शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

यंदा १३ प्रवाशांचे आरपीएफने वाचविले प्राण, सर्वाधिक अपघात कल्याण स्थानकात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2020 01:30 IST

Kalyan News : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत.

डोंबिवली : मध्य रेल्वे आरपीएफचे जवान, तिकीट तपासणी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे कर्मचारी, शासकीय रेल्वे पोलीस आणि स्थानक कर्मचारी यांनी प्रसंगावधान राखून यंदाच्या वर्षात नोव्हेंबर महिन्यापर्यंत १३ लोकांचे प्राण वाचविले आहेत. २०१९ या वर्षात पुरुष आणि महिलांचे मिळून २१ जणांचे जीव वाचविले होते. यासाठी काही वेळा स्वत:चा जीव त्यांनी धोक्यात घातला होता. या अपघातांच्या बहुतांश घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात, सह प्रवाशांच्या मोबाइलद्वारे समाज माध्यमांवर वेळोवेळी व्हायरल झाल्या आहेत.या वर्षामध्ये, मुंबई उपनगरी मार्गावर अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे प्राण कल्याण स्टेशनवर वाचले. त्यापैकी बहुतेक जण लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये चढत अथवा उतरत होते. गेल्या वर्षीच्या २१ घटनांमध्ये दादर स्थानकात ७ आणि भायखळा, कुर्ला, कल्याण आणि कर्जत स्थानकांवर प्रत्येकी २ जणांचे प्राण वाचविण्यात आले.सतर्क असलेले आरपीएफ जवान निष्काळजीपणाने वागणाऱ्या, धावत्या गाड्यांमध्ये चढणाऱ्या लोकांचे प्राण वाचवतात. अनेकदा वैयक्तिक कारणांमुळे काही जण आत्महत्येचा प्रयत्न करताना आढळून आले आहे. प्रवाशांनी जीव धोक्यात न घातला शांततेने प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

जवानांचे काैतुक रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांना गुन्हेगारी कारवाया, हिंसाचार, प्रवाशांच्या आंदोलनांमुळे रेल्वे गाड्या चालवण्यातील अडथळा, रेल्वे प्रवासात हरवलेल्या मुलांना शोधणे आणि गाड्या व रेल्वे परिसरातील अमली पदार्थ जप्त करणे अशा विविध आव्हानांना सामोरे जावे लागते.  प्रवाशांच्या सुरक्षिततेवरही त्यांना बारीक नजर ठेवावी लागते. अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडतानाच ते रेल्वेतून पडणाऱ्या प्रवाशांचे जीव वाचविण्याचे कार्य करीत असल्याने रेल्वे प्रशासनाने त्यांचे विशेष कौतुक केले आहे. 

या वर्षामध्ये, मुंबई उपनगरी मार्गावर अशा प्रकारे १३ पैकी ६ प्रवाशांचे प्राण कल्याण स्टेशनवर वाचले.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेrailwayरेल्वे