शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
3
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
4
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
5
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
6
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
7
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
8
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
9
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
10
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
11
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
12
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
13
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
14
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
15
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
16
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
17
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
18
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
19
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!

संसार उद्ध्वस्त, तो उभा करण्यासाठी मदत करा; सप्तशृंगीच्या रहिवाशांची पुनर्वसनाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 10:12 IST

त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण :कल्याण पूर्वेतील चिकणी पाड्यातील सप्तशृंगी इमारत दुर्घटनेमुळे बेघर झालेल्या रहिवाशांनी गुरुवारी कल्याण-डोंबिवली पालिकेला भेट देत आपल्या पुनर्वसनाची मागणी केली. आमचा संसार उद्ध्वस्त झाला आहे. आम्हाला तो पुन्हा उभा करण्यासाठी मदत करा, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. इमारतीतील ५० कुटुंबांचे संसार रस्त्यावर आले. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली आहे. 

दुर्घटनाग्रस्त इमारतीच्या सेक्रेटरी रेखा पाठारे यांनी सांगितले की, हा आमचा मोर्चा नाही. आम्ही पालिकेस निवेदन द्यायला आलो आहोत. दुर्घटनेनंतर पालिकेने आम्हा रहिवाशांची तात्पुरती व्यवस्था नूतन विद्यामंदिर शाळेत केली. 

आता जून महिन्यात शाळा सुरू होणार आहेत. शाळा प्रशासनाला पावसाळ्यापूर्वी शाळेची डागडुजी करावी लागते. त्यामुळे रहिवासी तेथे फार काळ राहू शकत नाहीत. आमच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली पाहिजे. 

मदतीची रक्कम लवकर द्यावी 

पाठारे पुढे म्हणाल्या, सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर केली. ती रक्कम लवकर मिळावी. जे जखमी रुग्णालयात उपचार घेत आहेत, त्यांच्या उपचार खर्चासाठी सरकारने मदत द्यावी, अशी आमची मागणी आहे. पालिका आयुक्त अभिनव गोयल हे कामानिमित्त बाहेर असल्याने रहिवाशांची अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्याशी भेट झाली. आयुक्त गोयल शुक्रवारी दुपारी एक वाजता भेटतील, असे रहिवाशांना सांगण्यात आले.  

आपबिती सांगताना रडू कोसळले

आमचे पुनर्वसन केले पाहिजे. घटना घडली तेव्हा  आम्हाला १५ मिनिटांत घरातील पैसा, दागिने, कागदपत्रे काढण्यासाठी वेळ दिला होता. अनेक वर्षांचा मांडलेला संसार १५ मिनिटांत कसा बाहेर काढणार, असे त्या म्हणाल्या. आमच्या घरातील लोक मृत्युमुखी पडले. त्याला तिसरा दिवस झाला नाही तोच आम्ही घराबाहेर पडून पालिका गाठली आहे. हे सांगताना पाठारे यांना रडू कोसळले.  

टॅग्स :kalyanकल्याण