शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

उल्हास नदी प्रदूषणाचे आंदोलन सरकारी पातळीवर बेदखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 00:51 IST

यंत्रणांना सोयरसुतक नाही

कल्याण : उल्हास नदीचेप्रदूषण रोखण्यासाठी ‘मी कल्याणकर’ संस्थेच्यावतीने नदीपात्रात बुधवारपासून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. हे आंदोलन सुरू होऊन २४ तास उलटूनही अद्याप सरकारी पातळीवर हे आंदोलन बेदखल आहे. नदी प्रदूषणाविषयी सरकारी यंत्रणांना काहीही पडलेले नाही. त्यामुळे नदीचे प्रदूषण रोखणार तरी कोण, असा संतप्त सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला आहे.उल्हास नदीपात्रात मोहने, गाळेगाव आणि म्हारळमधून वाहत येणारा नाला थेट नदीला येऊन मिळतो. या नाल्यातील सांडपाणी कोणती प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जाते. यामुळे नदी प्रदूषित होते. हे प्रदूषण रोखण्यासाठी संस्थेच्यावतीने नितीन निकम यांच्यासह उमेश बोरगावकर, कैलास शिंदे यांनी आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रदूषण रोखण्याविषयी ठोस तोडगा काढला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे. नदी पात्रातून कल्याण- डोंबिवली महापालिका, एमआयडीसी, स्टेम पाणी पुरवठा योजना, उल्हासनगर, बदलापूर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी उचलतात. या नदीचे प्रदूषण करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करून प्रदूषण नियंत्रणात आणण्याची जबाबदारी प्रदूषण नियंत्रण मंडळाची आहे. ज्या संस्था पाणी उचलतात त्या नदीचे प्रदूषण रोखण्याविषयी गंभीर नाही, असा आरोप निकम यांनी केला आहे. सरकारी संस्थांना गांभीर्य नसेल तर नदीचे प्रदूषण रोखले कसे जाणार आणि कोण रोखणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. याआधीही निकम यांनी याच प्रश्नावर उपोषण केले होते. मात्र तेव्हा त्यांची समजूत काढून उपोषण मागे घेण्यास सांगितले होते. पण तरीही प्रदूषणाचा प्रश्न निकाली लागलेला नाही.कारवाई मात्र शून्यप्रदूषणाची केवळ पाहणी होते; मात्र कारवाई शून्य. जलपर्णी काढण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. सगळ्य़ा सरकारी संस्थांनी संयुक्तरीत्या पावले उचलल्यास प्रदूषण रोखले जाऊ शकते. यापूर्वीही निकम यांनी उपोषण करून सरकारी यंत्रणांना जागे केले होते. आता पुन्हा आंदोलन सुरू केले असता, सरकारी यंत्रणांनी झोपेचे सोंग घेतले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी याप्रकरणी लक्ष घातल्यास हा प्रश्न सुटू शकतो, असे निकम म्हणाले.

टॅग्स :riverनदीpollutionप्रदूषण