शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 21:51 IST

'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.'

कल्याण- उल्हास नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावित. तसेच उल्हास नदी काठालगत मोहने आणि म्हारळ येतील अतिक्रमणे हटविण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेसह ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंत्रलयात पार पडलेल्या बैठकीत दिल्या.

उल्हास नदी पात्रात रासायनिक कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत आहे. तसेच सांडपाणी मल मूत्र नदी पात्रत प्रक्रिया न करता सोडले जात आहे. नदीपात्रत अतिक्रमणं झाली आहेत. या स्वरुपाच्या तक्रारी जागरुक नागरीक आणि सामाजिक संस्थांकडून जलसंपदा मंत्री पाटील यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव बसवंत स्वामी होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री पाटील यांनी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेने अतिक्रमणे निश्चीत करावीत. नदीलगत व नदीपात्रात बांधकामे करणाऱ्याना नोटिसा बजाविण्यात याव्यात. 

ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. नदीत मिसळत असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशी सूचना दिली आहे. एनआरसी कंपनीने उभारलेला जलबंधारा हा जीर्ण झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी, असेही पाटील यांनी सांगितले. 

या बैठकीस नदी प्रदूषण रोखण्यासठी अनेक वेळा प्रदीर्घ काळ उपोषण करणारे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, सामाजीक कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे आदी उपस्थीत होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका