शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी आठही पोलीस स्टेशनमध्ये विशेष कक्ष सुरू करणार

By मुरलीधर भवार | Updated: January 1, 2025 20:52 IST

सध्या आठही पोलिस ठाण्याकरीता प्रत्येकी एक दामिनी पथक कार्यरत आहे.

मुरलीधर भवार, कल्याण: कल्याणमधील अल्पवयीन मुलीवर अत्याचार तिची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली. या घटनेच्या पश्चात कल्याण डाेंबिवलीतील आठही पोसिस स्टेशनमध्ये महिला अत्याचाराच्या गुन्ह्यांकरीता विशेष कक्ष सुरु करणार असल्याची माहिती पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली आहे. सध्या आठही पोलिस ठाण्याकरीता प्रत्येकी एक दामिनी पथक कार्यरत आहे.

उपायुक्त झेंडे यांनी सांगितले की, २०२४ साली १८ वर्षाखाली मुलींवरील बलात्काराचे ६५ गुन्हे दाखले झाले. ते सगळेउघडकीस आले आहेत. गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण १०० टक्के आहे. १८ वर्षावरील महिलांवर झालेल्या बलात्काराच्या गुन्हयांची संख्या ५८ आहे. हे सगळे गुन्हे उघड झालेले आहेत. १८ वर्षाखालील मुलींचे विनयभंगाचे गुन्हे ७२ घडले आहे. त्यापैकी ७० गुन्हे उघडकीस आले आहेत. १८ वर्षावरील गुन्हयांचे १६३ घडले आहे. त्यापैकी १५६ उघडकीस आले आहेत. १८ वर्षाखालील मुलींच्या अपहरणाचे गुन्हे १५४ घडले. त्यापैकी १४३ गुन्हे उघड झाले. १८ वर्षापेक्षा जास्त महिलांच्या अपहरणाचे २ गुन्हे घडले. २ ही गुन्हे उघडकीस आले आहेत.

खूनाचे गुन्हे २१ घडले. खून्याच्या प्रयत्नाचे ३२ गुन्हे घडले. दरोड्याचे २ गुन्हे घडले. या तिन्ही प्रकारातील गुन्हे १०० टक्के उघडकीस आले आहेत. भाग एक ते पाच या प्रकरातील ३ हजार ४४ गुन्हे दाखळ झाले. त्यापैकी २ हजार ३७१ गुन्हे उघडकीस आले आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेत या गुन्ह्यांच्या प्रकारात ४९ गुन्हयांची घट झाली आहे. दारुबंदीचे ४८७ गुन्हे दाखल झाले. सगळे उघडकीस आले आहेत. २२ लाख ४५ हजार रुयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे अंमली पदार्थाचे ३६ गुन्हे दाखल झाले. या गुन्ह्यात ५१ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. तीन बारचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. १९ जणांची अग्नीशस्त्रे जप्त करण्याची कारवाई केली आहे. त्याचबरोबर १३३ चाकू सुरे धारदार शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.

घरफाेडीचे १९८ गुन्हे दाखल होते. त्यापैकी १२३ गु्न्हे उघड झाले. संघटीत गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पाच प्रस्ताव तयार केले. त्याअंतर्गत २७ आरोपींच्या विराेधात कारवाई केली. हद्दपारीच्या ७९ प्रस्तावांतर्गत ८७ आरोपींच्या विरोधात कारवाई केली आहे. यावर्षी चोरीस गेलेला १ कोटी ५१ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तो रेसिंग डेच्या निमित्ताने फिर्यादींना परत केला जाणार आहे. मागच्या वर्षी १ कोटी ३२ लाखाचा मुद्देमाल नागरीकांना परत करण्यात आला होता.

टॅग्स :kalyanकल्याणCrime Newsगुन्हेगारी