शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
3
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
4
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
5
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
6
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
7
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
8
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
9
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
10
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
11
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
12
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
13
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
14
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
15
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
16
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
17
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
18
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
19
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
20
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!

हजारो डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा सक्तीचा अंधार; लोडशेडिंगच्या भीतीने हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:07 IST

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे ...

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे नऊ हजार ग्राहकांना फटका बसला. शुक्रवारी सकाळी गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. राज्यातील विजेची मागणी प्रचंड वाढली असून, कोळशाअभावी वीजनिर्मिती घटली असल्याने एप्रिल व मे महिन्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचे चटके पुन्हा सहन करावे लागणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

वीजवाहिनीतील बिघाडामुळे गुरुवारी डोंबिवलीकरांना दीर्घकाळ विजेशिवाय राहावे लागले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली. केबलमधील बिघाड शोधण्यास वेळ लागल्याने समस्या गंभीर झाली. काम झाल्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे बिक्कड यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळीच गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागात काही ठिकाणी वीज खंडित झाली. दीड-दोन तासानंतर पुरवठा सुरळीत झाला. मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची देखभालीची कामे महावितरण करते. त्यामुळे वीजपुरवठा बंद ठेवतात. त्यातच आता लोडशेडिंगचीही धास्ती निर्माण झाली आहे.

राज्यात कोळशाअभावी विजेचे संकट गंभीर बनले आहे. केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीजसंकट गहिरे झाले तर राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे कल्याण, डोंबिवलीतील वीज ग्राहकांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत आठ-नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात होते. त्यामुळे नागरिक बेजार झाले होते. इन्व्हर्टरची मागणी प्रचंड वाढली होती. त्यानंतर सरकारने केलेल्या काही उपाययोजनांमुळे तसेच वीज बिलांच्या वसुलीनुसार लोडशेडिंगचे वेळापत्रक ठरविल्यामुळे डोंबिवलीतील अनेक भागातील वसुली वाढून लोडशेडिंग बंद झाले. मात्र यंदा पुन्हा लोडशेडिंग बोकांडी बसणार, अशी भीती कल्याण, डोंबिवलीत व्यक्त होत आहे.

इन्व्हर्टरचा बॅकअपही काही मिनिटांपुरता

  • गेल्या काही वर्षांत बत्ती गुल होत नसल्याने अनेकांनी इन्व्हर्टर काढून टाकले किंवा अनेकांकडे असलेल्या इन्व्हर्टरची देखभाल केली नसल्याने, ते काही मिनिटांच्या पलीकडे बॅकअप देत नाहीत.
  • परिणामी, गुरुवारी अचानक १२ तास वीज गायब झाल्याने अनेक घरातील सदस्य हे उकाड्याने बेजार झाले. रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने त्यांना अंधारात राहावे लागले.
  • मेणबत्त्या वगैरे बाळगण्याची गरज नसल्याने अनेकांना दुकानात धाव घ्यावी लागली. दुकानदारांकडेही मेणबत्त्यांचा पुरेसा साठा नव्हता. वीजसंकटामुळे पुन: पुन्हा हा दारुण अनुभव येण्याची चिन्हे दिसत असल्याने डोंबिवलीकरांची पाचावर धारण बसली आहे.
टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली