शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

“काँग्रेसनेच शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला”; रामदास आठवले यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 15:08 IST

महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे.

कल्याण: महाविकास आघाडी सरकारचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या पाठित खंजीर खुपसला असल्याची टीका शिवसेनेचे नेते अनंत गीते यांनी केली आहे. यावर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले की, १९९८ साली शरद पवार यांच्यासोबत मी होतो. शरद पवारांना काँग्रेसने पक्षातून बाहेर काढून टाकले होते. पवार यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला नसून, काँग्रेसनेच पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा खुलासा आठवले यांनी केला आहे. 

 केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांनी कल्याणला भेट दिली. यावेळी पत्रकारांसोबत संवाद साधताना आठवले यांनी उपरोक्त खुलासा केला. पवारांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला ही गीते यांची टीका चुकीची असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले यांनी सांगितले. शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात सव्वा रुपयाचा दावा ठोकणार असल्याचे वक्तव्य केले आहे. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता आठवले यांनी सांगितले की, सध्या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु आहे. संजय राऊत हे सत्ताधारी पक्षात आहे. प्रवक्ते, खासदार आणि शिवसेना नेते आहेत. त्यांनी आरोप करण्यात वेळ घालवू नये. त्यापेक्षा विकासाची कामे करण्यावर लक्ष द्यावे असा सल्ला राऊत यांना आठवले यांनी दिला आहे. 

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल सुरु आहे. याविषयी आठवले यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, साखर कारखाना चालविण्यास काही एक हरकत नाही. मात्र कारखाना चालवित असताना भ्रष्टाचार करु नये. आर्थिक अनियमितता असता कामा नये. किरीट सोमय्या यांनी अनियमितता आणि भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. त्याचे पुरावे त्यांनी ईडीला सादर केले आहे. चौकशीची मागणी केली आहे. जे लोक भाजपमध्ये गेले आहेत. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या मंडळींकडे काही पुरावे असतील त्यांनीही त्यांची प्रकरणो बाहेर काढावीत असे खुले आव्हान आठवले यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केले आहे. 

वालधूनी नदीलगत असलेल्या वालधूनी, अशोकनगर परिसरातील नागरीकांना अतिवृष्टीच्या पाण्याचा फटका बसला होता. नागरीकांना नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी साकेत बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापकीय अध्यक्ष सुनिल घेगडमल हे आज उपोषणाला बसणार होते. केंद्रीय मंत्री आठवले या उपोषण स्थली येणार हे कळताच सरकारी यंत्रणा जागी झाली. त्यांनी आठवले यांच्या समोरच घेगडमल यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. तसेच वालधूनी नदीचे पाणी घरांमध्ये शिरु नये यासाठी संरक्षक भिंत बांधण्याची मागणी करण्यात आली होती. ही मागणी देखील पूर्ण करण्याचे आश्वासन नायब तहसीलदारांनी दिले आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणRamdas Athawaleरामदास आठवलेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसAnant Geeteअनंत गीतेPoliticsराजकारण