शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 05:46 IST

KDMC तील ६५ बेकायदा इमारतींवर लवकरच हातोडा, विधानसभा निवडणुकीमुळे पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई करता आलेली नाही. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल.

मुरलीधर भवारकल्याण : खोट्या कागदपत्रांच्या आधारे महापालिकेची परवानगी मिळविल्याचे भासवून ‘रेरा’ प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविणाऱ्या ६५ बेकायदा इमारती येत्या तीन महिन्यांत जमीनदोस्त करा, असे आदेश उच्च न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनास अलीकडेच दिले आहेत. त्यामुळे या बेकायदा इमारतींमध्ये राहणाऱ्या हजारो नागरिकांच्या डोक्यावर बेघर होण्याची टांगती तलवार आहे.

या प्रकरणातील याचिकाकर्ते संदीप पाटील यांनी सांगितले की, महापालिका हद्दीतील ६५ इमारतींना महापालिकेची परवानगी मिळाल्याचे भासवून बिल्डरांनी ‘रेरा’ प्राधिकरणाकडून बांधकाम प्रमाणपत्र मिळविले. ही बाब पाटील यांनीच माहिती अधिकारात उघड केली. त्यानंतर या प्रकरणात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर १९ नोव्हेंबरला सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान न्यायालयाने महापालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. 

६५ बेकायदा इमारतींवर काय कारवाई करणार, अशी विचारणा केली. महापालिका प्रशासनाने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, या ६५ बेकायदा इमारतींना कारवाईची नोटिस बजावली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे पोलिस बंदोबस्त न मिळाल्याने कारवाई करता आलेली नाही. पोलिस बंदोबस्त मिळताच कारवाई केली जाईल. त्यावर येत्या तीन महिन्यांत या ६५ बेकायदा इमारती जमीनदोस्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ६५ पैकी ४ बेकायदा इमारती एमआयडीसी हद्दीत येतात. एक इमारत एमएमआरडीएच्या हद्दीत आहे. सहा इमारती पाडण्याची कारवाई केली आहे. चार इमारतींवर अर्धवट कारवाई केली आहे. उर्वरित ४८ इमारतींवर कारवाई होणे बाकी असून, त्यांत नागरिक वास्तव्य करीत आहेत.  

मंजूर आराखडा ४८ तासांत अपलोड करा

राज्यातील प्रत्येक महापालिकेची वेबसाईट महारेरा प्राधिकरणाशी जोडणे आवश्यक आहे. कोणत्याही बिल्डरचा इमारत बांधकाम आराखडा महापालिकेने मंजूर केल्यावर तो ४८ तासांच्या आत महारेराच्या साइटवर अपलोड करणे बंधनकारक आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांची घरखरेदीतील फसवणूक टाळणे शक्य होईल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.  

१६ जणांची ५६ बँक खाती गोठवली

६५ बेकायदा इमारतींचे प्रकरण चौकशीत उघड होताच मानपाडा पोलिस ठाण्यात बिल्डरांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते. तसेच बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून सही, शिक्के, संगणक जप्त केले होते. या प्रकरणी एसआयटी आणि ईडीमार्फत चौकशी करण्यात आली होती. जवळपास १६ जणांची ५६ बँक खाती गोठविण्यात आली होती.

सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

बिल्डरांनी बेकायदा इमारती बांधल्या. त्या इमारतींतील घरे सामान्य नागरिकांना विकली. यात नागरिकांची फसवणूक झाली. त्यांच्या घरावर आता हातोडा चालणार असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान कोण भरून देणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. फसवणूक करणारे बिल्डर मात्र मोकाट आहेत. 

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाHigh Courtउच्च न्यायालय