शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डोंबिवलीतील नगरविकासाची अपूर्ण कामे पूर्ण कधी करणार?; रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 17:37 IST

मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचं म्हणत लगावला टोला.

ठळक मुद्देमागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचं म्हणत लगावला टोला.माध्यमांसमोर चव्हाण यांनी मांडली अपूर्ण कामांची जंत्री.

डोंबिवली: "पालकमंत्री एकनाथ शिंदे तुम्ही गेली सात वर्षे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून कार्यरत आहात. तुमच्या मंत्रिपदाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्याला नगरविकाससारखे शहराच्या दृष्टीने महत्त्वाचे खाते प्रथमच मिळाले आहे. गेली दोन वर्षे या नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून शिंदेंनी केडीएमसीसंबंधित विषय अजूनही प्रलंबित ठेवले आहेत. वास्तविकपणे, ठाणे डोंबिवलीकल्याण अंबरनाथ या शहरांनी आपल्याला आणि आपल्या पक्षाला गेली २५ वर्षे एकहाती सत्ता दिली. त्यामुळे इथल्या नागरिकांचे जीवन सुसह्य करणे आपले कर्तव्य ठरते," असा टोला आमदार रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत लगावला. व्यस्त कार्यभारामुळे या महापालिकेकडे त्यांचे सपशेल दुर्लक्ष होत आहे म्हणूनच नगरविकास खात्या अंतर्गत मागील सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी करण्याचे स्मरण करून देत असल्याचे ते म्हणाले.

माध्यमांसमोर त्यांनी अपूर्ण प्रकल्पांच्या कामांची जंत्रीच मांडली. "प्रमुख्याने सूतिकागृह पुनर्विकास कामासाठी चालना २१ ऑक्टोबर २०१४ ला मिळाली. महापालिका महासभा ठराव २० नोव्हेंबर २१६ रोजी झाला. चार वेळा स्वारस्य देकार काढले. अखेर २५ फेब्रुवारी २०२० एकच स्वारस्य देकार आला. रुबी हेल्थकेयर व आशर बिल्डर्स यांचा ९ नोव्हेंबर २०२० रोजी देकार आला. सात वर्षे झाली सूतिकागृहाचे बाळंतपण कधी? आयुक्त सूर्यवंशी आणि कायदा विभागाचे अधिकारी सूर्यवंशी या दोन्ही अधिकाऱ्यांचा वेळकाढूपणाचा जाच सूतिकागृहाला किती काळ सहन करावा लागणार?," असा सवाल चव्हाण यांनी केला.

मोठागाव-माणकोली पुलाचं बांधकाम कधी?"मोठागाव माणकोली पुलाचे बांधकामाकरीता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या विशेषाधिकारात २२३ कोटी निधी दिला होता. त्या पुलाचे बांधकाम कधी होणार? कल्याण शीळ रोडच्या काँक्रिटीकरण व विस्तारासाठी मंजुरी आणि ७७३ कोटी निधीला मंजुरी दिला होती अजूनही काम पूर्ण का होत नाही? अजून किती अंत पाहणार? राज्य शासनाने मंजुरी दिलेल्या केडीएमसीमधील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेसाठी महत्वाच्या रिंग रोडच्या दुर्गाडी मोठागाव हेदुटणे मार्गाचे बांधकाम कधी होणार? अत्यंत महत्वाकांक्षी अशा ऐरोली काटई भुयारी व उन्नत मार्गाचे काम फडणवीसांच्या हस्ते सुरु झाले. त्यांनीच ९४४ कोटी निधी मंजूर केला या मार्गाचे काम कधी पूर्ण होणार? ४७३८ कोटी खर्चाच्या मेट्रो १२ म्हणजेच कल्याण तळोजा मेट्रोच्या कामाचा विसर पडला नाही ना?," असा सवाल त्यांनी केला. ८४१६ कोटी खर्चाच्या मेट्रो ५ म्हणजेच भिवंडी कल्याण मेट्रोचे काम प्रगतीपथावर केव्हा ? एमएमआरडीएच्या माध्यमातून ४७२ कोटी निधीतून केडीएमसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांचे काम दीड वर्षांपासून प्रलंबित का ठेवले आहे? असा सवालही चव्हाण यांनी यावेळी केला. 

उत्तराची अपेक्षा नाही

केडीएमसी क्षेत्रातील दुचाकीस्वारांना रस्त्यांवरील खड्ड्यात पडून जीव गमावले आहेत त्यामुळे रस्त्यांचे काम प्रलंबित ठेवून अजून किती जीव धोक्यात टाकणार आहात? अर्धवट अवस्थेतील जोशी हायस्कुल पुलाचे लोकार्पण आपल्याच हस्ते झाले. ठाकुर्ली ९० फुटी रस्त्याला उन्नत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाला ३० कोटी निधी मंजूर कधी करणार? मोठागाव रेल्वे क्रॉसिंगच्या डीएफसीसी पुलाच्या ५० कोटी खर्चापैकी २५ कोटीचा भार एमएमआरडीएने करण्याबाबत अडचण कोण सोडवणार? कल्याण तालुक्यासाठी महत्वाचे असे टिटवाळ्यात मेडिकल कॉलेजकरिता जागा अधिग्रहित करण्याचे काम कधी करणार ? अंतिमतः उत्तराची अपेक्षा ठेवत नाही. कामे पूर्णपणे पार पडली म्हणजे झाले असा टोलाही चव्हाण यांनी शिंदे यांना लगावला.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीMaharashtraमहाराष्ट्रEknath Shindeएकनाथ शिंदे