शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

हजारो डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा सक्तीचा अंधार; लोडशेडिंगच्या भीतीने हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:07 IST

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे ...

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे नऊ हजार ग्राहकांना फटका बसला. शुक्रवारी सकाळी गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. राज्यातील विजेची मागणी प्रचंड वाढली असून, कोळशाअभावी वीजनिर्मिती घटली असल्याने एप्रिल व मे महिन्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचे चटके पुन्हा सहन करावे लागणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

वीजवाहिनीतील बिघाडामुळे गुरुवारी डोंबिवलीकरांना दीर्घकाळ विजेशिवाय राहावे लागले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली. केबलमधील बिघाड शोधण्यास वेळ लागल्याने समस्या गंभीर झाली. काम झाल्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे बिक्कड यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळीच गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागात काही ठिकाणी वीज खंडित झाली. दीड-दोन तासानंतर पुरवठा सुरळीत झाला. मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची देखभालीची कामे महावितरण करते. त्यामुळे वीजपुरवठा बंद ठेवतात. त्यातच आता लोडशेडिंगचीही धास्ती निर्माण झाली आहे.

राज्यात कोळशाअभावी विजेचे संकट गंभीर बनले आहे. केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीजसंकट गहिरे झाले तर राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे कल्याण, डोंबिवलीतील वीज ग्राहकांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत आठ-नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात होते. त्यामुळे नागरिक बेजार झाले होते. इन्व्हर्टरची मागणी प्रचंड वाढली होती. त्यानंतर सरकारने केलेल्या काही उपाययोजनांमुळे तसेच वीज बिलांच्या वसुलीनुसार लोडशेडिंगचे वेळापत्रक ठरविल्यामुळे डोंबिवलीतील अनेक भागातील वसुली वाढून लोडशेडिंग बंद झाले. मात्र यंदा पुन्हा लोडशेडिंग बोकांडी बसणार, अशी भीती कल्याण, डोंबिवलीत व्यक्त होत आहे.

इन्व्हर्टरचा बॅकअपही काही मिनिटांपुरता

  • गेल्या काही वर्षांत बत्ती गुल होत नसल्याने अनेकांनी इन्व्हर्टर काढून टाकले किंवा अनेकांकडे असलेल्या इन्व्हर्टरची देखभाल केली नसल्याने, ते काही मिनिटांच्या पलीकडे बॅकअप देत नाहीत.
  • परिणामी, गुरुवारी अचानक १२ तास वीज गायब झाल्याने अनेक घरातील सदस्य हे उकाड्याने बेजार झाले. रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने त्यांना अंधारात राहावे लागले.
  • मेणबत्त्या वगैरे बाळगण्याची गरज नसल्याने अनेकांना दुकानात धाव घ्यावी लागली. दुकानदारांकडेही मेणबत्त्यांचा पुरेसा साठा नव्हता. वीजसंकटामुळे पुन: पुन्हा हा दारुण अनुभव येण्याची चिन्हे दिसत असल्याने डोंबिवलीकरांची पाचावर धारण बसली आहे.
टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली