शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार रहिवाशांना भेडसावतेय पाणीटंचाई, संतप्त नागरिकांचा एमआयडीसीवर मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2021 18:52 IST

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे

ठळक मुद्देमोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे

डोंबिवली : आठ महिन्यांपासून एमआयडीसीच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याची जलवाहनी टाकण्याचे काम सुरू असून ते कूर्मगतीने सुरू असल्याने उच्चभ्रू रिजन्सी गृहसंकुलातील रिजन्सी इस्टेट को ऑप. हौसिंग सोसायटीमधील ५ हजार रहिवाशांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्रस्त रहिवाशांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करून काहिही फायदा न झाल्याने गुरुवारी एमआयडीसीवर मोर्चा काढून निषेध व्यक्त केला. त्या रहिवाशांचे प्रतिनिधी, सोसायटीचे अध्यक्ष हर्षल हंचाटे, सचिव चंद्रहास चौधरी, वर्किंग कमिटी सदस्य सचिन म्हात्रे आदींच्या मार्गदर्शनाखाली हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. 

मोर्चा संदर्भात चौधरी यांनी सांगितले की, गेले ८ महिने पाण्याची समस्या भेडसावत आहे. त्या ठिकणी दिवसाला ९.५ लाख लिटर पाण्याची गरज असून सध्या काही महिने तेथे एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणी पुरवठ्यामधून अवघा ५ लाख लिटर पाणी पुरवठा होत आहे, त्यामुळे पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. उरलेले सुमारे साडेचार लाख लिटर पाणी आम्ही ८ महिने ४८ टँकर रोजच्या रोज मागवून गरज भागवत आहोत. एवढी महिने काम सुरू असून अद्याप ते पूर्ण झालेले नाही. ३० जून अखेरीस त्या कामाची डेडलाईन होती, परंतु कोणीही अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे समस्या तीव्र झाली असून आबालवृद्ध हैराण झाले आहेत. त्यापैकी ज्येष्ठ नागरिकांनी स्वत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आणि त्या माध्यमातून गुरुवारी आंदोलन करण्यात आल्याचे चौधरी म्हणाले. ४८ टँकर मागवण्यासाठी ८० हजार रुपये रोजचा खर्च असून तो उभा करताना नाकी नऊ आले असून समस्या सुटण्याची चिन्ह दिसत नसल्याने नागरिक संतापले आहेत. 

नेमके ते काम कधी संपणार आणि निवासी, कंपन्यांसाठी स्वतंत्र जलवाहिनी असे साचेबद्ध काम होणार आहे का? तसेच आतापर्यंत प्रतिदिन झालेला ८० हजार रुपये खर्च आणि त्यासोबतच साडेचार लाख लिटर पाणी कमी मिळत असल्याने या सर्व बाबींचा विचार करुन एमआयडीसीने गृहसंकुलातील रहिवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. पाणी नाही, टँकर नाही, कर तर वसूल होणारच मग त्याचा त्रास नागरिकांना का? पदरमोड करून पैसे उभा करायचा आणि त्यातून मानसिक त्रास घ्यायचा हे कोणी सांगितलं, असा सवालदेखील गृहिणींनी केला. समस्या संदर्भात पत्र पाठवून देखील अधिकारी जागेवर येत नाहीत समस्या सुटेल तरी कशी? आंधळ दळत....अशी स्थिती झाली असून त्याला जबाबदार कोण? अशी संतप्त प्रतिक्रिया ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केली. समस्या सोडवण हे यंत्रणाच काम आहे, त्या सुटल्याच पाहिजेत अशी ठाम भूमिका नागरिकांनी घेत एमआयडीसीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. 

रहिवासी मोठ्या प्रमाणात आल्यानंतर एमआयडीसी अधिकाऱ्यांनी त्यापैकी काही नागरिकांना कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांच्या समवेत चर्चा करण्यासाठी बोलावले.पाटील यांनी समस्या समजावून घेत दोन दिवसात अधिकारी पाठवून ती समस्या मार्गी लावण्यासाठी हालचाल।करण्यात येईल असे सांगितले. तसेच पाटील यांनी शुक्रवारी त्या पदाचा पदभार घेतला असल्याने त्यांना नेमक्या सुरू असलेल्या कामाबाबत तसेच येथील समस्यांबाबत माहिती घेऊन कार्यवाही करायला काहीसा अवधी लागेल हे सामाजिक बांधिलकी म्हणून समजून घेत असल्याचे त्यावेळी रहिवाश्यांनी स्पष्ट केले.परंतु समस्या न सुटल्यास मात्र निषेधाचे स्वरूप तीव्र असेल असेही सांगण्यात आले. तसेच जलवाहिनी नव्याने टाकताना रहिवासी आणि परिसरातील कंपन्या यांचे स्वतंत्र जलवाहिनी असायला हवीत, सध्याचा पाणी तुटवडा कसा सोडवायचा, टँकर कोणी पाठवायचे याबाबत निर्णय व्हावा आदी मागण्या रहिवाशांनी केल्या. त्यावर निश्चित तोडगा काढला जाईल असे अश्वासन मिळाल्यानंतर नागरिक माघारी फिरले.  

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाkalyanकल्याणWaterपाणी