शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

तर्राट कारचालकाने अनेक वाहनांना उडविले; उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकासह ३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:06 IST

अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला, तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कारमधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील  कॅम्प नं. ३, शांतीनगर परिसरात सोमवारी पहाटे ५ वाजता एका तर्राट (मद्यधुंद) कारचालकाने दोन रिक्षांसह काही वाहनांना धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी व चालक ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचालक लवेश कमलेश केवळरामानी याला अटक  केली आहे. 

रिक्षातील सामुदीप सुकुमार जाणा (वय ३३), अंजली जाणा (वय ६१) व चालक संभु रामअवध चौहान अशी मृतांची नावे आहेत, तर  रिक्षाचा चालक जावेद जफर सय्यद याच्यासह महेंद्र भारत पांढरे व प्रमोद दौड गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

मावशीसोबत आला होतो कोलकातावरून सोमुदीप जाणा हा मावशी अंजली जाणा हिला घेऊन सकाळी कोलकातावरून आला होता. कल्याण रेल्वे स्टेशनवरून तो मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षा धडक देताच काही कारला जोरदार धडक दिली आणि दोघांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला, तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कारमधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कारमधून साहित्य नेणाऱ्यालाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. कारचालक लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली असून तोही या घटनेत जखमी झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात