शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक; विद्या चव्हाण यांचे वादग्रस्त विधान

By मुरलीधर भवार | Updated: January 10, 2023 17:53 IST

भाजपचा भगवा हा भोगाचे प्रतिक असल्याचे विद्या चव्हाण यांनी म्हटले आहे. 

कल्याण : राज्यात शिंदे फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी यांच्यात नेहमीच आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात. त्यात आणखीन एक वादग्रस्त विधान राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आज कल्याणमध्ये केले आहे. भगवा रंग हा त्यागाचे प्रतीक असून भाजपाचा भगवा हा भोगाचे प्रतीक असे त्यांनी सांगितले. कल्याणमध्ये चव्हाण यांचा दौन दिवसीय दौरा आहे. कल्याणच्या चक्कीनाका येथून चव्हाण यांच्या उपस्थितीत जनसागर यात्रेला सुरुवात झाली. विशेष म्हणजे चव्हाण यांनी हनुमान मंदिरात जाऊन आधी हनुमानाचे दर्शन घेतले. त्यानंतर दौऱ्याला सुरुवात केली.

या दौऱ्यात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिरी ऋता आव्हाड, माया कटारीया, सारीका गायकवाड, मीनाक्षी अहिर, कुसुम गेडाम आदींचा सहभाग होता. यानंतर त्या पक्षाच्या शहर मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्ते, पदाधिकारी आणि महिला वर्गाशी संवाद साधणार आहे. महाराष्ट्राच्या राजकीय सत्ता संघर्ष सोडविण्याचा वाद न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. मात्र, न्यायालयही दबावाखाली असल्याने तारीख पे तारीख दिली जात आहे अशी भावना जनतेच्या मनात बळावली असल्याचे प्रदेशाध्यक्षा चव्हाण यांनी सांगितले.  देशातील विविध प्रश्न सोडवण्यासाठी मोदी सरकार पूर्णपणो अपयशी झाले .बेरोजगारी व महागाई या प्रश्नावरून लक्ष विचिलत करण्यासाठी नवनवीन मुद्दे उकरुन काढले जात आहेत.

भाजपचे हिंदुत्व पूर्णपणे ढोंगी आहे. त्यांना हिंदू धर्माचे काही पडलेले नाही. आमचे फक्त दोनच प्रश्न आहेत महागाई कमी झाली पाहिजे बेरोजगारी कमी झाली पाहिजे. छत्रपती संभाजी राजे आणि शिवाजी महाराज कोण होते हे आम्हाला चांगले ठाऊक आहे. कोणता धर्म स्वीकारायचा ? कोणी कोणाची पूजा करायची? कुणी कुणासोबत लग्न करायचे हे आमचे वैयिक्तक प्रश्न आहे याकडेही चव्हाण यांनी लक्ष वेधले. केंद्रात त्यांची सत्ता असल्याने राज्यात हे असंविधानिक सरकार टिकून असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

 

टॅग्स :kalyan-pcकल्याणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा