शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

उद्यापासून बारावी परीक्षेला सुरुवात; कोल्हापूर जिल्ह्यात ५१ हजार विद्यार्थी देणार परीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 13:38 IST

जिल्ह्यात ७३ केंद्र : भरारी पथकांद्वारे कॉपीला आळा

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअरचा महत्त्वाचा टप्पा मानली जाणारी बारावीची परीक्षा उद्या, बुधवारपासून सुरू होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ७३ केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी ५१ हजार १५५ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. ही परीक्षा पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने सात भरारी पथके जिल्ह्यात कार्यरत असणार आहेत शिवाय प्रत्येक तालुक्यातील तहसीलदारांच्यासह विविध अधिकारीही केंद्रांना भेटी देणार आहेत.

बारावीच्या परीक्षेला उद्या, बुधवारपासून सुरुवात होणार आहे. कोल्हापूर विभागातील कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत १७५ केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. यासाठी विभागातील १ लाख १९ हजार १६८ विद्यार्थी प्रविष्ठ झाले आहेत. उद्या, बुधवारी इंग्रजीच्या पेपरपासून या परीक्षेला प्रारंभ होईल. २३ मार्चपर्यंत ही परीक्षा सुरू राहणार आहे.विभागाचे चित्र असेकोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात मिळून १७५ केंद्रे, एक लाख १९ हजार १६८ विद्यार्थी, २१ भरारी पथके.

परीक्षा केंद्रांवर कडेकोट व्यवस्थापरीक्षा काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी, गैरप्रकार टाळण्याच्यादृष्टीने परीक्षा केंद्र परिसरातील शंभर मीटर परिसरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत. परीक्षार्थी, शिक्षणाधिकारी व शिक्षकांव्यतिरिक्त इतरांना प्रवेशास प्रतिबंध केलेला आहे. याशिवाय केंद्राच्या शंभर मीटर परिसरात एसटीडी बूथ, झेरॉक्स, फॅक्स केंद्र बंद राहणार आहे. परीक्षा केंद्रावर डिजिटल डायरी, मोबाईल, मायक्रोफोन, स्मार्टवॉच, वायरलेस या वस्तू नेण्यासाठी बंदी घातली आहे.

विद्यार्थ्यांनी भयमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी. गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके कार्यरत असणार आहेत. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा. -दत्तात्रय पोवार, - विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूर.

सकारात्मक विचारांने सामोरे जा..विद्यार्थ्यांच्या जीवनातील दहावी व बारावी हा महत्त्वाचा टप्पा आहे. करिअरची सुरुवातच या टप्प्यावर निश्चित होते. त्यामुळे या परीक्षांचे जरूर महत्त्व असले तरी ही परीक्षा म्हणजेच सारे काही आहे असेही नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास करावा, तयारी करावी. यशाचा आताच विचार न करता पेपरला शांतपणे सामोरे जावे. परीक्षेचा अनावश्यक ताणतणाव घेतल्यास त्याचा मनाच्या एकाग्रतेवर परिणाम होतो. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा घेऊन त्यास सामोरे जावे, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHSC / 12th Exam12वी परीक्षा