शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
2
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
3
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
4
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
5
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
6
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
7
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
8
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
9
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
10
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
11
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
12
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
13
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
14
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
15
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
16
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
17
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
18
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
19
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
20
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"

दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2024 19:00 IST

महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेची कल्याण आरटीओ कार्यालयावर धडक

कल्याण-ज्या रिक्षा चालाकांनी विहित वेळेत रिक्षाची पासिंग केली नाही. त्यांना आरटीओ कार्यालयाकूडन दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. या जाचक दंड रद्द करण्यात यावा या मागणीसाठी आज उद्धव सेना प्रणित महाराष्ट्र रिक्षा टॅक्सी चालक सेनेने आरटीओ कार्यालयावर धडक दिली. हा जाचक दंड रद्द केला नाही. तर सर्व वाहने आरटीओ कार्यालयात आणू उभी केली जातील. तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा सेनेचे अध्यक्ष निलेश भोर यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना दिला आहे.

भोर यांनी आज आरटीओ अधिकारी अशुतोष बारकूल यांची भेट घेतली. त्यांना रिक्षा चालकांच्या मागणीचे निवेदन सादर केले. रिक्षा चालकांनी पाेटाला चिमटा काढून तसेच काही वित्त संस्थांकडून कर्ज घेतले आहे. कोरोना काळात रिक्षा चालकांची हालत खूपच खराब होती. त्यांना कोणतीही मदत सरकारकडून मिळाली नाही. कोरोनानंतर आत्ता कुठे रिक्षा चालक आर्थिक विवंचनेतून थोडाफार सावरत आहे. रिक्षाचे पासिंग आरटीओकडून दरवर्षी करणे बंधनकारक आहे. मात्र ज्या रिक्षा चालकांकडून पासिंगला विलंब होतो. त्यांना त्यांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारला जातो. रिक्षा चालकांची स्वत:ची गाडी असली तरी त्याला दिवसभर रिक्षा चालवून पैसे सुटत नाहीत. त्यात इंधन महाग झाले आहे. शाळा सुरु झाल्या असल्याने मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे.

या सगळ्या समस्या पाहता रिक्षा चालकांना दर दिवसाला ५० रुपये दंड आकारणे कितपत योग्य आहे ? असा सवाल भोर यांनी उपस्थित केला आहे. दर दिवसाला आकारला जाणारा ५० रुपयांचा दंड रद्द करण्यात यावा अशी मागणी भोर यांनी आरटीओ अधिकारी बारकूल यांच्याकडे केली आहे हा दंड रद्द केला नाही तर ज्यांना दंड आकारला आहे. ती सर्व वाहने आरटीओ कार्यालयासमोरील आवारात आणून उभी करुन ठेवली जातील. या प्रकारचे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा भोर यांनी दिला आहे.