शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

डोंबिवलीतीलच का? सगळेच कारखाने हलवा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:38 IST

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीतील १५६ प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दोन आठवड्यांपूर्वी दिले.

मिलिंद बेल्हे

मुंबई माझी आई, तर डोंबिवली माझी मावशी आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल-परवाच सांगितले. खरे तर डोंबिवली हे त्यांचे आजोळ; पण २४ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या हाती सत्ता असूनही येथील पर्यावरण बिघडलेले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीतील १५६ प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दोन आठवड्यांपूर्वी दिले. रासायनिक सांडपाणी-वायूमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या या न्यायाने ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणपट्टीतील आणि पुढे राज्यातील प्रदूषणकारी उद्योगही बंद होणार, अशी आशा त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना वाटते. 

डोंबिवलीची एमआयडीसी पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. ही एमआयडीसी सुरू झाल्यापासून तिचा बफर झोन पाळला नाही. पुढे या औद्योगिक वसाहतीला खेटून निवासी वसाहत झाली. काही बंद कारखान्यांच्या जागेवर इमारती उभ्या राहिल्या. अनेक लघु उद्योग, पूरक उद्योग, सेवा सुरू झाले. कामगारांच्या वसाहती आल्या. या साऱ्या आता रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे न्याव्या असा सरकारचा आदेश आहे. अशा पद्धतीने ५०-५० वर्षांचे उद्योग हलविणे हा पोरखेळ आहे का? प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर उद्योग हटवण्याच्या मागणीने जोर धरला. कारखान्यांच्या स्थलांतराचे आश्वासन देण्यात आले आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

एमआयडीसीला खेटून एकीकडे शीळपर्यंत आणि दुसरीकडे पत्री पुलापर्यंत अनेक भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिका, एमएमआरडीएचे विकास प्रकल्प कागदावर तयार आहेत. तेथून मेट्रो जाणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर जाईल. काटई ते ऐरोली मार्ग पूर्ण होईल. तेथून बुलेट ट्रेनचे म्हातार्डी स्टेशन जवळ असेल. तासाभरावर नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या साऱ्यांना भाव न मिळण्यास कारण ठरत होती, ही प्रदूषणकारी औद्योगिक वसाहत. आता कारखाने हटवल्यावर उत्तुंग इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस, मॉलसाठी भरपूर मोकळी जागा उपलब्ध होईल. बिल्डर लॉबी खुश होईल व काही कारखानदारही. कारण काही उद्योग बंद करण्याचे नियोजन असूनही जागा जाईल या भीतीपोटी ते करता येत नव्हते. 

जागा सोन्याची खाण ठरतील

  • आमचे वय झाले आहे, कामगारांचे वय झाले आहे... आता पाताळगंगेपर्यंतचा प्रवास कसा होणार, असा सूर आताच अनेक कारखानदारांनी लावला आहे. 
  • त्यामुळे देणी देऊन जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईतील गिरण्यांच्या जमिनींप्रमाणे या जागा सोन्याची खाण ठरतील. यात कामगार भरडला जाईल. 
  • कारखाना जगला तर कामगार जगेल, हे शिवसेनेच्या कामगार संघटनेचे ब्रीद; पण कारखानाच अस्तित्वात नसेल तर या वचनाला जागण्याची वेळ कुणावर येणार नाही!
टॅग्स :dombivaliडोंबिवली