शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नागरिकांच्या घरात पाणीच-पाणी, अर्ध्या तासाच्या पावसांतच उद्भवते समस्या

By ओमकार संकपाळ | Updated: July 7, 2022 17:07 IST

पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली

कल्याण - कल्याण मलंग रस्त्याच्या लगत असलेल्या द्वारली गावानजीक उभारण्यात आलेल्या इमारतीमुळे नैसर्गिक नाल्याचे प्रवाह खुंटले आहेत. त्यामुळे अर्धा तास जरी पाऊस पडला तरी द्वारली गावातील नागरिकांच्या घरात पाणी शिरते. घरात पाणी शिरल्यावर नागरीकांना बाहेरच आसरा घ्यावा लागतो. या गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश सचिव संतोष केणे यांनी घाव घेऊन ग्रामस्थांसह पाहणी केली. यावेळी प्रभाग अधिकारीही उपस्थित होते. 

पाण्याच्या या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून ग्रामस्थांना दिलासा द्यावा अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. प्रदेश सचिव केणे यांनी सांगितले की, द्वारली गावातील नागरीकांना पावसाळ्य़ात हा त्रस सहन करावा लागतो. त्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरते. पावसाचे घाण पाणी घरात शिरल्याने घरातील वस्तू खराब होता. या ठिकाणी नैस्सर्गिक प्रवाह बांधकामांमुळे खुंटले आहे. त्यावर प्रशासनाने तोडगा काढून नागरीकांची समस्या सोडविण्याची मागणी महापालिका आयुक्तांकडे करण्यात येणार आहे. 

सर्वपक्षीय युवा मोर्चाचे गजानन पाटील यांनी सांगितले की, 27 गावातील दिवा संदप आणि उसरघर याठिकाणी अशा प्रकारचे एका बिल्डरकडून रस्ता आडविला गेला होता. तशाच स्वरुपाची द्वारली या गावातील समस्या आहे. त्यावर प्रशासनाकडून तोडगा काढला जावा. पदाधिकारी भाऊ पाटील यांनी मुद्दा उपस्थित केला की, द्वारलीतील नागरीकांच्या घरात पावसाळ्य़ात पाणी शिरण्याची समस्या 2018 पासून सतावित आहे. अर्धा तासाचा पाऊस पडला तरी या लोकांना रस्त्यावर येऊन पाणी ओसण्याची वाट पाहावी लागते. या प्रश्नाकडे प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली जाते. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. 

दरम्यान, प्रभाग अधिकारी संजय साबळे हे देखील आजच्या पाहणी प्रसंगी उपस्थित होते. नैसर्गिक प्रवाह खुटला आहे. त्याठिकाणी कार्यवाही करण्यासाठी आल्यावर नागरीकांकडून विरोध केला जातो. त्यांच्याकडून सहकार्य मिळाल्यास यावर तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Rainपाऊसkalyanकल्याणthaneठाणे