शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 20:28 IST

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या.

कल्याण - राज्यातील महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली. महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, निवडणुका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. निवडणूका कोणत्या आणि कशाप्रकारे घ्याव्यात याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र, राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये त्रिसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्दबातल ठरविण्यात यावा. कारण, राज्य सरकारला निवडणूकीसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तसेच, न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, मागच्याच आठवड्यात येत्या पंधरा दिवसात निवडणुका घेण्याच्या तारखेची घोषणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या सगळया पार्श्वभूमीवर पाटील यांच्यासह सात जणांच्या याचिका उच्च न्यायालयाने डिसमिस केल्या आहेत. यासंदर्भातील सुनावणी मागच्या आठवडय़ातील शुक्रवारी झाली. मात्र, सुनावणीची आदेश लेखी प्रत अद्याप हाती आलेली नाही. लेखी प्रत हाती येताच न्यायालयाने आदेश प्रतिमध्ये काय मुद्दे अधोरेखित केले आहे. याचा कायदेशीर अभ्यास करुन याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका