शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
2
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
5
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
6
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
7
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
8
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
9
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
10
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
11
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
12
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
13
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
14
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
15
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
16
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 
17
लंडनला कायमचेच निघालेले डॉक्टरचे कुटुंब; महिन्या पूर्वीच दिलेला राजीनामा, चेहऱ्यावर हसूही होते...
18
Air India plane crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत विक्रांत मेस्सीच्या वैमानिक मित्राचा मृत्यू, अभिनेत्याने लिहिली पोस्ट
19
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
20
क्रू मेंबर रोशनी सोनघरे हिचे एअर होस्टेस व्हायचे स्वप्न अधुरे राहिले; एअर इंडियाच्या विमानात होती...

दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:00 IST

महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेची कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक

कल्याण-ज्या रिक्षा चालाकांनी विहित वेळेत रिक्षाची पासिंग केली नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाकूडन दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. या जाचक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव सेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेने आरटीओ कार्यालयावर धडक दिली. हा जाचक दंड रद्द केला नाही. तर सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणू उभी केली जातील. तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे.

भोर यांनी आज आरटीओ अधिकारी अशुतोष बारकूल यांची भेट घेतली. त्यांना रिक्षा चालकांच्या मागणीचे निवेदन सादर केले. रिक्षा चालकांनी पाेटाला चिमटा काढून तसेच काही वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कोरोना काळात रिक्षा चालकांची हालत खूपच खराब होती. त्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही. कोरोनानंतर आत्ता कुठे रिक्षा चालक आर्थिक विवंचनेतून थोडाफार सावरत आहे. रिक्षाचे पासिंग आरटीओकडून दरवर्षी करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या रिक्षा चालकांकडून पासिंगला विलंब होतो. त्यांना त्यांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. रिक्षा चालकांची स्वत:ची गाडी असली तरी त्याला दिवसभर रिक्षा चालवून पैसे सुटत नाहीत. त्यात इंधन महाग झाले आहे. शाळा सुरु झाल्या असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे.

या सगळ्या समस्या पाहता रिक्षा चालकांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारणे कितपत योग्य आहे ? असा सवाल भोर यांनी उपस्थित केला आहे. दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी भोर यांनी आरटीओ अधिकारी बारकूल यांच्याकडे केली आहे हा दंड रद्द केला नाही तर ज्यांना दंड आकारला आहे. ती सर्व वाहने आरटीओ कार्यालयासमोरील आवारात आणून उभी करुन ठेवली जातील. या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोर यांनी दिला आहे.