शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

'उल्हास नदी प्रदूषणुक्त करण्यासाठी पावले उचला, नदीलगतची अतिक्रमणे हटविण्याची मोहिम राबवा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2021 21:51 IST

'ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा.'

कल्याण- उल्हास नदीच्या पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी पावले उचलावित. तसेच उल्हास नदी काठालगत मोहने आणि म्हारळ येतील अतिक्रमणे हटविण्याकरीता कल्याण डोंबिवली महापालिकेसह ठाणे जिल्हा परिषदेने मोहिम हाती घ्यावी, अशा सूचना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज मंत्रलयात पार पडलेल्या बैठकीत दिल्या.

उल्हास नदी पात्रात रासायनिक कंपन्या केमिकलयुक्त सांडपाणी प्रक्रिया न करता सोडत आहे. तसेच सांडपाणी मल मूत्र नदी पात्रत प्रक्रिया न करता सोडले जात आहे. नदीपात्रत अतिक्रमणं झाली आहेत. या स्वरुपाच्या तक्रारी जागरुक नागरीक आणि सामाजिक संस्थांकडून जलसंपदा मंत्री पाटील यांना प्राप्त झाल्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी जलसंपदा मंत्री पाटील यांनी आज बैठक घेतली. या बैठकीस जलसंपदा विभागाचे सचिव बसवंत स्वामी होते. तसेच कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. यावेळी जलसंपदा मंत्री पाटील यांनी कल्याण डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकेने अतिक्रमणे निश्चीत करावीत. नदीलगत व नदीपात्रात बांधकामे करणाऱ्याना नोटिसा बजाविण्यात याव्यात. 

ग्रामीण भागातील अतिक्रमण निर्मुलन करण्यासाठी जिल्हा परिषदेने पुढाकार घ्यावा. उल्हास नदी पात्रतील गाळ काढण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिकेने पुढाकार घ्यावा. नदीत मिसळत असलेल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प उभारावेत, अशी सूचना दिली आहे. एनआरसी कंपनीने उभारलेला जलबंधारा हा जीर्ण झाला आहे. त्याची दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. त्याची दुरुस्ती करण्याची कार्यवाही जलसंपदा विभागाने करावी, असेही पाटील यांनी सांगितले. 

या बैठकीस नदी प्रदूषण रोखण्यासठी अनेक वेळा प्रदीर्घ काळ उपोषण करणारे मी कल्याणकर सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नितीन निकम, सामाजीक कार्यकर्ते अनिल गलगली, माजी नगरसेवक उमेश बोरगांवकर, कैलास शिंदे आदी उपस्थीत होते. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलkalyanकल्याणkdmcकल्याण डोंबिवली महापालिका