शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

१८ वर्ष पूर्ण केलेल्या युवकांनी १०० टक्के मतदान करावे : विठ्ठल कांबळे

By अनिकेत घमंडी | Updated: March 7, 2024 15:51 IST

छत्रपती शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान प्रसंगी केले आवाहन

डोंबिवली: शिक्षकांची राष्ट्र घडविण्यात असलेली महत्वाची भूमिका, संविधानातील हक्कांबरोबर कर्तव्यांची करून द्यावयाची आठवण, भारताची होत असलेली प्रगती, लोकशाही सुदृढ करण्यासाठी प्रत्येक १८ वर्ष पूर्ण झालेल्यांनी मतदार यादीत आपली नोंद करून शंभर टक्के मतदान करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोकण प्रांत कार्यवाह विठ्ठल कांबळे यांनी कल्याणमध्ये राम मंदिर ते राष्ट्र मंदिर या विषयावर बोलतांना केले.

छत्रपती शिक्षण मंडळाने आयोजित केलेल्या कै. रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यान प्रसंगी कल्याणच्या नूतन विद्यालयाच्या पटांगणावर सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व कल्याणकर नागरिकांच्या विशाल जनसमुहासमोर ते बुधवारी बोलत होते. ते पुढे म्हणाले राम मंदिर ही केवळ सुरवात आहे. संत महात्मे, महाराज, उद्योगपती, कलाकार, राजकारणी, समाजकारणी, असे सगळे लोक होते. ते स्वतःही पत्नी समवेत मंदिरात होते. सर्व समाजातील घटकांना पुढे घेवून जाणारा तो सोहळा होता.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानात सांगितलेल्या "बंधुता" या तत्वाकडे आपल्याकडून दुर्लक्ष होत आहे". त्यांच्या भाषणात त्यांनी विविध विषयांना स्पर्श केला. त्यात वर्तणुकीतून सामाजिक समरसता या विविध मुद्दय़ांवर आपले विचार मांडले. याच समारंभात कै. परशुराम स.मराठे स्मृती शिक्षक निबंध स्पर्धेत पारितोषिक मिळविलेल्या शिक्षकांचा, परिक्षक प्रवीण देशमुख यांचा, तसेच आदर्श शिपाई, आदर्श शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच आदर्श मुख्याध्यापक यांचा सन्मान करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार जोशी यांनी आपल्या प्रास्ताविकात संस्थेचा परिचय करून दिला. शिक्षकांच्या समुहाने, महाराष्ट्र गीत, हम करे राष्ट्र आराधन, व संपूर्ण वंदेमातरम सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे सचिव डॉ. निलेश रेवगडे यांनी केले. उपाध्यक्ष प्रा. नारायण फडकेसर यांनी आभार मानले. कार्यक्रमास प्राचार्य अशोक प्रधान, जनता सहकारी बँकेचे संचालक ॲड. सुरेश पटवर्धन, बाबा जोशी, रा.स्व.संघ पदाधिकारी व स्वयंसेवक, संस्थेची कार्यकारीणी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी शेकडोंच्या संख्येत उपस्थित होते.