शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना १३ कोटी ८४ लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:23 IST

आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा मुख्यमंत्र्यांकडे सुधारित प्रस्ताव सादरमंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.दरम्यान, ही नुकसानभरपाई कधी मिळणार अशी विचारणा करत इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन चर्चा केली. आठ दिवसांत नुकसानभरपाई न जमा झाल्यास महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलनास बसू, असा इशाराही दिला.आॅगस्टमध्ये झालेल्या महापुरात कृषीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मोटारी, केबल, ट्रान्स्फॉर्मरही वाहून गेले होते. गाळात रूतले होते. याचे पंचनामे महावितरणकडून करण्यात आले होते. तथापि, आजतागायत याची नुकसानभरपाई संबंधित कृषीपंपधारकांना मिळालेली नाही. याशिवाय या काळात मोटारी आणि वीजप्रवाहही बंद असतानादेखील महावितरणकडून कृषीपंपाचे सरासरी बिल काढले आहे. ही दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी करूनही अधिकारी, कर्मचारी दाद देत नसल्याचे दिसते.

यावर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा बैठक घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. इरिगेशन फेडरेशनने पाचवेळा भेट घेऊन समस्या मांडल्या, पण काहीही उपयोग होत नसल्याने आता चर्चा बस्स, आंदोलनच करायचे असे ठरवून इशारा देणारे निवेदन तयार केले. शुक्रवारी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील, सुभाष महापुरे, आर. के. पाटील यांनी अधीक्षक अभियंता कावळे यांची भेट घेऊन त्यांना इशारा निवेदन दिले.यावेळी झालेल्या चर्चेत कावळे यांनी आम्ही महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले आहेत, पण आजपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यास आम्ही शून्य वीजबिलासह, बिल दुरुस्ती व अन्य नुकसानभरपाईचा निर्णय घेऊ, असे सांगितले. शासनाच्या मागणीनुसार नवीन प्रस्ताव पाठविला आहे, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.असा आहे सुधारित प्रस्तावसुरुवातीला साडेपंधरा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकेपणे प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याने नवीन १३ कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी पाठविला आहे. यात ट्रान्स्फॉर्मरसाठी २ कोटी ३८ लाख, डीपीसाठी १ कोटी ९३ लाख, एचटी केबल ४२ लाख, मोटार ६८ लाख, एलटी केबल ५ कोटी ५२ लाख, स्टार्टर ५८ लाख असा समावेश आहे.

मोटार बंद असतानाही वाढीव बिल आले कसे?या बैठकीत पाडळीचे कृषीपंपधारक गुणाजी जाधव यांनी दत्त पाणीपुरवठा संस्थेचे जूनमधील बिल ४ लाख ३ हजारांचे होते. पावसाळ््यात मोटार बंद असतानाही दोन महिन्यांपूर्वी ५ लाख ८३ हजारांचे बिल पाठविले आहे. दोन महिन्यांत १ लाख ८२ हजार कसे काय वाढले, ते सांगा असा प्रतिप्रश्नच अधीक्षक अभियंत्यांना केला. यावर अभियंता कावळे यांनी तक्रारी द्या, कारवाई करू असे सांगितले.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर