शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

विठ्ठलवाडी ते कल्याण नगर महामार्ग उन्नत मार्ग दृष्टीपथात, तासाभराचा प्रवास अवघ्या पाच मिनीटात येणार

By अनिकेत घमंडी | Updated: March 12, 2024 17:18 IST

निविदा जाहिर,खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची माहिती.

अनिकेत घमंडी, डोंबिवली:कल्याण शहराचे प्रवेशद्वार असलेल्या विठ्ठलवाडीतून जाणाऱ्या जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून कल्याण शहराच्या पश्चिमेला कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी आता अवघे पाच मिनीटे लागणार आहेत. कारण विठ्ठलवाडी येथून जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी उन्नत मार्गाची उभारणी केली जात असून त्यासाठीची निविदा नुकतीच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. 

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे या मार्गासाठी आग्रही होते.  या मार्गामुळे ४० मिनीटे ते एक तासांचा प्रवास फक्त पाच मिनिटांवर येणार आहे. दोन रेल्वे मार्गिका ओलांडून वालधुनी नदीला समांतर या मार्गाची उभारणी केली जाते आहे. या कामासाठी ६४२ कोटी ९८ लाखांची मान्यता मिळाली आहे.

शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार एमएमआरडीए प्रशासनापुढे जुन्या पुणे लिंक रस्त्यावरून विठ्ठलवाडी ते थेट कल्याणच्या अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी उन्नत मार्गाची संकल्पना मांडली होती. एमएमआरडीएने तात्काळ त्याला मंजुरी देत त्याचे सर्वेक्षण करून भूसंपादन सुरू केले होते. या मार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक जागाही संपादित करण्यात आली. आता या मार्गाच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून निविदा जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच कामाला सुरूवात होणार असून हा मार्ग पूर्ण झाल्यास त्याचा मोठा फायदा प्रवाशांना होणार आहे.

कसा आहे हा मार्ग -  कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर पाम्स वॉटर रेसॉर्ट ते कल्याण बदलापूर रस्त्यावर जगदीश दुग्धालय ते जुना पुणे लिंक रस्त्यापर्यंत वालधुनी नदीला समांतर हा उन्नत मार्ग उभारला जातो आहे. हा मार्ग कल्याण कर्जत रेल्वे मार्ग, कल्याण बदलापूर राज्यमार्ग आणि पुढे कल्याण कसारा रेल्वे मार्ग ओलांडून जाणार आहे. अहमदनगर मार्गावर ८०० मीटरच्या तर पुणे लिंक रस्त्यावर ७०० मीटरच्या दोन येणाऱ्या जाणाऱ्या मार्गिका असतील. संपूर्ण मार्गाची लांबी १९०० मीटर असेल. तर एकूण मार्गात ३४०० मीटरचे बांधकाम होईल. कल्याण बदलापूर राज्यमार्गावर उतरण्यासाठी मार्गिका असतील. त्याच्या आरेखन आणि बांधकामासाठी एमएमआरडीएने निविदा मागवली आहे. सुमारे अडीच किलोमीटरचा हा मार्ग कल्याण शहरात होणारी कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

उन्नत मार्ग महत्वाचा कसा - सध्याच्या घडीला  वालधुनी, विठ्ठलवाडी परिसरातून प्रवास करत शहाड भागात जाणे तितकेसे सोपे नाही. जुना कल्याण पुणे लिंक रस्ता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठलवाडी परिसरातून शहाड परिसरात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. मात्र आता या मार्गामुळे थेट रस्ता उपलब्ध होईल. त्यामुळे कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरून थेट कल्याण पूर्व, विठ्ठलवाडी आणि उल्हासनगरच्या पूर्व भागात पोहोचणे सोप होणार आहे.

टॅग्स :kalyanकल्याणShrikant Shindeश्रीकांत शिंदे