शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
3
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'त्या' मरकजला केले जमीनदोस्त
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
5
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
6
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
7
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
8
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
9
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
10
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
11
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
12
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
13
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
14
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
15
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
16
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
17
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह
18
'या' व्यक्तीच्या पगारापुढे मस्क-जेफ बेझोस यांचा पगार काहीच नाही; कमाईच्या बाबतीत सर्वांना टाकलं मागे
19
"किती नुकसान झालं, किती दहशतवादी मारले गेले हे समजलं असतं तर…’’, काँग्रेस खासदार इम्रान मसूद यांचं मोठं विधान
20
हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक दणका; भारतीय सैन्याने नीलम-झेलम धरण उडवले

'देशातील समस्यांवरुन लक्ष विचलित करण्यासाठी स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव', महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:46 IST

Tushar Gandhi News: स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.

कल्याण - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातो. खरंच देश स्वतंत्र झाला आहे का. ७५ वर्षानंतरही देशात आजही त्याच समस्या कायम आहेत. या समस्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी हा अमृत महोत्सव साजरा केला जात असल्याचे मत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी आज येथे व्यक्त केले.

कल्याण येथील बिर्ला कॉलेजमधील गांधी अध्ययन केंद्राच्या वतीने ५ ते १२ मार्च दरम्यान युवा शिबीराचे आयोजन केले आहे. या शिबीरात देशभरातील विविध राज्यातून युवा प्रतिनिधी सहभागी झाले आहे. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आज तुषार गांधी यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे संचालक डॉ. नरेश चंद्र, अविनाश पाटील आणि सुरेश हतीपूर्ण आदी मान्यवर उपस्थीत होते. तुषार गांधी यांनी सांगितले की, गांधीच्या स्वप्नातील भारत निर्माण झाला का तर त्याचे उत्तर नाही असे आहे. देसातील समस्या सुटल्या नाहीत. आजही देशात त्याच समस्या आहेत. आपण कालही गूलाम होतो. आजही गुलाम आहोत. उद्याही गुलामच राहणार. आपल्या देशात क्रांती घडवायची असेल तर शैक्षणिक क्रांती घडविणो गरजचे आहे. आपल्या देशात जिथे रोजगार आहे. तिथे वास्तव्याची सोय नाही. जिथे वास्तव्याची सोय आणि सुरक्षा आहे. त्याठिकाणी रोजगार नाही. ही स्थिती कोरोना काळात आपण आपल्या डोळयादेखत पाहिली. कोरोना काळात लॉकडाऊनच्या काळात मजूर आपल्या गावी पलायन करीत होते. हे भयावय चित्र भारतात दिसून आले.

महात्मा गांधी यांना जाणून घ्यायचे असेल तर महात्मा म्हणून नव्हे तर मोहनदास म्हणून ते काय जगले हे आधी जाणून घ्यावे लागेल. तरच तुम्ही महात्मा गांधींना जाणून घेऊ शकता. उच्च शिक्षण घेऊन देखील आपल्या देशातील तरुणाच्या हाताला रोजगार नाही. नोकरीची हमी नाही. इंजिनिअर डॉक्टरला रोजगारीची शाश्वती नाही तर तिथे अन्य तरुणांचे काय होत असेल. देशाचे पंतप्रधान बोलतात की, इंजिनिअर झाला नोकरी नाही तर भजी तळा आणि ते विका. त्यांना भजी तळायचे होते. तर त्यांनी शिक्षणावर १७ वर्षे वाया का घालवायची असा प्रश्न गांधी यांनी यावेळी उपस्थित केला.

टॅग्स :kalyanकल्याणIndiaभारतPoliticsराजकारण