शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

मराठवाड्याला उल्हास नदीचे सांडपाणी पाजणार का?; उल्हास नदी बचाव कृती समितीचा प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 07:04 IST

सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालासाठी ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ रुपये खर्च येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लिंगायत म्हणाले.

कल्याण - बारमाही वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाण्याचा कोटा वाढवून द्यावा, अशी मागणी स्थानिक लाेकप्रतिनिधींकडून केली जाते. मात्र, ती मान्य करणे दूरच, पण राज्य सरकारने उल्हास नदीचे पाणी मराठवाड्याकडे वळवण्यासाठी एक समिती नेमली आहे. यामुळे स्थानिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

उल्हास नदीचे प्रदूषण आधी दूर करा, मग मराठवाड्याला पाणी वळते करा, अशा शब्दांत उल्हास नदी बचाव कृती समितीने सरकारच्या निर्णयाला विरोध केला.  नदीचे प्रदूषित पाणी मराठवाड्याला पाजणार का, असा सवालही त्यांनी विचारला विचारला. पश्चिम वाहिनी उल्हास नदी खोऱ्यातील ३४.८० टीएमसी, वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी असे एकूण ५४.७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्याकडे वळवणे शासनाच्या विचाराधीन आहे. त्यासाठी समिती स्थापनेचा प्रस्ताव ठाणे पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी संचालकांनी सादर केला होता.  त्यासाठी सर्वेक्षण करून प्रकल्प अहवालासाठी ६१ कोटी ५२ लाख ३० हजार १४६ रुपये खर्च येणार आहे. त्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, असे कृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लिंगायत म्हणाले.

उल्हास नदी राजमाचीच्या डोंगरातून उगम पावते. उगमानंतर कर्जतपासून ती प्रदूषित होत जाते. ती कल्याण खाडीला येऊन मिळते. नदीपात्रात सांडपाणी आणि रसायन कंपन्यांचे रसायनमिश्रित सांडपाणी सोडले जाते.  नदीपात्रालगत अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे आहेत.  त्यामुळे नदी प्रदूषित झाली आहे. 

प्रदूषण नियंत्रण मंडळाचा नाकर्तेपणा 

प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाकर्तेपणामुळे उल्हास नदी प्रदूषित झाली आणि तिला येऊन मिळणारी वालधुनी नदी मृत झाली. सरकारदरबारी पाठपुरावा करूनही नदीतील प्रदूषण दूर केले जात नाही. या नदीवर उदरनिर्वाह करणाऱ्या नदीकाठच्या लोकांचे काय? प्रदूषण दूर करण्यासाठी निधीची तरतूद न करता पाणी वळविण्यासाठी ६१ काेटी रुपयांची तरतूद करणे कितपत योग्य आहे, असा सवाल उल्हास नदी बचाव कृती समितीने केला आहे.