शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

"मोडकळीस आलेल्या रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची रेल्वे विभागाकडून लवकर पुनर्बांधणी करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 13:54 IST

Shrikant Shinde : भारतीय रेल्वेकडे ४३००० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोकळी आणि रिकामी जमीन असून त्यापैकी मध्य रेल्वेकडे २०२२ एकर मोकळी जमीन आहे.

कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान शून्य प्रहर काळामध्ये कल्याण मधील भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानासंबंधित असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विषय सभागृहात मांडला. सप्टेंबर २०२० मध्ये कल्याणमधील २१ एकर रेल्वेच्या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहत उभारण्यासाठीचे काम रेल्वे लँड डेव्हलोपमेंट ऑथोरिटीकडे देण्यात आले होते. परंतु अद्यापही या जागेवर कोणतेही काम झाले नाही आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता ज्याप्रमाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास पीपीपी तत्वावर केला जात आहे त्याचप्रमाणे रेल्वेच्या जमीन आणि वसाहतींचा पुर्नविकास देखील पीपीपी तत्वावर केला जावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात केली.  

भारतीय रेल्वेकडे ४३००० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोकळी आणि रिकामी जमीन असून त्यापैकी मध्य रेल्वेकडे २०२२ एकर मोकळी जमीन आहे. अनेक ठिकाणी रेल्वे कर्मचारी निवासस्थाने आहेत जी सध्या जीर्ण अवस्थेत असून ती आता मोडकळीस आली असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात दिली. अशा जमिनी आणि इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम आरएलडीएला म्हणजेच रेल्वे लँड डेव्हलोपमेंट ऑथोरिटीला देण्यात आले असून आरएलडीए देशभरातील ८४ रेल्वे वसाहती, पुनर्विकास प्रकल्प आणि जुन्या स्टाफ क्वार्टर पाडून तेथे निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित करण्याचे काम करत आहे. यामध्ये जुलै २०२१ मध्ये मुंबई येथील सुपारी बाग कॉलनी तसेच २०२० मध्ये दिल्लीच्या बुलेवर्ड रोड रेल्वे कॉलनी यांचा देखील समावेश आहे. यापैकी सप्टेंबर २०२० मध्ये कल्याण मधील २१ एकर रेल्वेच्या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहत उभारण्यासाठीचे काम रेल्वे लँड डेव्हलोपमेंट ऑथोरिटीकडे देण्यात आले होते. परंतु त्यावर अद्याप कोणतेही काम सुरू झाले नसल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पांना झालेल्या विलंबामुळे खर्चात वाढ होत आहे आणि त्यामुळे आरएलडीए च्या कार्यक्षमतेवर देखील शंका निर्माण होते त्यामुळे सर्वप्रथम आरएलडीएच्या कार्यप्रणालीचा तात्काळ आढावा घेण्याचा मुद्दा देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अधोरेखित केला.

ज्याप्रमाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास पीपीपी तत्वावर केला जात आहे त्याचप्रमाणे रेल्वेच्या जमीन आणि वसाहतींचा पुर्नविकास देखील पीपीपी तत्वावर केला गेल्यास मुख्य आणि महत्वाच्या ठिकाणी जमीन असल्याने विकासक आणि बिल्डर त्यात गुंतवणूक करण्यास तयार होतील आणि रेल्वे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी मालमत्ता निर्धारित वेळेत तयार करू शकतील आणि महसूलाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक मालमत्ता देखील विकसित केल्या जाऊ शकतील, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली असून त्याचा वापर अवैध कामांसाठी होत आहे. त्यामुळे या रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची पुनर्बांधणी रेल्वे विभागाने करावी. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहती तसेच व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्यास रेल्वेलाही त्यातून महसूल मिळेल, अशी भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहासमोर मांडत सदर बांधकाम मुदतीत पूर्ण कराण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या