शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मनसेचा पहिला नव्हे, सहाव्यांदा बिनशर्त पाठिंबा; आ. राजू पाटील यांच्यावर कल्याणची जबाबदारी

By मुरलीधर भवार | Updated: April 18, 2024 08:48 IST

राज ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोमवारी सोपवली. 

मुरलीधर भवार, लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वासदर्शक ठराव, विधिमंडळ अध्यक्षांची निवड, विधान परिषद सदस्यांची निवड, राज्यसभा आणि राष्ट्रपती निवडणूक, असा पाचवेळा मनसेचे आमदार राजू पाटील यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्याच पाटील यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीची जबाबदारी सोमवारी सोपवली. 

त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघातील सुमारे लाख ते सव्वालाख मनसेची मते महायुतीच्या उमेदवाराच्या पारड्यात पडतील, याची जबाबदारी पाटील यांच्यावर आली आहे.  मोदी यांना दिलेला राज ठाकरे यांचा हा पहिला नव्हे, तर सहावा पाठिंबा आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव निश्चित आहे, तर महाविकास आघाडीतर्फे उद्धव सेनेच्या उमेदवार वैशाली दरेकर या निवडणूक रिंगणात उभ्या आहेत. मनसेत असताना, त्यांनी २००९ साली कल्याण लोकसभेतून निवडणूक लढविली होती. त्यांना १ लाख २ हजार मते मिळाली होती. दरेकर यांनी उमेदवारी दाखल केल्यावरच मनसे आमदार राजू पाटील यांनी गद्दारांना माफी नाही, असे सांगत त्यांची भूमिका स्पष्ट केली होती.

आ. पाटील यांच्यावर कल्याण लोकसभेची जबाबदारी साेपविल्यानंतर मनसेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांची लवकरच एक बैठक घेतली जाणार आहे. त्याची एक कार्यकारिणी तयार केली जाणार आहे. राज ठाकरे यांची मुंबईत एक सभा होणार आहे. मात्र, कल्याण, ठाणे, भिवंडी, पालघर लोकसभा मतदारसंघांतील सभेचे अद्याप नियोजन नाही. 

२००९ साली विधानसभेला मनसेचे उमेदवार रमेश पाटील यांना ५१,१४९ मते मिळाली व ते विजयी झाले होते तर त्यांनी २०१४ साली निवडणूक लढविली, तेव्हा त्यांना ३९,८९८ मते मिळाली व त्यांचा पराभव झाला. २०१९ साली मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी निवडणूक लढविली. त्यांना ९३,९२७ मते मिळाली व ते विजयी झाले. मनसेची किती मते ते महायुतीच्या उमेदवाराला ट्रान्सफर करण्यात यशस्वी होतात, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेRaju Patilराजू पाटील