शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

रेराने दोन आठवड्यात सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे; उच्च न्यायालयाचे आदेश

By मुरलीधर भवार | Updated: November 8, 2023 16:17 IST

केडीएमसी हद्दीतील ६५ बेकायदा बांधकाम प्रकरण

कल्याण-कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामधारकांनी रेर, केडीएमसी आणि राज्य सरकारची फसवणू केल्या प्रकरणी उच्च न्यायालयता न्यायप्रविष्ट असलेल्या याचिकेवर काल सुनावणी झाली. या सुनावणी दरम्यान रेराने येत्या दोन आठवड्यात प्रथम सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे. त्यानंतर राज्य सरकारने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करावे असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणातील पुढील सुनावणी ३ जानेवारी २०२४ मध्ये होणार आहे.

महाालिका हद्दीतील काही बिल्डरांनी महापालिकेने बांधकाम परवानगी दिलेली नसताना खोट्या कागदपत्रे तयार करुन महापालिकेने परवानगी दिल्याचे भासविले. या खोट्या बांधकाम प्रमाणपत्रांची कागदपत्रे रेराला सादर केली. रेराकडून बांधकाम नोंदणी प्रमाणपत्र मिळविले. ही बाब वास्तूविशारद संदीप पाटील यांनी माहिती अधिकारात उघड आणली होती. या प्रकरणी महापालिका प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यानंतर याच प्रकरणात पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली हाेती.

महापालिकेने या प्रकरणात ६५ बिल्डरांच्या विरोधात दोन पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले. त्याची चौकशी एसआयडी आणि ईडीकडून सुरु आहे. दरम्यान या प्रकरणातील न्यायालयीन याचिकेवरील सुनावणी मागच्या वर्षी डिसेबर महिन्यात झाली होती. त्यानंतर ही याचिका सुनावणीकरीता पटलावर आली नाही. मात्र न्यायालयाने या प्रकरणात महापालिका, राज्य सरकार आणि रेराने सत्यप्रतिज्ञा पत्र साद करावे असे आदेशीत केले होते. न्यायालयाच्या आदेशानंतरही रेरा, राज्य सरकारने सत्यप्रतिज्ञा पत्र सादर केलेले नव्हते. काल झालेल्या सुनावणी दरम्यान न्यायालयाने रेराने येत्या दोन आठवड्यात २९ नाेव्हेंबरपर्यंत सत्यप्रतिज्ञा पत्र सादर करण्याची मुदत दिली आहे. रेराने सत्य प्रतिज्ञा पत्र दाखल केल्यावर राज्य सरकारने त्या तारखेपासून दोन आठवड्याच्या आत राज्य सरकारचे सत्यप्रतिज्ञा पत्र दाखल करावे. रेरा आणि राज्य सरकारने सत्यप्रतिज्ञा पत्र दाखल केल्यावर याचिकाकर्त्यास काही म्हणणे मांडायचे असल्यास याचिकाकर्ताही त्याचे म्हणणे मांडू शकतो असे न्यायालयाने सांगितले आहे.

महापालिकेने न्यायालयात सत्यप्रतिज्ञा पत्र दाखल केले आहे. त्यावेळी महापालिकेने ६५ पैकी एका बेकायदा इमारतीच्या विरोधात कारवाई केल्याचे म्हटले आहे. मात्र आत्ता राज्य सरकार जे सत्यप्रतिज्ञा पत्र दाखल करणार आहे. त्याकरीता महापालिकेकडूनच माहिती घेतली जाईल. महापालिकेने गेल्या वर्षभरात काय कारवाई केली त्याची माहिती महापालिकेकडून राज्य सरकारला दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकार न्यायालयात सत्यप्रतिज्ञा पत्रा द्वारे काय माहिती देते याकडे याचिकाकर्ते पाटील यांचे लक्ष लागले आहे.

आत्तापर्यंतच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान महापालिकेने दाखल केलेले गुन्हे, त्याचा ईडी आणि एसआयडटीकडून सुरु असलेल्या तपासाबाबत अद्याप विचारणा झालेली नाही. जानेवारी २०२४ च्या सुनावणी पश्चात या गोष्टी देखील न्यायालयीन सुनावणीत येऊ शकतात.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयRera act Maharashtra 2017महारेरा कायदा 2017