शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

कल्याण: रिक्षाचालक मदतीच्या प्रतीक्षेत; ६० हजारपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीदेखील झाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 17:00 IST

रिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही. कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. 

ठळक मुद्देरिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही.कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. 

अनिकेत घमंडी कल्याण : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षा चालकांना १५०० रुपयांचे अर्थसहाय्य राज्य शासन देणार आहे, मात्र त्यासाठी एका इंटरनेट लिंकद्वारे रिक्षाचालकांना आधारकार्डची ओळख गरजेची आहे. मात्र अनेकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडले न गेलेले नाही. त्यामुळे कल्याण आरटीओ समोर ते खात्याशी लिंक करण्याचे मोठे आव्हान असून आतापर्यंत ६० हजार रिक्षापैकी अद्याप १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्या संदर्भातील नोंदी कशा करायच्या? हा मोठा प्रश्न आरटीओ समोर आहे. 

आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी ही माहिती दिली असून कोणतीही चूक होऊ नये यासाठी त्यांनी आता आधारकार्ड लिंक करण्यासंदर्भात आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या खात्याशी आधार कार्ड जोडले जाणार आहे. शुक्रवार पासून त्याबाबतचे काम करण्यात येणार होते. त्यासोबतच शनिवार, रविवार दोन दिवसात १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते, तर त्या पाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने प्रत्यक्ष रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. 

आधी सुरुवातीला रिक्षा चालकांना ती लिंक मिळत नव्हती, सतत हँग होत असल्याची समस्या भेडसावली होती. त्यामुळे रिक्षा संघटनानी नाराजी दर्शवली होती. या आरटीओ हद्दीत बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे, त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे. पण त्यात काहींचे परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन, बँज आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही असेही अधिकारी म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारAdhar Cardआधार कार्ड