शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

कल्याण: रिक्षाचालक मदतीच्या प्रतीक्षेत; ६० हजारपैकी १० हजार रिक्षाचालकांच्या नोंदीदेखील झाल्या नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2021 17:00 IST

रिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही. कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. 

ठळक मुद्देरिक्षाचालकांचे आधार बँक खात्याशी जोडलेले नाही.कडक निर्बध काळातील १५०० रुपयांच्या मदतीची प्रतीक्षाच. 

अनिकेत घमंडी कल्याण : कोरोनाच्या कडक निर्बंधांच्या काळात रिक्षा चालकांना १५०० रुपयांचे अर्थसहाय्य राज्य शासन देणार आहे, मात्र त्यासाठी एका इंटरनेट लिंकद्वारे रिक्षाचालकांना आधारकार्डची ओळख गरजेची आहे. मात्र अनेकांचे आधारकार्ड बँक खात्याशी जोडले न गेलेले नाही. त्यामुळे कल्याण आरटीओ समोर ते खात्याशी लिंक करण्याचे मोठे आव्हान असून आतापर्यंत ६० हजार रिक्षापैकी अद्याप १० हजार रिक्षांच्या नोंदीदेखील झालेल्या नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या महिना अखेरीस उद्दिष्ट असलेल्या ४० हजार रिक्षाचालकांच्या त्या संदर्भातील नोंदी कशा करायच्या? हा मोठा प्रश्न आरटीओ समोर आहे. 

आरटीओ अधिकारी तानाजी चव्हाण यांनी ही माहिती दिली असून कोणतीही चूक होऊ नये यासाठी त्यांनी आता आधारकार्ड लिंक करण्यासंदर्भात आरटीओ कार्यालयात दोन केंद्रे सुरू केली आहेत. त्या माध्यमातून रिक्षाचालकांच्या खात्याशी आधार कार्ड जोडले जाणार आहे. शुक्रवार पासून त्याबाबतचे काम करण्यात येणार होते. त्यासोबतच शनिवार, रविवार दोन दिवसात १० हजारांचा टप्पा पार करण्याचे लक्ष्य असल्याचे चव्हाण म्हणाले. आधी सॉफ्टवेअर मिळत नव्हते, तर त्या पाठोपाठ आता ही समस्या समोर आल्याने प्रत्यक्ष रिक्षाचालकांना मदत मिळण्यासाठी विलंब होत आहे. 

आधी सुरुवातीला रिक्षा चालकांना ती लिंक मिळत नव्हती, सतत हँग होत असल्याची समस्या भेडसावली होती. त्यामुळे रिक्षा संघटनानी नाराजी दर्शवली होती. या आरटीओ हद्दीत बदलापूर, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, मुरबाड अशी मोठी हद्द आहे, त्यामध्ये येणाऱ्या सुमारे ६० हजार रिक्षाचालकांना ती मदत मिळणार आहे. पण त्यात काहींचे परवाना, आधारकार्ड, बँक खाते, लायसन, बँज आदी समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत असून प्रत्यक्ष मदत मिळायला आणखी किती वेळ लागेल हे आताच सांगता येणार नाही असेही अधिकारी म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारAdhar Cardआधार कार्ड