शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
2
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
3
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
4
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
5
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
6
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
7
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
8
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
9
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
10
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
11
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
12
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
13
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
14
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
15
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
16
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
17
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
18
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
19
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
20
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
Daily Top 2Weekly Top 5

गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करु घेऊ नये, असे मनसे आमदार राजू पाटील का म्हणाले?

By मुरलीधर भवार | Updated: September 2, 2024 17:59 IST

कल्याण- १४ गावांबद्दल गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. त्यांची मागणी ...

कल्याण- १४ गावांबद्दल गणेश नाईक यांच्या त्या वक्तव्याचा गैरसमज करुन घेऊ नये. त्यांच्या काही अटी शर्ती आहेत. त्यांची मागणी देखील रास्त आहे. परंतू त्याचा अर्थ असा नाही की, गणेश नाईक यांनी १४ गावांना नवी मुंबईत समाविष्ट करुन घेण्यास आणि विकासाला विरोध केला आहे असा त्याचा अर्थ होत नाही. तर गणेश नाईक हे सकारात्मक आहेत. गावांचा विकास कुठे थांबणार नाही. मी स्वत: मुखमंत्र्यांना भेटून विकास निधी मंजूर करुन घेणार. त्या गावात विकास कामे सुरु होणार, अशी भूमिका मनसे आमदार राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

आमदार पाटील यांनी सांगिले की, गणेश नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊली. त्यात त्यांनी १४ गावे नवी मुंबईत घेतली आहेत. त्याबाबतीत त्यांच्या काही अटी शर्ती आहे. त्याची पूर्तता झाल्या शिवाय ही महापालिकेत गावे घेऊ नये. विकास कामे सुरु करु नये. खरे तर नाईक यांची ही भूमिका महत्वाची आहे. १४ गावातील नागरीकांचे ऐकून त्यांनी समर्थन केले आहे. विधी मंडळात २४ मार्च २०२२ रोजी मी प्रश्न मांडला. नाईक हे तेव्हाही बोलले होते. महापालिका आयुक्तांनी जे पत्र दिले होते. त्यात स्पष्ट म्हटले होते. ५९१ कोटी गावांच्या विकासासाठी आणि ६ हजार ९०० कोटी रुपये गावाच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी देण्यात यावे. तीच मागणी ते पुढे रेटत आहे. या गावातील नागरीकांचा गैरसमज झाला आहे. नाईक यांचा ही गावे काढण्यास विरोध आहे का ? तर नाही. त्यामुळे माझे असे ठाम मत आहे की नाईक यांचा त्याला विरोध नाही. त्यांची मागणी रास्त आहे. परंतू हा पैसा एकदम असा ठपकन येऊन पडणार नाही. टप्प्या टप्प्याने विकास कामे सुरुही होतील. मुख्यमंत्रीनी ७० कोटी रुपये नगरविकास खात्याकडून आणि ७० कोटी रुपये एमएमआरडीएच्या माध्यमातून मंजूर केले होते. ही कामे सुरु करण्यासाठी एक निधी वितरीत करावा. आडीवली भूतविली रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी निधी द्यावा. महापालिका आयुक्तांना भेटलो होतो. १४ गावे आणि तळोजा रोडला जोडणारा एक स्पाईन रोड हवा आहे. त्याला काही काळ जाणार आहे. तेव्हढा काळ ही गावांना विकासापासून ताटकळत ठेवणे याेग्य होणार नाही. त्या रस्त्याचा प्रस्तावही टाकण्यास सांगू. ही कामे होणार आहेत.

आम्ही नाईक यांची समजूत काढणार आहोत. त्यांना आम्ही समजून घेतले आहे. ते ही आम्हाला समजून घेतील. भावना दोघांची सारखीच आहे. त्यांचे म्हणणे यासाठी रास्त वाटते की, नवी मुंबई महापालिकेतील नागरीकांचा गेली २० वर्षे ट’क्स वाढलेला नाही. त्या लोकांवर त्यांना बोजा टाकायचा नाही. ते काही चूकत नाही. इथली कामे सुुरु झाल्यावर त्या कामाकरीता सरकारकडून पैसा आल्यावर तो बोझा नवी मुंबईतील नागरीकावर पडणार नाही. जी लोकसंख्या प्रिडीक्ट करीत आहे. तेव्हढी लोकसंख्या या १४ गावाची नाही. नवी मुंबई ही देशातील मोठी महापालिका आहे. त्या ठिकाणी ही अतिक्रमणाचा विषय आहे. तो जसा टप्प्या टप्प्याने संपणार आहे. नाईक एक मवाळ भूमिका घ्यावी. आमचे आणि आमच्या समाजाचे ते नेते आहेत. त्यांच्या भूमिकेला पाठींबा देत मुख्यमंत्र्यांकडून जास्तीत जास्त निधी या १४ गावांच्या विकासाला कसा येईल यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसे