शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

शहरीकरणाच्या वाटेवर असलेल्या गावांसाठी नळ पाणी योजना; ३८ कोटी ६० लाखाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 14:02 IST

Kalyan : कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाली, म्हारळ, वरप कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरुळ, खरड आणि खोणी या गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे.

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लागू केली जाणार आहे. त्यासाठी ३८ कोटी ६० लाख रुपयांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. या योजनेकरीता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाली, म्हारळ, वरप कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरुळ, खरड आणि खोणी या गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. या परिसरात नवे गृह निर्माण प्रकल्प आणि कंपन्या गुंतणूक करीत आहे. भविष्याचा विचार करुन नळपाणी पुरवठा योजना राबविली जाणार असून त्याचा फायदा संबंधित गावांना मिळणार आहे. 

जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबविण्याकरीता ४१ कोटी ६२ लाख रुपये खचाच्या रकमेस अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी नेवाळी, मांगरुळ, खरड या गावांतील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाळी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाच कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामांची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात त्याला अंतिम मंजूरी दिली जाईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर खोणी गावातील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याकरीता १० कोटी ४० लाख रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार असून जलकुंभ व अन्य गोष्टींसाठी जागेची पाहणी केली जात आहे. या गावांना एमआयडीकडून पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी