शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

तुम्हीच सांगा.. आम्ही "वर्क फ्रॉम होम" करायचे कसे? साचलेल्या पाण्यामुळे नोकरीवर पाणी फिरण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 15:36 IST

KDMC News: राज्यात इतर शहरांप्रमाणे कल्याण  डोंबिवली शहरात  सुद्धा  पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, थोडा जरी पाऊस पडला तरी, डोंबिवलीतील नांदीवली    हा परिसर लागलीच जलमय होतो. वारंवार या ठिकाणी पाणी साचत असल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.

डोंबिवली -  राज्यात इतर शहरांप्रमाणे कल्याण  डोंबिवली शहरात  सुद्धा  पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र,  थोडा जरी पाऊस पडला तरी, डोंबिवलीतील नांदीवली    हा परिसर लागलीच जलमय होतो. वारंवार या ठिकाणी पाणी साचत असल्याने येथील नागरिक मेटाकुटीला आले आहेत.पावसाळ्यात दरवर्षी पाणी साचून निर्माण होणाऱ्या विविध समस्यांना कंटाळून डोंबिवली पूर्वेच्या नांदीवली भागातील रहिवाशांनी केडीएमसी प्रशासनाविरोधात आज ठिय्या आंदोलन केले. यामध्ये अनेक महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पाणी साचल्यानं वीजपुरवठा वारंवार बंद करण्यात येतो. त्यामुळे आम्ही वर्क फ्रॉम होम करायचे तरी कसे? असा सवाल येथील संतप्त नागरीकांनी उपस्थित केला आहे.  साचलेल्या पाण्यामुळे  ऐन कोरोना काळात नोकरीवरच पाणी फिरण्याची वेळ आली असल्याच्या भावना व्यक्त केल्या जात आहे. (tell us .. how do we do "work from home"? Time to turn the water on the job due to stagnant water)

नांदीवली भागात यंदा पावसाने चांगलीच दाणादाण उडवून दिली. याठिकाणी असा कोणताही एक परिसर नव्हता ज्याठिकाणी पाणी साचले नव्हते. स्वामी समर्थ मठ परिसरातील रस्त्यावर तर गुडघाभर पाणी साचलेले होते. परिणामी इथला वीज पुरवठाही खंडीत झाल्याने याठिकाणचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. गेल्या काही वर्षांपासून या परिसरात पाण्याची समस्या निर्माण होत असून पालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही त्यात काही सुधारणा झाली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या अनेकांचे कार्यालयीन कामकाज घरूनच सुरू आहे. मात्र  थोडा पाऊस पडला तरी नांदीवली परिसर जलमय होतो. परिणामी वीजपुरवठा खंडित केला जातो. या सर्वांचा परिणाम घरातून काम करणाऱ्या  नागरिकांच्या नोकरीवर होत आहे.

पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी सर्वोदय पार्क ते नांदीवली नाला येथे दोन्ही बाजुंनी गटारे बांधणे, तुंबलेल्या गटारांची साफसफाई करणे, ज्या नविन बांधकामानी पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारे बांधलेली नाही त्यांच्यावर कारवाई करणे, खड्ड्यांमुळे चाळण झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करणे, सखल भागात लावण्यात आलेले डीपी महावितरणने त्वरित उंच करावेत आदी महत्वाच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. 15 दिवसांत या समस्या सोडवण्याबाबत कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यास रहिवाशांच्या जनक्षोभास सामोरे जावे लागेल. पालिका प्रशासनाच्या विरोधात सुद्धा आंदोलन उभारले जाईल. पालिकेच्या वरिष्ठ अधिका-यांना बोलावून सुद्धा ते या ठिकाणी आले नाही त्यामुळे या अधिका-यांचा सुद्धा आम्ही निषेध व्यक्त करतो. - मनोज घरत, मनसे  शहराध्यक्ष, डोंबिवली.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाelectricityवीज