शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १२३ गावांनी कोरोनाला रोखले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:24 IST

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला ...

कोल्हापूर : जिल्ह्यातील १२२५ गावांपैकी केवळ १२३ गावांना कोरोनाला रोखण्यात यश मिळाले आहे. गेल्या वर्षभरात या गावात एकाही ग्रामस्थाला कोरोनाची बाधा झालेली नाही. जिल्ह्यातील १२ तालुक्यांपैकी दहा तालुक्यांमध्ये ही परिस्थिती असून, शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील सर्वच गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण नोंदले आहेत.

जिल्ह्यात २६ मार्च २०२० रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तो पुण्याहून कोल्हापुरात आला होता. त्यानंतर सातत्याने रुग्णसंख्या वाढत जाऊन सप्टेंबरमध्ये उच्चांकी अशी रुग्णसंख्या नोंदवण्यात आली. आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यात ५२ हजार ७५४ रुग्ण नोंदवण्यात आले असून, त्यापैकी ४९ हजार ८५२ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या १११४ जण उपचार घेत असून, आतापर्यंत १७८८ जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात १२२५ गावे असून, १०२५ ग्रामपंचायती आहेत. सुरुवातीच्या काळात ही संख्या ग्रामीण भागातही नियंत्रणामध्ये होती. परंतु पुण्या, मुंबईहून आलेले ग्रामस्थ, नागरिकांचे दुर्लक्ष अशा विविध कारणांमुळे ही संख्या वाढत गेली. अनेकांना गावातील शाळांमध्ये संस्थात्मक अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. यातही काहींनी दबाव टाकून घरात राहण्याला प्राधान्य दिले. यावरून गावोगावी मतभेद आणि वादही झाले. शहराबरोबरच ग्रामीण भागातही अनेक कोरोनाग्रस्तांचे मृत्यू झाले.

चौकट

जिल्ह्यातील कोरोना पहिल्या रुग्णाची नोंद २६ मार्च २०२०

सध्या कोरोनाचे सक्रिय रुग्ण १२६९

ग्रामीण रुग्ण २५ हजार ५११

एकूण मृत्यू १७९४

कोरोनातून बरे झालेले रुग्ण ४९ हजार ९२२

जिल्ह्यातील एकूण गावे १२२५

या गावात आढळला नाही एकही कोरोना रुग्ण १२३

चौकट

रुग्ण नसलेली बहुतांशी गावे डोंगराळ

या १२३ गावांमध्ये बहुतांशी गावे ही त्या त्या तालुक्यातील डोंगराळ भागातील आहेत. ज्या ठिकाणी फारशी वर्दळ नाही अशी ही गावे आहेत. गडहिंग्लज ९, शाहूवाडी १२, कागल ३, भुदरगड ३०, आजरा १६, करवीर ८, चंदगड ११, पन्हाळा ११, राधानगरी ७, गगनबावडा १६ अशी ही एकही कोरोना रुग्ण नसलेली गावे आहेत.

कोट

कोरोना रोखण्यासाठी ग्रामस्थांच्या मदतीने योग्य नियोजन आणि शासनाच्या सूचनांचे पालन केल्यामुळेच कोरोनाचा शिरकाव थोपवू शकलो. मुंबई, पुण्यासह बाहेरून आलेल्या चाकरमान्यांना शाळा व शेतातील घरांमध्ये अलगीकरण केल्यामुळे देऊळवाडी, सातेवाडी या गावांत आजपर्यंत एकही नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आलेला नाही. सध्याही ग्रामसमिती कार्यरत असून, या पुढच्या काळातही कोरोनाला वेशीवरच रोखण्याचा आमचा निर्धार आहे.

नंदा शंकर पोतनीस, सरपंच देऊळवाडी, सातेवाडी, ता. आजरा

०७०४२०२१ कोल नंदा पोतनीस

कोट

कोरोना काळात शासनाच्या निर्देशानुसार नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले. बाहेरून येणाऱ्या नागरिकांना १४ दिवस संस्थात्मक आणि सात दिवस गृह अलगीकरणामध्ये ठेवण्यात आले. त्या ठिकाणी सर्व सुविधा देण्यात आल्या. तसेच इतर गावांतील नागरिकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला. ग्रामपंचायत व दक्षता समितीतर्फे प्रत्येक ग्रामस्थाची, कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घेतली. याकामी ग्रामस्थांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे कोरोनाला रोखण्यात यश आले.

भरमू जाधव, सरपंच बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज

०७०४२०२१ कोल भरमू जाधव