शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
3
अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
4
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
5
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
6
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
7
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
8
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
9
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
10
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
11
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
12
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
13
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
14
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
15
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
16
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
17
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
18
पाकिस्तानमध्ये मध्यरात्री भूकंपाचे हादरे; ५.२ तीव्रतेचा धक्का, डोंगराळ भागात केंद्रबिंदू
19
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
20
"अरे ऐक ना जरा हसतोस का...", मराठी गाण्यावर विद्या बालनने बनवला रील, मिथिला पालकरला टॅग करत म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा फटका शेतमालाला, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची ४० टक्के कमी आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2021 16:29 IST

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे.

कल्याण-तौक्ते वादळाचा फटका शेतमालास बसला आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत आज ४० टक्के कमी शेतमालाची आवाक झाली आहे. त्यात वीज पुरवठा खंडीत असल्याने आलेला शेतमाल व्यापारी वर्गाला विकण्यात अडचणी आल्या. फासरा मालही विकला गेला नाही.

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजार समिती असा कल्याण बाजार समितीचा नावलौकीक आहे. या बाजार समितीत कालच्या तारखेत ३ हजार २५४ क्विंटल फळ आणि भाजी पाल्याचा माल आला होता. काल तौक्ते वादळामुळे आज पहाटे बाजारात फळ आणि भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. आजच्या तारखेत केवळ १ हजार २३४ क्विंटल इतकाच फळ आणि भाजीपाला आला. पुणे, जुन्नर, नाशिक या भागातून कल्याण बाजार समितीत शेतमाल येतो. त्याचबरोबर गुजरात आणि राज्यस्थान आणि मध्य प्रदेशातून शेतमाल येतो. काल वादळी वाऱ्याचा तडाखा बसल्याने शेतमालाची वाहतू करणारे शेतमालाचे ट्रक टेम्पो कल्याणपर्यंत पोहचू शकले नाही. कांदा बटाट्याची वाहतू करणारे टेम्पो ट्रक गुजरात आणि राजस्थानमधून आले होते.

मात्र ते कालच्या तारखेत कल्याणमध्ये दाखल झाले होते. आज शेतमालाची आवक वादळी वाऱ्यामुळे झालेली नाही. फळ आणि भाजीपालाप्रमाणोच कांदाच्या आवक ९६० क्विंटल, बटाट्याची आवक १६३५ क्विंटल आणि अन्नधान्याची आवाक १ हजार ६६० क्विंटल इतकी झाली आहे. कालच्या तारखेत कांद्याची आवक २ हजार ६५८ क्विंटल, बटाट्याची आवक १ हजार ३६० क्विंटल आणि अन्नधान्याची आवाक ९७४ क्विंटल इतकी झाली आहे.

कोरोनामुळे केवळ अत्यावश्यक बाब म्हणून कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजार सुरू ठेवण्यात आला आहे. तसेच दर रविवारी बाजार समिती बंद ठेवली जाते. कोरोनामुळे बाजारातील व्यापारी वर्गास फटका सहन करावा लागत असताना आत्ता तौक्ते वादळी वाऱ्यांचाही फटका बाजार समितीला सहन करावा लागला असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्यामकांत चौधरी यांनी सांगितले की, तौक्ते वादळी वाऱ्याचा फटका बाजार समितीला बसला आहे. बाजार समितीत  शेतमालाची आवाक ४० टक्के कमी झाली आहे. त्यात बाजार समितीचा वीज पुरवठा खंडीत असल्याने व्यापाऱ्यांना व्यापार करता आलेला नाही. फार कमी प्रमाणात मालाला उठाव होता. 

 

टॅग्स :kalyanकल्याणTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळMarketबाजार