शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीतील नगरविकासाची अपूर्ण कामे पूर्ण कधी करणार?; रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:37 IST

मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचं म्हणत लगावला टोला.

ठळक मुद्देमागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचं म्हणत लगावला टोला.माध्यमांसमोर चव्हाण यांनी मांडली अपूर्ण कामांची जंत्री.

डोंबिवली: "पालकमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही गेली सात वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहात. तुमच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. गेली दोन वर्षे या नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून शिंदेंनी केडीएमसीसंबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे डोंबिवलीकल्याण अंबरनाथ या शहरांनी आपल्याला आणि आपल्या पक्षाला गेली २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे इथल्या नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते," असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला. व्यस्त कार्यभारामुळे या महापालिकेकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे म्हणूनच नगरविकास खात्या अंतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे ते म्हणाले.

माध्यमांसमोर त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली. "प्रमुख्याने सूतिकागृह पुनर्विकास कामासाठी चालना २१ ऑक्टोबर २०१४ ला मिळाली. महापालिका महासभा ठराव २० नोव्हेंबर २१६ रोजी झाला. चार वेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेयर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० रोजी देकार आला. सात वर्षे झाली सूतिकागृहाचे बाळंतपण कधी? आयुक्त सूर्यवंशी आणि कायदा विभागाचे अधिकारी सूर्यवंशी या दोन्ही अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणाचा जाच सूतिकागृहाला किती काळ सहन करावा लागणार?," असा सवाल चव्हाण यांनी केला.

मोठागाव-माणकोली पुलाचं बांधकाम कधी?"मोठागाव माणकोली पुलाचे बांधकामाकरीता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटी निधी दिला होता. त्या पुलाचे बांधकाम कधी होणार? कल्याण शीळ रोडच्या काँक्रिटीकरण व विस्तारासाठी मंजुरी आणि ७७३ कोटी निधीला मंजुरी दिला होती अजूनही काम पूर्ण का होत नाही? अजून किती अंत पाहणार? राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या केडीएमसीमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाच्या रिंग रोडच्या दुर्गाडी मोठागाव हेदुटणे मार्गाचे बांधकाम कधी होणार? अत्यंत महत्वाकांक्षी अशा ऐरोली काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरु झाले. त्यांनीच ९४४ कोटी निधी मंजूर केला या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार? ४७३८ कोटी खर्चाच्या मेट्रो १२ म्हणजेच कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाचा विसर पडला नाही ना?," असा सवाल त्यांनी केला. ८४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी कल्याण मेट्रोचे काम प्रगतीपथावर केव्हा ? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटी निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे? असा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला. 

उत्तराची अपेक्षा नाही

केडीएमसी क्षेत्रातील दुचाकीस्वारांना रस्त्यांवरील खड्ड्यात पडून जीव गमावले आहेत त्यामुळे रस्त्यांचे काम प्रलंबित ठेवून अजून किती जीव धोक्यात टाकणार आहात? अर्धवट अवस्थेतील जोशी हायस्कुल पुलाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याला उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी मंजूर कधी करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटी खर्चापैकी २५ कोटीचा भार एमएमआरडीएने करण्याबाबत अडचण कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्वाचे असे टिटवाळ्यात मेडिकल कॉलेजकरिता जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार ? अंतिमतः उत्तराची अपेक्षा ठेवत नाही. कामे पूर्णपणे पार पडली म्हणजे झाले असा टोलाही चव्हाण यांनी शिंदे यांना लगावला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे