शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लोकसभा निवडणूकीपूर्वी जशी जादू दाखविली, तीच जादू आत्तादेखील दाखवा- आ. राजू पाटील

By मुरलीधर भवार | Updated: July 8, 2024 23:53 IST

पाणी प्रश्नावर मनसे आमदार आक्रमक, प्रश्न सोडवला नाही तर आम्ही आहोतच असा इशारा

मुरलीधर भवार, कल्याण: ग्रामीणमधील पाणी समस्या ज्वलंत आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांसोबत आज बैठक घेतली. लोकसभा निवडणूकीच्या दोन महिन्या आधी जशी जादू दाखवून पाणी पुरवठा करण्यात आला. तीच जादू आत्ता दाखवा. पाण्याच्या बाबती एमआयडीसी चालूगिरी करीत आहे. अधिवेशन संपल्यावर आम्हालापण काही काम नाही. पाणी प्रश्न सुटला नाही तर एमआयडीसीवर विशाल मोर्चा काढू असा इशारा मनसे आमदार पाटील यांनी दिला आहे.

कल्याण ग्रामीणमधील अनेक भागात पाणी टंचाई आहे. एकीकडे मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणी आहे. तर काही भागात पिण्यासाठीही पाणी मिळत नाही. चार दिवसापूर्वी एमआयडीसी निवासी भागातील नागरीकांनी पाणी प्रश्नावर डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात मुलांसोबत ठिय्या मांडला होता. अनंत रिजेन्सी या बड्या गृहसंकलतील नागरीकांना पाणी मिळत नसल्याने नागरीकांनी बिल्डरच्या कार्यालयात गोंधळ घातला. त्यावेळी त्यांचे बाऊन्सरसोबत वाद ही झाले. पाण्याचा प्रश्न ज्वलंत आहे. या प्रश्नाबाबत मनसे आमदार पाटील यांनी अधिवेशनात देखील हा मुद्दा उपस्थित केला आहे. आज सोमवारी मनसे आमदार  पाटील यांनी केडीएमसी आयुक्त इंदूराणी जाखड यांच्यासोबत तातडीची बैठक घेतली. लवकरात लवकर ही समस्या सूटली पाहिजे अशी सूचना आयुक्ताना दिले आहेत.

आमदार पाटील यांनी सांगितले, माझ्या भागात नेतिवली, पिसवली, दावडी, डोंबिवली जीमखाना या भागात पाणी टंचाई सातत्याने आहे. काही लोक उपोषणाला बसले. काहींनी माेर्चे काढले. अनंतममध्ये पाणी टंचाई आहे. आमचे एकच सांगणे होते. फक्त लोकसभा निवडणूका लागायच्या आधी दाेन महिने जी जादू केली होती. तीच जादू करा. त्या पद्धतीने पाणी आले तरी चालेल. टप्प्या टप्प्याने हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले आहे. अनायसे पाणी प्रकल्पाच्या स्वच्छतेसाठी दोन दिवस प्रकल्प बंद ठेवला जाणार आहे. त्यांना आठ दिवसांचा अवधी दिला आहे. आठ दिवसात परिस्थिती सुधारली नाही तर एमआयडीसीवर मोर्चा काढणार आहे. याच्यात केडीएमसीकडून काही प्रमाणात हलगर्जीपणा होत असेल. परंतू सगळ्यात जास्त चालूगिरी एमआयडीसी करते. सातत्याने आम्हाला खोटे आकडे द्यायचे. तुम्हाला ८० एमएलडी पाणी येईल असे एमआयडीसी सांगते. पण तशी परिस्थिती सध्या काही दिसत नाही. त्यामुळे जनतेचा रोष मुख्यत: एमआयडीसीवर आहे.

टॅग्स :MNSमनसेkalyanकल्याणRaju Patilराजू पाटील