शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच जिंकत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
5
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
6
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
7
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
8
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
9
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
10
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
11
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
12
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
13
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
14
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
15
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
16
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
17
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
18
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
19
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
20
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर

तर्राट कारचालकाने अनेक वाहनांना उडविले; उल्हासनगरमध्ये रिक्षाचालकासह ३ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 09:06 IST

अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला, तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कारमधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील  कॅम्प नं. ३, शांतीनगर परिसरात सोमवारी पहाटे ५ वाजता एका तर्राट (मद्यधुंद) कारचालकाने दोन रिक्षांसह काही वाहनांना धडक दिली. या अपघातात रिक्षातील दोन प्रवासी व चालक ठार झाले, तर तीन जण जखमी झाले. या प्रकरणी मध्यवर्ती पोलिसांनी गुन्हा दाखल करून कारचालक लवेश कमलेश केवळरामानी याला अटक  केली आहे. 

रिक्षातील सामुदीप सुकुमार जाणा (वय ३३), अंजली जाणा (वय ६१) व चालक संभु रामअवध चौहान अशी मृतांची नावे आहेत, तर  रिक्षाचा चालक जावेद जफर सय्यद याच्यासह महेंद्र भारत पांढरे व प्रमोद दौड गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्यांना शहरातील मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

मावशीसोबत आला होतो कोलकातावरून सोमुदीप जाणा हा मावशी अंजली जाणा हिला घेऊन सकाळी कोलकातावरून आला होता. कल्याण रेल्वे स्टेशनवरून तो मावशीसह जावेद सय्यद यांच्या ओला रिक्षाने कॅम्प नं-४ येथील घरी येत होता. त्यावेळी कारने ओला रिक्षासह अन्य एका रिक्षा धडक देताच काही कारला जोरदार धडक दिली आणि दोघांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर कारचालक लवेश केवळरामानी हा पळून गेला, तर त्याच्या एका मित्राने अपघातग्रस्त कारमधून एक थैली व दारूच्या बॉटल घेऊन गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्यानंतर पोलिसांनी कारमधून साहित्य नेणाऱ्यालाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. कारचालक लवेश केवलरामानी याला पोलिसांनी अटक केली असून तोही या घटनेत जखमी झाला आहे.

टॅग्स :Accidentअपघात