शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

'देशातील समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव', महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:46 IST

Tushar Gandhi News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.

कल्याण - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.

कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधील गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ५ ते १२ मार्च दरम्यान युवा शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात देशभरातील विविध राज्यातून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थीत होते. तुषार गांधी यांनी सांगितले की, गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का तर त्याचे उत्तर नाही असे आहे. देसातील समस्या सुटल्या नाहीत. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गूलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात क्रांती घडवायची असेल तर शैक्षणिक क्रांती घडविणो गरजचे आहे. आपल्या देशात जिथे रोजगार आहे. तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे. त्याठिकाणी रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळयादेखत पाहिली. कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते. हे भयावय चित्र भारतात दिसून आले.

महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधींना जाणून घेऊ शकता. उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्या देशातील तरुणाच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर डॉक्टरला रोजगारीची शाश्वती नाही तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. देशाचे पंतप्रधान बोलतात की, इंजिनिअर झाला नोकरी नाही तर भजी तळा आणि ते विका. त्यांना भजी तळायचे होते. तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :kalyanकल्याणIndiaभारतPoliticsराजकारण