शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
2
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
3
धोनीचा 'कॅप्टन कूल' नावाच्या ट्रेडमार्कचा अर्ज कार्यालयाने स्वीकारला, पण अजूनही आहे एक अडथळा
4
१००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
5
...अन्यथा अहमदाबादसारखा अपघात दिल्लीत घडला असता, उड्डाण करताच ९०० फूट खाली आलं एअर इंडियाचं विमान
6
व्यापार करारापूर्वीच भारताचा अमेरिकेला धोबीपछाड! ४ वर्षात पहिल्यांदाच असं घडलं, ट्रम्प पाहतच राहिले
7
प्रेमप्रकरणातून मुलीनं संपवलं जीवन, बदला घेण्यासाठी संतप्त पित्याचं भयंकर कृत्य, तरुणावर केला ॲसिड हल्ला
8
Crime: महिला शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबत सेक्स; पुढं असं घडलं की... अख्खं आयुष्य झालं खराब!
9
मुलींच्या टोमण्यांना कंटाळलेल्या निवृत्त सैनिकाने तब्बल ४ कोटींची संपत्ती केली मंदिराला दान
10
आजचा दिवस SBI साठी एकदम खास, माहितीये कशी झालेली सरकारी बँकेची सुरुवात?
11
वापरा अन् फेका...! IPL मधील क्रिकेटरवर गर्लफ्रेंडचा खळबळजनक आरोप; लैंगिक शोषण केल्याचा दावा
12
'मुलाचा मृतदेह शोधून काढा अन्यथा आम्हीही नीरा नदीत उड्या मारू'; वारकऱ्यांचा प्रशासनाला इशारा
13
"जाडी वाटले तर सहन करा...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूनंतर राखी सावंतने घेतला धसका, म्हणाली - "सौंदर्यासाठी..."
14
Video - तामिळनाडूच्या शिवकाशी येथील फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ५ जणांचा मृत्यू
15
मान्सून लवकर आला, पण 'या' उद्योगांना रडवले! तुमच्या नोकरीवरही संकट?
16
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
17
३० लाख कर भरणाऱ्या आयटी अभियंत्याची नोकरी गेली अन्... पोस्टने सोशल मीडियावर खळबळ
18
बीएसएफमध्ये असलेल्या जवानाच्या पत्नीवर दिरांनी केला बलात्कार, व्हिडीओ काढून...
19
"१७ जूनची ती भेट शेवटची ठरेल असं वाटलं नाही..."; माजी आमदाराचं निधन, अजित पवार भावूक
20
तरुणीने मंदिरात जाऊन लग्न केले, नवरदेवापासून अशी गोष्ट लपविली की लग्न १८ तासच टिकले...

जिल्ह्यातील १२३ गावांनी कोरोनाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झालेली नाही. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदले आहेत.

जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो पुण्याहून कोल्हापुरात आला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये उच्चांकी अशी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार ७५४ रुग्ण नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ४९ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११४ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १७८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १२२५ गावे असून, १०२५ ग्रामपंचायती आहेत. सुरुवातीच्या काळात ही संख्या ग्रामीण भागातही नियंत्रणामध्ये होती. परंतु पुण्या, मुंबईहून आलेले ग्रामस्थ, नागरिकांचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे ही संख्या वाढत गेली. अनेकांना गावातील शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. यातही काहींनी दबाव टाकून घरात राहण्याला प्राधान्य दिले. यावरून गावोगावी मतभेद आणि वादही झाले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनेक कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले.

चौकट

जिल्ह्यातील कोरोना पहिल्या रुग्णाची नोंद २६ मार्च २०२०

सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण १२६९

ग्रामीण रुग्ण २५ हजार ५११

एकूण मृत्यू १७९४

कोरोनातून बरे झालेले रुग्ण ४९ हजार ९२२

जिल्ह्यातील एकूण गावे १२२५

या गावात आढळला नाही एकही कोरोना रुग्ण १२३

चौकट

रुग्ण नसलेली बहुतांशी गावे डोंगराळ

या १२३ गावांमध्ये बहुतांशी गावे ही त्या त्या तालुक्यातील डोंगराळ भागातील आहेत. ज्या ठिकाणी फारशी वर्दळ नाही अशी ही गावे आहेत. गडहिंग्लज ९, शाहूवाडी १२, कागल ३, भुदरगड ३०, आजरा १६, करवीर ८, चंदगड ११, पन्हाळा ११, राधानगरी ७, गगनबावडा १६ अशी ही एकही कोरोना रुग्ण नसलेली गावे आहेत.

कोट

कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने योग्य नियोजन आणि शासनाच्या सूचनांचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा शिरकाव थोपवू शकलो. मुंबई, पुण्यासह बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना शाळा व शेतातील घरांमध्ये अलगीकरण केल्यामुळे देऊळवाडी, सातेवाडी या गावांत आजपर्यंत एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही. सध्याही ग्रामसमिती कार्यरत असून, या पुढच्या काळातही कोरोनाला वेशीवरच रोखण्याचा आमचा निर्धार आहे.

नंदा शंकर पोतनीस, सरपंच देऊळवाडी, सातेवाडी, ता. आजरा

०७०४२०२१ कोल नंदा पोतनीस

कोट

कोरोना काळात शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक आणि सात दिवस गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या. तसेच इतर गावांतील नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला. ग्रामपंचायत व दक्षता समितीतर्फे प्रत्येक ग्रामस्थाची, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. याकामी ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले.

भरमू जाधव, सरपंच बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज

०७०४२०२१ कोल भरमू जाधव