शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शहरीकरणाच्या वाटेवर असलेल्या गावांसाठी नळ पाणी योजना; ३८ कोटी ६० लाखाचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2022 14:02 IST

Kalyan : कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाली, म्हारळ, वरप कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरुळ, खरड आणि खोणी या गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे.

कल्याण : कल्याण लोकसभा मतदार संघातील कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील गावांमध्ये नळ पाणी पुरवठा योजना लागू केली जाणार आहे. त्यासाठी ३८ कोटी ६० लाख रुपयांचे प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहेत. या योजनेकरीता कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पाठपुरावा केला होता.

कल्याण तालुक्यातील पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाली, म्हारळ, वरप कांबा तसेच अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, मांगरुळ, खरड आणि खोणी या गावात जल जीवन मिशनच्या माध्यमातून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. या परिसरात नवे गृह निर्माण प्रकल्प आणि कंपन्या गुंतणूक करीत आहे. भविष्याचा विचार करुन नळपाणी पुरवठा योजना राबविली जाणार असून त्याचा फायदा संबंधित गावांना मिळणार आहे. 

जल जीवन मिशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून कल्याण आणि अंबरनाथ तालुक्यातील ३९ गावांमध्ये पाणी पुरवठा योजना राबविण्याकरीता ४१ कोटी ६२ लाख रुपये खचाच्या रकमेस अंदाजपत्रकात मंजूरी देण्यात आली आहे. त्यापैकी नेवाळी, मांगरुळ, खरड या गावांतील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी २२ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

पोसरी, शेलारपाडा, चिरड, पाळी या गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी पाच कोटीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या कामांची सर्व प्रक्रिया जवळपास पूर्ण करण्यात आली आहे. येत्या महिन्याभरात त्याला अंतिम मंजूरी दिली जाईल, अशी माहिती खासदार शिंदे यांनी दिली आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर खोणी गावातील पाणी पुरवठा योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्यासाठी एक कोटी २० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबविली जाणार आहे. त्याकरीता १० कोटी ४० लाख रुपयांचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. त्याचा सविस्तर अहवाल तयार असून जलकुंभ व अन्य गोष्टींसाठी जागेची पाहणी केली जात आहे. या गावांना एमआयडीकडून पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे.

टॅग्स :kalyanकल्याणWaterपाणी