शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:00 IST

महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेची कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक

कल्याण-ज्या रिक्षा चालाकांनी विहित वेळेत रिक्षाची पासिंग केली नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाकूडन दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. या जाचक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव सेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेने आरटीओ कार्यालयावर धडक दिली. हा जाचक दंड रद्द केला नाही. तर सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणू उभी केली जातील. तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे.

भोर यांनी आज आरटीओ अधिकारी अशुतोष बारकूल यांची भेट घेतली. त्यांना रिक्षा चालकांच्या मागणीचे निवेदन सादर केले. रिक्षा चालकांनी पाेटाला चिमटा काढून तसेच काही वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कोरोना काळात रिक्षा चालकांची हालत खूपच खराब होती. त्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही. कोरोनानंतर आत्ता कुठे रिक्षा चालक आर्थिक विवंचनेतून थोडाफार सावरत आहे. रिक्षाचे पासिंग आरटीओकडून दरवर्षी करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या रिक्षा चालकांकडून पासिंगला विलंब होतो. त्यांना त्यांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. रिक्षा चालकांची स्वत:ची गाडी असली तरी त्याला दिवसभर रिक्षा चालवून पैसे सुटत नाहीत. त्यात इंधन महाग झाले आहे. शाळा सुरु झाल्या असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे.

या सगळ्या समस्या पाहता रिक्षा चालकांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारणे कितपत योग्य आहे ? असा सवाल भोर यांनी उपस्थित केला आहे. दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी भोर यांनी आरटीओ अधिकारी बारकूल यांच्याकडे केली आहे हा दंड रद्द केला नाही तर ज्यांना दंड आकारला आहे. ती सर्व वाहने आरटीओ कार्यालयासमोरील आवारात आणून उभी करुन ठेवली जातील. या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोर यांनी दिला आहे.