शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:59 IST

गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी घेऊन पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून आज, बुधवारी सर्वजण ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार आहेत

ठळक मुद्देचुकीची माहिती भरणाऱ्या ११८ शिक्षकांच्या होणार बदल्याअमन मित्तल, पदाधिकारी असीम गुप्तांच्या भेटीसाठी मुंबईत

कोल्हापूर : गतवर्षी अन्य जिल्ह्यांतून कोल्हापुरात आलेल्या ज्या शिक्षकांनी चुकीची माहिती भरली, अशा ११८ प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, या सगळ्यांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करण्याची मागणी घेऊन पदाधिकाऱ्यांनी मुंबई गाठली असून आज, बुधवारी सर्वजण ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेणार आहेतगेल्या वर्षी परजिल्ह्यांतून कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या शिक्षकांनी जे फॉर्म भरले होते, त्यामध्ये ‘नोकरी सुरू’ या कॉलममधील तारखा चुकीच्या लिहिल्या होत्या. त्यामुळे या सर्वांना सोयीची बदली ठिकाणे मिळाली होती. दरम्यान, राज्यातील अनेक शिक्षकांनी अशा प्रकारे चुकीची माहिती भरल्याने तसेच चुकीचे अंतर दाखविल्याने अशा सर्वांची एक वेतनवाढ रद्द करण्याचा आणि पुन्हा त्यांची बदली करण्याचा आदेश ग्रामविकास विभागाने काढला होता.यावरून गेले आठ महिने जिल्हा परिषदेमध्ये गरमागरम चर्चा सुरू होती.

अन्य जिल्हा परिषदांमध्ये कारवाई झाल्याने कोल्हापुरात कारवाई का नाही, अशी विचारणा सुरू झाली. यानंतर चौकशी करून, सुनावणी घेऊन यातील ११८ शिक्षकांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला गेला. मात्र पदाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर यातील १०० जणांना क्लीन चिट देण्याचा निर्णय झाला.मात्र या निर्णयावरून सर्वसाधारण सभेमध्ये जोरदार गोेंधळ उडाला. शिक्षा देणारच असाल तर सगळ्यांना द्या, अशी मागणी करून ठरावही करण्यात आला. त्यामुळे पुन्हा १८ शिक्षकांनी सोमवारी (दि. १०) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेतली.

महाडिक यांनी अमन मित्तल यांच्याशी चर्चाही केली. मात्र सर्वसाधारण सभेचा ठराव आणि ग्रामविकास विभागाचा आदेश यांचा विचार करून या सर्वांच्या पुन्हा बदल्या करण्याचा निर्णय मित्तल यांनी घेतला आहे.पदाधिकाऱ्यांनी घेतली शिक्षकांची बाजूसोमवारी दिवसभर जिल्हा परिषदेत थांबलेल्या या ११८ शिक्षकांनी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शिक्षण सभापती अंबरीश घाटगे यांची भेट घेतली. यानंतर पदाधिकाऱ्यांनी या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी थेट मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, अंबरीश घाटगे, ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले, विजय भोजे, ‘स्वाभिमानी’चे राजेश पाटील हे मुंबईला रवाना झाले आहेत. आज, बुधवारी ते ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगणार आहेत.

गेले वर्षभर संघटना पदाधिकारी ‘झेडपी’तचशिक्षकांच्या बदल्यांचा विषय अतिशय क्लिष्ट झाल्याने विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी गेले वर्षभर बहुतांश वेळा जिल्हा परिषदेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. उन्हाळी सुटी सुरू झाल्यापासून तर बहुतांश पदाधिकारी आणि शिक्षक गाठीभेटींमध्ये गुंतल्याचे दिसून येत आहे.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर