शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर; कल्याण लोकसभेतून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तब्बल ७१३ बसेस होणार रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 19:07 IST

पहिल्या टप्प्यातील ४६५ बस आज रवाना. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत बस केल्या मार्गस्थ

कल्याण -शिवसेनेकडून यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यात आला आहे. शिवसेना मुख्यनेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने यंदाही कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात गणेशोत्सवासाठी तब्बल ७१३ मोफत बसेस सोडण्यात येणार आहेत. यापैकी कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ येथून आज रवाना होणाऱ्या ४६५ बसगाड्यांना खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवत मार्गस्थ केले. सर्व गणेशभक्तांनी यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले. 

गणेशोत्सव म्हणजे सर्व कोकण वासियांसाठी एक आनंदसोहळाच. या आनंद सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मोठया संख्येने चाकरमानी कोकणात जात असतात. याच पार्श्वभूमीवरी दरवर्षी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून रत्नागिरी, चिपळूण, लांजा, देवगड यांसह सांगली, सातारा आणि कोल्हापूर याठिकाणी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करून देण्यात येते. दरवर्षी कल्याण लोकसभेतून सुमारे ७०० ते ८०० बस कोकणात रवाना होत असतात.

राज्यात गणेशोत्सवाच्या तयारीसाठी गणेशभक्तांची लगबग सुरू झाली आहे. दरवर्षी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात हजारोंच्या संख्येने गणेशभक्त जात असतात. या गणेशभक्तांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून यंदा ७१३ मोफत बसगाड्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मागील दोन महिन्यांपासून यासाठी मतदारसंघातील शेकडो नागरिकांनी आपली नाव नोंदणी केली होती. यानुसार या सर्व बसगाड्या आज रविवार २४ ऑगस्ट आणि उद्या सोमवार २५ ऑगस्ट रोजी कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात रवाना होणार आहेत. यासर्व गाडयांना खासदार डॉ.शिंदे हे भगवा झेंडा दाखवून गाड्या रवाना करणार आहेत. यातील कल्याण, डोंबिवली, मुंब्रा, उल्हासनगर तसेच अंबरनाथ येथील एकूण ४६५ गाड्या कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात आज रवाना झाल्या. यासाठी गणेशभक्तांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यामध्ये आज, २४ ऑगस्ट रोजी अंबरनाथ शहरातून ११, उल्हासनगर शहरातून ४, कल्याण पूर्वेतील १२०, कल्याण पश्चिमेतून १७ तर डोंबिवली शहर आणि डोंबिवली ग्रामीण येथून ३१० आणि मुंब्रा येथून ३ बसेस सोडण्यात आल्या.

तर उद्या २५ ऑगस्ट रोजी दिवा शहरातून ११७ आणि कळवा येथून १३१ बस सोडण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने दोन दिवसात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात ७१३ बस मोफत सोडण्यात येणार आहे.