शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

देय ‘एफआरपी’तील १२०० रुपये देणार

By admin | Updated: May 30, 2015 01:03 IST

साखर कारखानदारांची बैठकीत तयारी : मालमत्तेचे फेरमूल्यांकन करून नवीन कर्जे द्या

कोल्हापूर : उसाच्या थकीत बिलांतील ‘एफआरपी’पैकी प्रतिटन १२०० रुपये शेतकऱ्यांना देण्यास साखर कारखानदारांनी तयारी दर्शविली आहे. उर्वरित रक्कम शासनाकडून मदत मिळाल्यानंतर तातडीने शेतकऱ्यांना देण्याची तयारीही कारखानदारांनी बैठकीत दर्शविली. मालमत्तेचे फेरमूल्यांकन करून नवीन कर्जे द्यावीत, यासाठी ‘नाबार्ड’कडे प्रयत्न करावेत, अशी मागणीही कारखानदारांनी केली.साखर कारखान्यांच्या थकीत कर्जवसुली व शेतकऱ्यांच्या ऊस बिलांबाबत जिल्हा मध्यवर्ती बँकेने शुक्रवारी जिल्ह्यातील साखर कारखान्यांची बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ होते. गेल्यावर्षी जिल्हा बँकेचे मेअखेर ७५ टक्के पीककर्जाची वसुली झाली होती पण यंदा फेबु्रवारीत तुटलेल्या उसाचे ८३३ कोटी ६६ लाख रुपये शेतकऱ्यांचे देणे आहे. त्यामुळे वसुलीवर परिणाम झाला आहे, केवळ ६१ टक्के वसुली झाली आहे. वसुलीबाबत कारखान्यांनी सहकार्य करावे, असे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले. त्यावर शासनाने पॅकेज देण्याची केवळ घोषणा केली आहे, पण त्यातील एक दमडीही मिळाली नसल्याने पैसे द्यायचे कुठून, असा सवाल कारखानदारांनी केला. जिल्हा बँक व राज्य बँकेकडे कारखान्यांचे शिल्लक असलेले पैसे द्यावे, त्यातून किमान शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचा हप्ता तरी जाईल, अशी कारखानदारांची भूमिका मांडली. त्यानंतर बँकेकडे शिल्लक असणारी रक्कम कारखान्यांना देण्याचे आश्वासन अध्यक्ष मुश्रीफ यांनी दिले. बँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, संजय मंडलिक, धैर्यशील पाटील-कौलवकर, गणपतराव पाटील, समरजीतसिंह घाटगे, प्रकाश आवाडे, व्ही. एम. केसरकर, विजयमाला देसाई, राजेंद्र पाटील-यड्रावकर, विजय औताडे, पी. जी. मेढे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)जुनं-नवं करण्यास मदतजूनअखेर पीककर्जाची परतफेड झाली तर पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्ज मंजूर होते पण कारखान्यांची अवस्था पाहिली तर एफआरपीप्रमाणे पैसे मिळणे मुश्कील आहे. सुरुवातीला प्रतिटन १२०० रुपये का असेना तेवढे पैसे शेतकऱ्यांच्या कर्जाला जमा झाले तर त्यांना कर्ज खाते जुनं-नवं करण्यास मदत होणार आहे. जिल्हा बँकेचे ४०० कोटी अडकलेसाखर कारखान्यांकडून जिल्हा बॅँकेचे सुमारे ४०० कोटी रुपये कर्ज येणे आहे. कारखान्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिले तरच विकास संस्थांची वसुली पर्यायाने जिल्हा बँकेची वसुली होऊ शकते.जिल्हा बॅँकेकडून यांना कर्जपुरवठा हमीदवाडा, कुंभी, शाहू, शरदराज्य बँकेकडून कर्जपुरवठा बिद्री, भोगावती, राजाराम, आजरा उर्वरित कारखान्यांना राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जपुरवठा