शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

डोंबिवलीतीलच का? सगळेच कारखाने हलवा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2022 10:38 IST

उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीतील १५६ प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दोन आठवड्यांपूर्वी दिले.

मिलिंद बेल्हे

मुंबई माझी आई, तर डोंबिवली माझी मावशी आहे, असे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल-परवाच सांगितले. खरे तर डोंबिवली हे त्यांचे आजोळ; पण २४ वर्षांहून अधिक काळ शिवसेनेच्या हाती सत्ता असूनही येथील पर्यावरण बिघडलेले आहे. त्यामुळे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीतील १५६ प्रदूषणकारी कारखाने बंद करण्याचे आदेश दोन आठवड्यांपूर्वी दिले. रासायनिक सांडपाणी-वायूमुळे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याने त्यांनी हा निर्णय घेतला. एमआयडीसीच्या या न्यायाने ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडसह संपूर्ण कोकणपट्टीतील आणि पुढे राज्यातील प्रदूषणकारी उद्योगही बंद होणार, अशी आशा त्या त्या ठिकाणच्या नागरिकांना वाटते. 

डोंबिवलीची एमआयडीसी पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहे. ही एमआयडीसी सुरू झाल्यापासून तिचा बफर झोन पाळला नाही. पुढे या औद्योगिक वसाहतीला खेटून निवासी वसाहत झाली. काही बंद कारखान्यांच्या जागेवर इमारती उभ्या राहिल्या. अनेक लघु उद्योग, पूरक उद्योग, सेवा सुरू झाले. कामगारांच्या वसाहती आल्या. या साऱ्या आता रायगड जिल्ह्यातील पाताळगंगा येथे न्याव्या असा सरकारचा आदेश आहे. अशा पद्धतीने ५०-५० वर्षांचे उद्योग हलविणे हा पोरखेळ आहे का? प्रोबेस कंपनीतील स्फोटानंतर उद्योग हटवण्याच्या मागणीने जोर धरला. कारखान्यांच्या स्थलांतराचे आश्वासन देण्यात आले आणि पालिका निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय जाहीर करण्यात आला. 

एमआयडीसीला खेटून एकीकडे शीळपर्यंत आणि दुसरीकडे पत्री पुलापर्यंत अनेक भव्य गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली पालिका, एमएमआरडीएचे विकास प्रकल्प कागदावर तयार आहेत. तेथून मेट्रो जाणार आहे. विरार-अलिबाग कॉरिडॉर जाईल. काटई ते ऐरोली मार्ग पूर्ण होईल. तेथून बुलेट ट्रेनचे म्हातार्डी स्टेशन जवळ असेल. तासाभरावर नवी मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ असेल. या साऱ्यांना भाव न मिळण्यास कारण ठरत होती, ही प्रदूषणकारी औद्योगिक वसाहत. आता कारखाने हटवल्यावर उत्तुंग इमारती, कॉर्पोरेट ऑफिसेस, मॉलसाठी भरपूर मोकळी जागा उपलब्ध होईल. बिल्डर लॉबी खुश होईल व काही कारखानदारही. कारण काही उद्योग बंद करण्याचे नियोजन असूनही जागा जाईल या भीतीपोटी ते करता येत नव्हते. 

जागा सोन्याची खाण ठरतील

  • आमचे वय झाले आहे, कामगारांचे वय झाले आहे... आता पाताळगंगेपर्यंतचा प्रवास कसा होणार, असा सूर आताच अनेक कारखानदारांनी लावला आहे. 
  • त्यामुळे देणी देऊन जागा विकसित करण्याचा निर्णय घेतला जाईल. मुंबईतील गिरण्यांच्या जमिनींप्रमाणे या जागा सोन्याची खाण ठरतील. यात कामगार भरडला जाईल. 
  • कारखाना जगला तर कामगार जगेल, हे शिवसेनेच्या कामगार संघटनेचे ब्रीद; पण कारखानाच अस्तित्वात नसेल तर या वचनाला जागण्याची वेळ कुणावर येणार नाही!
टॅग्स :dombivaliडोंबिवली