाय केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एसटीडी बूथ, झेरॉक्स, फॅक्स केंद्र बंद राहणार आहे. परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, मोबाईल, मायक्रोफोन, स्मार्टवॉच, वायरलेस या वस्तू नेण्यासाठी बंदी घातली आहे.

विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके कार्यरत असणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. -दत्तात्रय पोवार, - विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर.

सकारात्मक विचारांने सामोरे जा..विद्यार्थ्यांच्या जीवनातील दहावी व बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. करिअरची सुरुवातच या टप्प्यावर निश्चित होते. त्यामुळे या परीक्षांचे जरूर महत्त्व असले तरी ही परीक्षा म्हणजेच सारे काही आहे असेही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, तयारी करावी. यशाचा आताच विचार न करता पेपरला शांतपणे सामोरे जावे. परीक्षेचा अनावश्यक ताणतणाव घेतल्यास त्याचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घेऊन त्यास सामोरे जावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC / 12th Exam12वी परीक्षा