शहरं
Join us  
Trending Stories
1
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
2
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
3
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
4
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
5
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
6
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
7
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?
8
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
9
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
10
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
11
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
12
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
13
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
14
Apple चे नवे AirPods Pro 3 लाँच; किंमत मोठी, पण फीचर्स खुश करणारे!
15
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
16
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
17
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
18
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
19
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
20
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना

१०० कोटींचा उपयोग काय ? कोल्हापुरातील रस्त्यांची कामे रखडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 16:40 IST

ताकीद देऊनही ठेकेदाराची बेपर्वाई : १५ मे पूर्वी पाच रस्ते पूर्ण होणे अशक्य

कोल्हापूर : राज्य सरकारकडून मिळालेल्या १०० कोटी निधीतून सोळा रस्ते करायचे आहेत. त्यातील प्रमुख पाच रस्ते दोन्ही बाजूच्या गटारींसह १५ मे पर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत तसेच ठेकेदाराच्या प्रतिनिधीने दिले. आश्वासन देऊन महिना होत आला तरी कामांना अजून सुरुवात केलेली नाही. त्यामुळे पाचही रस्ते १५ मे पूर्वी होणे अशक्य आहे. या रस्त्यांच्या अर्धवट कामांचा त्रास मात्र शहरवासीयांना होऊ लागला आहे.गेले वर्षभर १०० कोटींच्या सोळा रस्त्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते गाजावाजा करून रस्त्याच्या कामांचा शुभारंभ करण्यात आला. या गोष्टीलाही आता साडेतीन महिने होऊन गेले. रस्त्यांची कामे दर्जेदार करा, वेळेत करा, अशी सक्त ताकीद त्यावेळी पालकमंत्र्यांसह नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली होती.रस्त्याच्या कामाचा प्रारंभ झाल्यानंतर ठेकेदाराने प्रमुख पाच रस्ते प्राधान्याने करण्याचे ठरवून तेथील कामांना सुरुवात केली. परंतु सेवावाहिन्यांचे स्थलांतर, रस्ते रुंदीकरणातील अडथळे, नवीन जलवाहिन्यांची कामे, ड्रेनेज लाईनची कामे यांची कारणे देत ठेकेदाराने कामे करण्यास विलंब केला. काही ठिकाणी खुदाई तर काही ठिकाणी रस्त्यावर खडी आणून टाकली. परंतु कामे काही प्रगतिपथावर गेलेली नाहीत.कामे रेंगाळल्यामुळे शहरवासीयांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खराब रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांची हाडे मोडायची वेळ आली आहे. याबाबत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने ठेकेदाराबरोबर एक बैठक आयोजित करण्यास भाग पाडले. १० एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत ठेकेदाराच्या प्रतिनिधीला चांगलेच फैलावर घेत कामातील दिरंगाईबद्दल जाब विचारला. त्यावेळी मंगळवार पेठेतील मिरजकर तिकटी ते संभाजीनगर पेट्रोलपंप या मुख्य रस्त्याचे रखडलेले डांबरीकरण येत्या दोन दिवसात चालू करून बाजूच्या गटारीसह १५ मे पर्यंत पूर्ण करणार, त्याचबरोबर चार रस्त्यांचेही काम याचबरोबर पूर्ण करणार, यामध्ये मंगळवार पेठेतील नागरिकांची कोणतीही फसवणूक करणार नाही, असे आश्वासन शहर अभियंता सरनोबत व ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींच्या वतीने कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. महिना होत आला तरी कामाला सुरुवात केलेली नाही. त्यामुळे १५ मे पूर्वी कामे होणे अशक्य आहे. आधीच खराब झालेल्या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना पावसाळ्यात अपघातांना सामोरे जावे लागणार आहे.

नागरिक धुळीने बेजाररस्त्यांची कामे अर्धवट राहिल्याने या रस्त्यावरून जाताना नागरिकांना धुळीचा त्रास होऊ लागला आहे. एखादे अवजड वाहन जात असेल तर रस्त्यावरील धूळ प्रचंड प्रमाणात उठते आणि त्यातून दुचाकीस्वारांना ही धूळ नाकातोंडात घेऊन जावे लागत आहे. तसेच रस्त्यावर टाकलेली खडी उचकटली असल्याने त्यावरून वाहने घसरण्याचा धोकाही वाढला आहे.

  • सोळा रस्त्यांसाठी १०० कोटींचा निधी
  • रहदारी असणाऱ्या सोळा रस्त्यांच्या निविदा
  • रस्ते करण्यासाठी दीड वर्षाची मुदत

रस्त्यांच्या कामाबाबत गुरुवारी बैठक झाली आहे. ठेकेदाराने दिलेल्या बारचार्ट प्रमाणे कामे सुरू झालेली नाहीत. त्यामुळे कामाची गती वाढवा आणि दिलेल्या मुदतीत पाच रस्त्याची कामे पूर्ण करा, अशी सूचना दिली आहे. -नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंता.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूक