शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

कल्याण पूर्वेतील पाणी समस्या डिसेंबर अखेर निकाली निघणार

By मुरलीधर भवार | Updated: June 11, 2024 16:30 IST

पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणी केली. डिसेबर अखेर ही समस्या सुटेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

कल्याण- कल्याण पूर्व परिसरातील खडेगोळवलीसह ग्रामीण भागात गेल्या अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे नागरिक पाणीटंचाईच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. पाणीटंचाई बाबत नागरिकांनी अनेकदा महापालिका प्रशासनाकडे तक्रारी केल्या, निवेदने दिली मात्र पाणी समस्या जैसे थे आहे. अखेर आज शिंदे सेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांनी महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांची आज भेट घेतली. पाणी समस्या निदर्शनास आणून देत पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मागणी केली. डिसेबर अखेर ही समस्या सुटेल असे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे.

खडेगोळवली तसेच कल्याण पूर्व ग्रामीण भागातील आशेळे माणेरे ,नांदीवली या परिसरातील नागरीकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा समस्येला सामोरे जावे लागते. या परिसरात अर्धा ते एक तास पाणी सोडले जाते. कधी कधी ते सोडले जात नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. नागरिकांनी अनेकदा महापालिकेकडे तक्रारी केल्या, निवेदन दिली, पाठपुरावा केला मात्र पाणी समस्या कायम आहे. शहरप्रमुख गायकवाड यांनी महापालिका आयुक्त जाखड यांचे भेट घेतली.

पाणी समस्या निदर्शनास आणून दिली. यावेळी पाणी कमी दाबाने सोडले जाते त्यामुळे ही समस्या आहे ,पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली. गायकवाड यांनी महापालिका आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगितले पाण्याच्या कमी दाबाबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल. कल्याण पूर्व येथील पाणी समस्या निकाली काढण्यासाठी पूर्व भागातील पाण्याच्या टाक्यांची कामेही ९० टक्के पूर्ण झाली आहेत. त्याचप्रमाणे अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम देखील युद्ध पातळीवर सुरू आहे. डिसेंबर महिना अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येतील . त्यानंतर कल्याण पूर्व भागातील पाणी समस्या निकाली निघेल असे आश्वासन आयुक्तांनी गायकवाड यांना दिले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणwater shortageपाणीकपात