शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
3
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
4
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
5
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
6
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
7
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
8
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
9
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
10
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
11
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
12
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
13
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
14
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
15
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
16
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
17
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
18
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
19
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम

मतदारसंघाची मागणी करणं यात गैर काही नाही, वरिष्ठांनी ठरवलं तर आम्ही त्यांचं काम करू - कपिल पाटील

By मुरलीधर भवार | Published: April 06, 2024 8:05 PM

महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे असं कपिल पाटील म्हणाले.

कल्याण - भिवंडी लोकसभा मतदार संघाची मागणी शिवसेनेने केली आहे. त्यांनी मागणी करणे काही एक गैर नाही. आमचा पक्ष भाजपपेक्षा त्यांच्या पक्षाची ताकद जास्त आहे असे त्यांना वाटत आहे. दहा वर्षे आम्ही भाजपचे काम केले आहे. आत्ता ती जागा आम्हाला द्यावी असी त्यांची मागणी आहे. यात काही गैर नाही. आमचे महायुतीचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, सुनिल तटकरे आहे. यांच्या समन्वयाच्या बैठकीत आमच्या सहकाऱ्यांना ती जागा शिवसेनाला मिळाली तर दहा वर्षे त्यांनी आमचे काम केले. आत्ता आम्ही त्याचे काम करु. यात चुकीचे काय ? लोकशाहीत त्यांनी जागा मागितली आहे. त्यात चुकीचे काही नाही. देशाचे आणि राज्याचे शीर्ष नेतृत्व हे निर्णय करतील अशी समंजस प्रतिक्रिया खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि कल्याण संस्कृती मंच यांच्या वतीने कल्याणच्या काळा तलाव येथील प्रभू श्रीरामाची महाआरती आज सायंकाळी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास खासदार पाटील उपस्थित होते. विशेष म्हणजे या ठिकाणी भाजप आमदार किसन कथोरे हे देखील उपस्थित होते. पाटील आणि कथोरे यांनी हस्तांदोलन केले. यावेळी सगळ्यांची भुवया उंचावल्या.

चोरगे यांच्या विषयी सहानुभूतीचीयावेळी खासदार पाटील यांनी सांगितले की, काँग्रेसचे दयानंद चोरगे यांनी अपक्ष अर्ज भरणार आहेत. या मुद्यावर आपण काय भाष्य करणार.त्यांच्या पक्षात काय चालले आहे. ते त्या लोकांनी बघितले पाहिजे. एकंदरीतच ज्या काही भावना काँग्रेसच्या सहकारी वर्गाने व्यक्त केल्या आहेत. कोणालाही असे वाटणे सहाजिकच आहे. पाच वर्षे आम्ही पक्षाचे काम मरमर करतो. आणि आयत्या वेळी कोणाला तरी घेऊन उमेदवारी दिली जाते. आत्ता तर असे झाले की पक्षाला जी उमेदवारी होती तीच बदलली. ही जागा राष्ट्रवादीला गेली. त्यांच्या भावना तीव्र आहे. त्यात चुकीचे असे मला काही वाटत नाही.

काेणतेही आव्हान आहे असे मला वाटत नाहीखासदार पाटील यांनी सांगितले की, मला ज्या पक्षाने उमेदवारी दिली आहे. भाजपचे मित्र पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय बाकीचे घटक दल आहेत. हे सगळया महायुतीचा मी उमेदवार आहे. दोन वेळा महायुतीचाच उमेदवार होतो. महायुतीच्या उमेदवारासमोर कोणी कितीही आव्हान उभे केले तरी आमचे जे नेतृत्व आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आमचाय सगळ्या महायुतीचे नेते आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूका लढतो. मोदीजींना देशात केलेले काम आहे. त्या कामाच्यामुळे समोर असलेल्या कोणत्या उमेदवारेच आव्हान आहे असे आम्हाला वाटत नाही. कारण मोदी जी च्या कामावर जनतेचा विश्वास आहे. त्या विश्वासाच्या माध्यमातून जनता निश्चात पणाने मला निवडून देईल असा दावा कपिल पाटील यांनी केला आहे.

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे याचे नाव देवेंद्र फडणवीस यांनी जाहिर केले. ही केवळ औपचारीकता होती. हे तर काळ्या दगडावरची रेघ आहे. कल्याण लोकसभेत खासदारडॉ. श्रीकांत शिंदे हे उमेदवार आहेत. कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत होता. म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहिर केली असे पाटील यांनी सांगितले.

कल्याण पूर्वेतील भाजप कार्यकर्त्यांनी लोकसभेची उमेदवारी भाजला द्यावी अशी मागणी केली आहे याविषयी खासदार पाटील यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, या विषयी मला काही माहिती नाही. माझ्या वाचनात आले. पेपरमध्ये वाचले. त्याची पूर्ण माहिती घेतल्याशिवाय त्यावर भाष्य करणे योग्य नाही. पण एकदा आपल्या नेत्यांनी युती केल्यानंतर कोणीही अशा प्रकारची भूमिीका घेणे. पक्षात असलेल्या कार्यकर्त्या नेत्यांनी अशा प्रकारची भूमिका घेणे उचित नाही. आपल्या काही भावना असतील तर आपल्या नेत्यांपर्यंत पोचविल्या पाहिजेत. महायुतीच्या नेत्यांच्या समन्वयांतून जी काही समस्या असेल तिचे निराकरण केले पाहिजे. जाहिरपणे अशा प्रकारची वाच्यता करणे उचित नाही. भाजप असो की, शिवसेना असो आपली महायुती आहे. महायुती हे आपले कुटुंब आहे. आपल्या कुटुंबात त्याची चर्चा होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :bhiwandi-pcभिवंडीKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलShiv SenaशिवसेनाBJPभाजपा