शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
3
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
4
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
5
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
6
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
7
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
8
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
9
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
10
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
11
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
12
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
13
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
14
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
15
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
16
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
17
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
18
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
19
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
20
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण

बहुसदस्य पद्धतीने निवडणूका नकोच, याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयात जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 20:28 IST

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या.

कल्याण - राज्यातील महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची माहिती याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी दिली. महापालिकेच्या निवडणुका त्रिसदस्य पद्धतीने घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, निवडणुका एक सदस्य पद्धतीने घ्याव्यात या मागणीसाठी याचिकाकर्ते पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

पाटील यांच्यासह राज्यभरातून अन्य सहा जणांनी याच प्रकारची मागणी करणाऱ्या याचिका दाखल केल्या होत्या. निवडणूका कोणत्या आणि कशाप्रकारे घ्याव्यात याचा निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. मात्र, राज्य सरकारने मुंबई महापालिका वगळता राज्यभरातील सर्व महापालिकांमध्ये त्रिसदस्य पद्धतीने निवडणूका घेण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय रद्दबातल ठरविण्यात यावा. कारण, राज्य सरकारला निवडणूकीसंदर्भात निर्णय घेण्याचा अधिकार नाही. तसेच, न्यायालयात ओबीसी आरक्षणाचा विषय न्यायप्रविष्ट आहे. दरम्यान, मागच्याच आठवड्यात येत्या पंधरा दिवसात निवडणुका घेण्याच्या तारखेची घोषणा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

या सगळया पार्श्वभूमीवर पाटील यांच्यासह सात जणांच्या याचिका उच्च न्यायालयाने डिसमिस केल्या आहेत. यासंदर्भातील सुनावणी मागच्या आठवडय़ातील शुक्रवारी झाली. मात्र, सुनावणीची आदेश लेखी प्रत अद्याप हाती आलेली नाही. लेखी प्रत हाती येताच न्यायालयाने आदेश प्रतिमध्ये काय मुद्दे अधोरेखित केले आहे. याचा कायदेशीर अभ्यास करुन याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिका