शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 21:51 IST

'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.'

कल्याण- उल्हास नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावित. तसेच उल्हास नदी काठालगत मोहने आणि म्हारळ येतील अतिक्रमणे हटविण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेसह ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंत्रलयात पार पडलेल्या बैठकीत दिल्या.

उल्हास नदी पात्रात रासायनिक कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत आहे. तसेच सांडपाणी मल मूत्र नदी पात्रत प्रक्रिया न करता सोडले जात आहे. नदीपात्रत अतिक्रमणं झाली आहेत. या स्वरुपाच्या तक्रारी जागरुक नागरीक आणि सामाजिक संस्थांकडून जलसंपदा मंत्री पाटील यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव बसवंत स्वामी होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री पाटील यांनी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेने अतिक्रमणे निश्चीत करावीत. नदीलगत व नदीपात्रात बांधकामे करणाऱ्याना नोटिसा बजाविण्यात याव्यात. 

ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. नदीत मिसळत असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशी सूचना दिली आहे. एनआरसी कंपनीने उभारलेला जलबंधारा हा जीर्ण झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी, असेही पाटील यांनी सांगितले. 

या बैठकीस नदी प्रदूषण रोखण्यासठी अनेक वेळा प्रदीर्घ काळ उपोषण करणारे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, सामाजीक कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे आदी उपस्थीत होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका