शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

जिल्ह्यातील कृषीपंपधारकांना १३ कोटी ८४ लाखांची भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 17:23 IST

आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

ठळक मुद्देमहावितरणचा मुख्यमंत्र्यांकडे सुधारित प्रस्ताव सादरमंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

कोल्हापूर : आॅगस्टमधील महापूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कृषीपंपांना भरपाईपोटी १३ कोटी ८४ लाख रुपये मिळणार आहेत. महावितरणने जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार सुधारित प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आहे. येत्या मंगळवारी (३ मार्च) मंत्रालयात होणाऱ्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.दरम्यान, ही नुकसानभरपाई कधी मिळणार अशी विचारणा करत इरिगेशन फेडरेशनच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी दौलत देसाई व महावितरणचे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांची भेट घेऊन चर्चा केली. आठ दिवसांत नुकसानभरपाई न जमा झाल्यास महावितरणच्या ताराबाई पार्कातील मुख्य कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलनास बसू, असा इशाराही दिला.आॅगस्टमध्ये झालेल्या महापुरात कृषीपंपाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मोटारी, केबल, ट्रान्स्फॉर्मरही वाहून गेले होते. गाळात रूतले होते. याचे पंचनामे महावितरणकडून करण्यात आले होते. तथापि, आजतागायत याची नुकसानभरपाई संबंधित कृषीपंपधारकांना मिळालेली नाही. याशिवाय या काळात मोटारी आणि वीजप्रवाहही बंद असतानादेखील महावितरणकडून कृषीपंपाचे सरासरी बिल काढले आहे. ही दुरुस्ती करून द्यावी, अशी मागणी करूनही अधिकारी, कर्मचारी दाद देत नसल्याचे दिसते.

यावर स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी तीन वेळा बैठक घेऊन महावितरणच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या. इरिगेशन फेडरेशनने पाचवेळा भेट घेऊन समस्या मांडल्या, पण काहीही उपयोग होत नसल्याने आता चर्चा बस्स, आंदोलनच करायचे असे ठरवून इशारा देणारे निवेदन तयार केले. शुक्रवारी विक्रांत पाटील, बाबासाहेब पाटील-भुयेकर, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील, सुभाष महापुरे, आर. के. पाटील यांनी अधीक्षक अभियंता कावळे यांची भेट घेऊन त्यांना इशारा निवेदन दिले.यावेळी झालेल्या चर्चेत कावळे यांनी आम्ही महावितरणच्या मुंबई कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविले आहेत, पण आजपर्यंत त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. वरिष्ठांकडून आदेश आल्यास आम्ही शून्य वीजबिलासह, बिल दुरुस्ती व अन्य नुकसानभरपाईचा निर्णय घेऊ, असे सांगितले. शासनाच्या मागणीनुसार नवीन प्रस्ताव पाठविला आहे, त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.असा आहे सुधारित प्रस्तावसुरुवातीला साडेपंधरा कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता, पण स्वत: जिल्हाधिकाऱ्यांनी नेमकेपणे प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्याने नवीन १३ कोटी ८४ लाखांचा प्रस्ताव तयार केला आहे. तो मंजुरीसाठी पाठविला आहे. यात ट्रान्स्फॉर्मरसाठी २ कोटी ३८ लाख, डीपीसाठी १ कोटी ९३ लाख, एचटी केबल ४२ लाख, मोटार ६८ लाख, एलटी केबल ५ कोटी ५२ लाख, स्टार्टर ५८ लाख असा समावेश आहे.

मोटार बंद असतानाही वाढीव बिल आले कसे?या बैठकीत पाडळीचे कृषीपंपधारक गुणाजी जाधव यांनी दत्त पाणीपुरवठा संस्थेचे जूनमधील बिल ४ लाख ३ हजारांचे होते. पावसाळ््यात मोटार बंद असतानाही दोन महिन्यांपूर्वी ५ लाख ८३ हजारांचे बिल पाठविले आहे. दोन महिन्यांत १ लाख ८२ हजार कसे काय वाढले, ते सांगा असा प्रतिप्रश्नच अधीक्षक अभियंत्यांना केला. यावर अभियंता कावळे यांनी तक्रारी द्या, कारवाई करू असे सांगितले.

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरणkolhapurकोल्हापूर