शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
3
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
4
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
5
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
6
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
7
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
8
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
9
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
10
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
11
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
12
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
13
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
14
Shivaji Nagar Metro: 'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
15
Navratri 2025 Dates: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
16
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
17
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
18
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
19
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
20
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा

“काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला”; रामदास आठवले यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:08 IST

महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे.

कल्याण: महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, १९९८ साली शरद पवार यांच्यासोबत मी होतो. शरद पवारांना काँग्रेसने पक्षातून बाहेर काढून टाकले होते. पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नसून, काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा खुलासा आठवले यांनी केला आहे. 

 केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी कल्याणला भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना आठवले यांनी उपरोक्त खुलासा केला. पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला ही गीते यांची टीका चुकीची असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याचे वक्तव्य केले आहे. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, सध्या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. संजय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहे. प्रवक्ते, खासदार आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी आरोप करण्यात वेळ घालवू नये. त्यापेक्षा विकासाची कामे करण्यावर लक्ष द्यावे असा सल्ला राऊत यांना आठवले यांनी दिला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सुरु आहे. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, साखर कारखाना चालविण्यास काही एक हरकत नाही. मात्र कारखाना चालवित असताना भ्रष्टाचार करु नये. आर्थिक अनियमितता असता कामा नये. किरीट सोमय्या यांनी अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. त्याचे पुरावे त्यांनी ईडीला सादर केले आहे. चौकशीची मागणी केली आहे. जे लोक भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या मंडळींकडे काही पुरावे असतील त्यांनीही त्यांची प्रकरणो बाहेर काढावीत असे खुले आव्हान आठवले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे. 

वालधूनी नदीलगत असलेल्या वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांना अतिवृष्टीच्या पाण्याचा फटका बसला होता. नागरीकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी साकेत बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सुनिल घेगडमल हे आज उपोषणाला बसणार होते. केंद्रीय मंत्री आठवले या उपोषण स्थली येणार हे कळताच सरकारी यंत्रणा जागी झाली. त्यांनी आठवले यांच्या समोरच घेगडमल यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच वालधूनी नदीचे पाणी घरांमध्ये शिरु नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी देखील पूर्ण करण्याचे आश्वासन नायब तहसीलदारांनी दिले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRamdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnant Geeteअनंत गीतेPoliticsराजकारण