शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

जिल्ह्यातील १२३ गावांनी कोरोनाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झालेली नाही. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदले आहेत.

जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो पुण्याहून कोल्हापुरात आला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये उच्चांकी अशी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार ७५४ रुग्ण नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ४९ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११४ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १७८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १२२५ गावे असून, १०२५ ग्रामपंचायती आहेत. सुरुवातीच्या काळात ही संख्या ग्रामीण भागातही नियंत्रणामध्ये होती. परंतु पुण्या, मुंबईहून आलेले ग्रामस्थ, नागरिकांचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे ही संख्या वाढत गेली. अनेकांना गावातील शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. यातही काहींनी दबाव टाकून घरात राहण्याला प्राधान्य दिले. यावरून गावोगावी मतभेद आणि वादही झाले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनेक कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले.

चौकट

जिल्ह्यातील कोरोना पहिल्या रुग्णाची नोंद २६ मार्च २०२०

सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण १२६९

ग्रामीण रुग्ण २५ हजार ५११

एकूण मृत्यू १७९४

कोरोनातून बरे झालेले रुग्ण ४९ हजार ९२२

जिल्ह्यातील एकूण गावे १२२५

या गावात आढळला नाही एकही कोरोना रुग्ण १२३

चौकट

रुग्ण नसलेली बहुतांशी गावे डोंगराळ

या १२३ गावांमध्ये बहुतांशी गावे ही त्या त्या तालुक्यातील डोंगराळ भागातील आहेत. ज्या ठिकाणी फारशी वर्दळ नाही अशी ही गावे आहेत. गडहिंग्लज ९, शाहूवाडी १२, कागल ३, भुदरगड ३०, आजरा १६, करवीर ८, चंदगड ११, पन्हाळा ११, राधानगरी ७, गगनबावडा १६ अशी ही एकही कोरोना रुग्ण नसलेली गावे आहेत.

कोट

कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने योग्य नियोजन आणि शासनाच्या सूचनांचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा शिरकाव थोपवू शकलो. मुंबई, पुण्यासह बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना शाळा व शेतातील घरांमध्ये अलगीकरण केल्यामुळे देऊळवाडी, सातेवाडी या गावांत आजपर्यंत एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही. सध्याही ग्रामसमिती कार्यरत असून, या पुढच्या काळातही कोरोनाला वेशीवरच रोखण्याचा आमचा निर्धार आहे.

नंदा शंकर पोतनीस, सरपंच देऊळवाडी, सातेवाडी, ता. आजरा

०७०४२०२१ कोल नंदा पोतनीस

कोट

कोरोना काळात शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक आणि सात दिवस गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या. तसेच इतर गावांतील नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला. ग्रामपंचायत व दक्षता समितीतर्फे प्रत्येक ग्रामस्थाची, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. याकामी ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले.

भरमू जाधव, सरपंच बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज

०७०४२०२१ कोल भरमू जाधव