शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

हजारो डोंबिवलीकरांच्या नशिबी पुन्हा सक्तीचा अंधार; लोडशेडिंगच्या भीतीने हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 14:07 IST

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे ...

डोंबिवली : महावितरणच्या १०० केव्ही वीजवाहिनीत गुरुवारी झालेल्या बिघाडामुळे तब्बल १२ तास म्हात्रेनगर, रामनगर आणि आयरे गाव भागातील सुमारे नऊ हजार ग्राहकांना फटका बसला. शुक्रवारी सकाळी गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. राज्यातील विजेची मागणी प्रचंड वाढली असून, कोळशाअभावी वीजनिर्मिती घटली असल्याने एप्रिल व मे महिन्यात डोंबिवलीकरांना लोडशेडिंगचे चटके पुन्हा सहन करावे लागणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

वीजवाहिनीतील बिघाडामुळे गुरुवारी डोंबिवलीकरांना दीर्घकाळ विजेशिवाय राहावे लागले, अशी माहिती महावितरणचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी दिली. केबलमधील बिघाड शोधण्यास वेळ लागल्याने समस्या गंभीर झाली. काम झाल्यावर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वीजवाहिनीची चाचणी करण्यात आली. त्यानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला, असे बिक्कड यांनी सांगितले. शुक्रवारी सकाळीच गोग्रासवाडी, अयोध्यानगरी भागात काही ठिकाणी वीज खंडित झाली. दीड-दोन तासानंतर पुरवठा सुरळीत झाला. मे महिन्यात पावसाळ्यापूर्वीची देखभालीची कामे महावितरण करते. त्यामुळे वीजपुरवठा बंद ठेवतात. त्यातच आता लोडशेडिंगचीही धास्ती निर्माण झाली आहे.

राज्यात कोळशाअभावी विजेचे संकट गंभीर बनले आहे. केवळ दोन दिवस पुरेल एवढाच कोळसा शिल्लक आहे. त्यामुळे वीजसंकट गहिरे झाले तर राज्याच्या ग्रामीण भागाप्रमाणे कल्याण, डोंबिवलीतील वीज ग्राहकांना लोडशेडिंगचा फटका बसणार आहे. काही वर्षांपूर्वी डोंबिवलीत आठ-नऊ तासांचे लोडशेडिंग केले जात होते. त्यामुळे नागरिक बेजार झाले होते. इन्व्हर्टरची मागणी प्रचंड वाढली होती. त्यानंतर सरकारने केलेल्या काही उपाययोजनांमुळे तसेच वीज बिलांच्या वसुलीनुसार लोडशेडिंगचे वेळापत्रक ठरविल्यामुळे डोंबिवलीतील अनेक भागातील वसुली वाढून लोडशेडिंग बंद झाले. मात्र यंदा पुन्हा लोडशेडिंग बोकांडी बसणार, अशी भीती कल्याण, डोंबिवलीत व्यक्त होत आहे.

इन्व्हर्टरचा बॅकअपही काही मिनिटांपुरता

  • गेल्या काही वर्षांत बत्ती गुल होत नसल्याने अनेकांनी इन्व्हर्टर काढून टाकले किंवा अनेकांकडे असलेल्या इन्व्हर्टरची देखभाल केली नसल्याने, ते काही मिनिटांच्या पलीकडे बॅकअप देत नाहीत.
  • परिणामी, गुरुवारी अचानक १२ तास वीज गायब झाल्याने अनेक घरातील सदस्य हे उकाड्याने बेजार झाले. रात्री उशिरापर्यंत वीज न आल्याने त्यांना अंधारात राहावे लागले.
  • मेणबत्त्या वगैरे बाळगण्याची गरज नसल्याने अनेकांना दुकानात धाव घ्यावी लागली. दुकानदारांकडेही मेणबत्त्यांचा पुरेसा साठा नव्हता. वीजसंकटामुळे पुन: पुन्हा हा दारुण अनुभव येण्याची चिन्हे दिसत असल्याने डोंबिवलीकरांची पाचावर धारण बसली आहे.
टॅग्स :electricityवीजdombivaliडोंबिवली