शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

नागरिकांच्या घरात पाणीच-पाणी, अर्ध्या तासाच्या पावसांतच उद्भवते समस्या

By ओमकार संकपाळ | Updated: July 7, 2022 17:07 IST

पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली

कल्याण - कल्याण मलंग रस्त्याच्या लगत असलेल्या द्वारली गावानजीक उभारण्यात आलेल्या इमारतीमुळे नैसर्गिक नाल्याचे प्रवाह खुंटले आहेत. त्यामुळे अर्धा तास जरी पाऊस पडला तरी द्वारली गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. घरात पाणी शिरल्यावर नागरीकांना बाहेरच आसरा घ्यावा लागतो. या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी घाव घेऊन ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी प्रभाग अधिकारीही उपस्थित होते. 

पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश सचिव केणे यांनी सांगितले की, द्वारली गावातील नागरीकांना पावसाळ्य़ात हा त्रस सहन करावा लागतो. त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. पावसाचे घाण पाणी घरात शिरल्याने घरातील वस्तू खराब होता. या ठिकाणी नैस्सर्गिक प्रवाह बांधकामांमुळे खुंटले आहे. त्यावर प्रशासनाने तोडगा काढून नागरीकांची समस्या सोडविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. 

सर्वपक्षीय युवा मोर्चाचे गजानन पाटील यांनी सांगितले की, 27 गावातील दिवा संदप आणि उसरघर याठिकाणी अशा प्रकारचे एका बिल्डरकडून रस्ता आडविला गेला होता. तशाच स्वरुपाची द्वारली या गावातील समस्या आहे. त्यावर प्रशासनाकडून तोडगा काढला जावा. पदाधिकारी भाऊ पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला की, द्वारलीतील नागरीकांच्या घरात पावसाळ्य़ात पाणी शिरण्याची समस्या 2018 पासून सतावित आहे. अर्धा तासाचा पाऊस पडला तरी या लोकांना रस्त्यावर येऊन पाणी ओसण्याची वाट पाहावी लागते. या प्रश्नाकडे प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली जाते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

दरम्यान, प्रभाग अधिकारी संजय साबळे हे देखील आजच्या पाहणी प्रसंगी उपस्थित होते. नैसर्गिक प्रवाह खुटला आहे. त्याठिकाणी कार्यवाही करण्यासाठी आल्यावर नागरीकांकडून विरोध केला जातो. त्यांच्याकडून सहकार्य मिळाल्यास यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणthaneठाणे