शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी दिव्यातून विशेष गाड्या सोडा; मनसेची मागणी

By मुरलीधर भवार | Updated: August 4, 2022 20:26 IST

मनसे आमदार राजू पाटील यांनी घेतली रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट

Ganeshotsav 2022 | कल्याण: कोकणातील गणेशोत्सवानिमित्त जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे.परंतु दिवा जंक्शन येथून कोकण वासियांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडण्याची मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.आमदार पाटील यांनी रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची आज भेट घेतली असून दिव्यातील स्थानकावरील समस्या देखील त्यांच्या समोर मांडण्यात आल्या आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चकरमान्यांची संख्या ही लक्षणीय आहे. वास्तविक रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदी गोव्यापर्यत राहणारा मुंबईकर दिवा, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, नेवाळी, उल्हासनगर, बदलापूरसह अगदी कसारा, खोपोलीपर्यंत नोकरी निमित्त स्थायिक झाला आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात चाकरमानी आपल्या आपल्या कुंटुबासह मूळ गावी जाऊन गणेशोत्सव साजरा करत असतो. मात्र गणेशोत्सव तोंडावर आल्यावर दिवा जंक्शन वरून गाड्या सोडण्याबाबत रेल्वे प्रशासनाकडून घोषणा करण्यात येते. परंतु त्यावेळी प्रवाश्यांमध्ये गोंधळ उडून नियोजन करण्यात अडचणी येत असतात.त्यामुळे तातडीने रेल्वे प्रशासनाने घोषणा करावी जेणेकरून चाकरमान्यांना नियोजन करणे सोपे होईल अशी मागणी आमदार पाटील यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.

आमदार पाटील यांच्या मागणीला रेल्वे प्रशासनाने देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे आता रेल्वे अधिकारी यांची अधिकृत घोषणा कधी करणार हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आमदार राजू पाटील यांनी रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतल्यानंतर दिवा स्थानकातील समस्या त्यांच्या समोर मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने दिवा जंक्शन वरून गणपती स्पेशल ट्रेन सुरू करने, दिवा पनवेल -वसई रोड -पनवेल -रोहा रेल्वे मार्गावरील पॅसेंजरचे बंद केलेले रेल्वे थांबे सुरू करणे किंवा रेल्वे स्थानकावरील तिकीट घर शौचालय व शेड तातडीने कार्यान्वित करणे, लोकग्राम ब्रिज सद्यस्थिती, दिवा स्टेशन मास्तर हद्द विभाजन,दिवा रेल्वे स्टेशन परिसरात आपत्कालीन वैद्यकीय कक्ष उभारणे, दिवा रेल्वे स्थानकात रुग्णवाहिकेची सुविधा उपलब्ध करणे तसेच दिवा जंक्शन येथे हमाल यांची व्यवस्था करणे व आगासन व दातिवली रेल्वे फाटक रस्ता डांबरीकरणाबाबत चर्चा करण्यात आली आहे.

रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी देखील सकारात्मक प्रतिसाद या मागण्यांना दिला असून लवकरच सर्व समस्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन आमदार पाटील यांना दिले आहे.यावेळी मनसे रेल्वे सेनेचे अध्यक्ष .जितू पाटील, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता महासंघ चे अध्यक्ष नंदकुमार देशमुख, मनसे जिल्हा संघटक हर्षद पाटील , दिवा मनसे अध्यक्ष तुषार पाटील आणि मनसेचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

दिवा पूर्वेकडून पश्चिमेकडे ठाणे महानगरपालिकेकडून पाणी पुरवठा करण्यासाठी पुश थ्रू करण्याचा प्रस्ताव प्रलंबित आहे. मात्र यावर अद्याप रेल्वे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही. या बाबत रेल्वे विभागाने ठाणे मनपाला तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

टॅग्स :Raju Patilराजू पाटीलMNSमनसेrailwayरेल्वेdivaदिवा