शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

खासदार श्रीकांत शिंदे यांना मत म्हणजेच दि. बा. पाटील यांना खरी श्रद्धांजली- अतुल पाटील

By मुरलीधर भवार | Updated: May 10, 2024 22:31 IST

दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर

मुरलीधर भवार, डोंबिवली: लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव मंजूर करून केंद्राकडे पाठवला आहे. त्यामुळे दि. बा. पाटील साहेबांना मानणाऱ्या प्रत्येकाने आपले मत डॉ. श्रीकांत शिंदे यांनाच द्यावे, हीच दि. बा। पाटील यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे आवाहन लोकनेते दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी केले. अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीच्या वतीने आज कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार  यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यानंतर डोंबिवली येथे माध्यमांना प्रतिक्रिया देताना अतुल पाटील यांनी हे आवाहन केले.

यापूर्वीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यायला ते तयार नव्हते. त्यांचे सरकार अल्पमतात आल्यानंतर त्यांनी नाईलाजाने घाईघाईत मंत्रिमंडळ बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला, मात्र त्याला कायदेशीर मान्यता नव्हती. मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होताच त्यांनी हा ठराव विधानसभा आणि विधानपरिषदेत बहुमताने मंजूर करून घेतला आणि केंद्राकडे पाठवला. आता केंद्र सरकारही याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेईल, असा विश्वास अखिल भारतीय आगरी समाज परिषद आणि लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे सदस्य, आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केला. तसेच फक्त विमानतळच नव्हे, तर कोकण पट्ट्यातील आमचे सगळे प्रश्न सोडवण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले आहे. त्यामुळे आज आज शिंदे हे निवडणुकीला उभे असताना आम्हाला ज्यांनी पाठिंबा दिला, त्यांना पाठिंबा देणे हे आमचे कर्तव्य असल्याची भावना रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त केली.

आगरी समाजाला एकनाथ शिंदे आणि खास शिंदे यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बळ मिळाल्याचेही ते म्हणाले. तसेच आमचा आगरी समाज म्हणून खासदार शिंदे यांना भक्कम पाठिंबा असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी अखिल भारतीय आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष दशरथ पाटील, लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष अतुल पाटील, आगरी समाजातील ज्येष्ठ नेते रामशेठ ठाकूर, गुलाब वझे, विनोद म्हात्रे, दशरथ भगत, बंडू पाटील यांच्यासह आगरी समाजातील मान्यवर आणि नेते उपस्थित होते. आगरी समाजाच्या पाठिंबामुळे डॉ. श्रीकांत शिंदे हे तिसऱ्यांदा खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून येतील, असा विश्वास याप्रसंगी आगरी समाजाच्या नेत्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Shrikant Shindeश्रीकांत शिंदेkalyan-pcकल्याणNavi Mumbaiनवी मुंबई