शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
2
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
3
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
4
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
5
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
6
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
7
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी भेटणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
8
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य
9
४ दिवसांपासून अन्नाचा कणही नाही...; मुलांच्या त्रासाला कंटाळलेल्या वृद्ध दाम्पत्याची गंगेत उडी
10
Video: पाकिस्तानमध्ये ऑनर किलिंगची धक्कादायक घटना; 'तू मला फक्त गोळी...', तरुणीचे शेवटचे शब्द
11
उपराष्ट्रपती पदी कोण बसणार? 'या' तीन नावे शर्यतीत; पहिल्या क्रमांकावर कोण?
12
तरुणीनं पायावर गोंधवला माता कालीचा टॅटू, व्हिडिओ बघून युजर्स भडकले, तुमचाही संताप होईल
13
"आधार, मतदान ओळखपत्र आणि रेशन कार्ड विश्वासार्ह कागदपत्रे नाहीत"; निवडणूक आयोगाची सुप्रीम कोर्टात धक्कादायक माहिती
14
"...असे जीवन जगत राहा"; 'मिसेस मुख्यमंत्र्यां'ची देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवशी खास पोस्ट
15
१२ कोटी रुपये, BMW आणि मुंबईत घर... पोटगीची मागणी ऐकून सुप्रीम कोर्ट म्हणालं,'तू कमवत का नाही?'
16
शेअर असावा तर असा...! ₹15 वरून ₹455 वर पोहोचला शेअर, आता मोठा व्हिस्की ब्रँड खरेदी करणार कंपनी!
17
Ajit Pawar Birthday: अजित पवारांचा असाही एक कार्यकर्ता, ११ एकर शेतजमिनीवर दादांचे चित्र रेखाटून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!
18
२ मिनिटांत ₹१००० कोटींचा नफा; 'या' कंपनीच्या शेअरनं केली कमाल, मालकासह गुंतवणूकदारही मालमाल
19
सावधान...! १७ रुपयांपर्यंत घसरू शकतो या बँकेचा शेअर, २-२ तज्ज्ञांनी दिलाय विक्रीचा सल्ला; जाणून घ्या
20
मस्करीची कुस्करी! मी पडले तर तू मला वाचवशील? नवऱ्याला प्रश्न विचारला, कठड्यावरुन पाय घसरला

'देशातील समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव', महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:46 IST

Tushar Gandhi News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.

कल्याण - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.

कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधील गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ५ ते १२ मार्च दरम्यान युवा शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात देशभरातील विविध राज्यातून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थीत होते. तुषार गांधी यांनी सांगितले की, गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का तर त्याचे उत्तर नाही असे आहे. देसातील समस्या सुटल्या नाहीत. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गूलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात क्रांती घडवायची असेल तर शैक्षणिक क्रांती घडविणो गरजचे आहे. आपल्या देशात जिथे रोजगार आहे. तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे. त्याठिकाणी रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळयादेखत पाहिली. कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते. हे भयावय चित्र भारतात दिसून आले.

महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधींना जाणून घेऊ शकता. उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्या देशातील तरुणाच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर डॉक्टरला रोजगारीची शाश्वती नाही तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. देशाचे पंतप्रधान बोलतात की, इंजिनिअर झाला नोकरी नाही तर भजी तळा आणि ते विका. त्यांना भजी तळायचे होते. तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :kalyanकल्याणIndiaभारतPoliticsराजकारण