शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:52 IST

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे

ठळक मुद्देमोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे

डोंबिवली : आठ महिन्यांपासून एमआयडीसीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची जलवाहनी टाकण्याचे काम सुरू असून ते कूर्मगतीने सुरू असल्याने उच्चभ्रू रिजन्सी गृहसंकुलातील रिजन्सी इस्टेट को ऑप. हौसिंग सोसायटीमधील ५ हजार रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्रस्त रहिवाशांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून काहिही फायदा न झाल्याने गुरुवारी एमआयडीसीवर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. त्या रहिवाशांचे प्रतिनिधी, सोसायटीचे अध्यक्ष हर्षल हंचाटे, सचिव चंद्रहास चौधरी, वर्किंग कमिटी सदस्य सचिन म्हात्रे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. 

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. उरलेले सुमारे साडेचार लाख लिटर पाणी आम्ही ८ महिने ४८ टँकर रोजच्या रोज मागवून गरज भागवत आहोत. एवढी महिने काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. ३० जून अखेरीस त्या कामाची डेडलाईन होती, परंतु कोणीही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या तीव्र झाली असून आबालवृद्ध हैराण झाले आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांनी स्वत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून गुरुवारी आंदोलन करण्यात आल्याचे चौधरी म्हणाले. ४८ टँकर मागवण्यासाठी ८० हजार रुपये रोजचा खर्च असून तो उभा करताना नाकी नऊ आले असून समस्या सुटण्याची चिन्ह दिसत नसल्याने नागरिक संतापले आहेत. 

नेमके ते काम कधी संपणार आणि निवासी, कंपन्यांसाठी स्वतंत्र जलवाहिनी असे साचेबद्ध काम होणार आहे का? तसेच आतापर्यंत प्रतिदिन झालेला ८० हजार रुपये खर्च आणि त्यासोबतच साडेचार लाख लिटर पाणी कमी मिळत असल्याने या सर्व बाबींचा विचार करुन एमआयडीसीने गृहसंकुलातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पाणी नाही, टँकर नाही, कर तर वसूल होणारच मग त्याचा त्रास नागरिकांना का? पदरमोड करून पैसे उभा करायचा आणि त्यातून मानसिक त्रास घ्यायचा हे कोणी सांगितलं, असा सवालदेखील गृहिणींनी केला. समस्या संदर्भात पत्र पाठवून देखील अधिकारी जागेवर येत नाहीत समस्या सुटेल तरी कशी? आंधळ दळत....अशी स्थिती झाली असून त्याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. समस्या सोडवण हे यंत्रणाच काम आहे, त्या सुटल्याच पाहिजेत अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेत एमआयडीसीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

रहिवासी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यापैकी काही नागरिकांना कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी बोलावले.पाटील यांनी समस्या समजावून घेत दोन दिवसात अधिकारी पाठवून ती समस्या मार्गी लावण्यासाठी हालचाल।करण्यात येईल असे सांगितले. तसेच पाटील यांनी शुक्रवारी त्या पदाचा पदभार घेतला असल्याने त्यांना नेमक्या सुरू असलेल्या कामाबाबत तसेच येथील समस्यांबाबत माहिती घेऊन कार्यवाही करायला काहीसा अवधी लागेल हे सामाजिक बांधिलकी म्हणून समजून घेत असल्याचे त्यावेळी रहिवाश्यांनी स्पष्ट केले.परंतु समस्या न सुटल्यास मात्र निषेधाचे स्वरूप तीव्र असेल असेही सांगण्यात आले. तसेच जलवाहिनी नव्याने टाकताना रहिवासी आणि परिसरातील कंपन्या यांचे स्वतंत्र जलवाहिनी असायला हवीत, सध्याचा पाणी तुटवडा कसा सोडवायचा, टँकर कोणी पाठवायचे याबाबत निर्णय व्हावा आदी मागण्या रहिवाशांनी केल्या. त्यावर निश्चित तोडगा काढला जाईल असे अश्वासन मिळाल्यानंतर नागरिक माघारी फिरले.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणWaterपाणी