शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

"मोडकळीस आलेल्या रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची रेल्वे विभागाकडून लवकर पुनर्बांधणी करावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 13:54 IST

Shrikant Shinde : भारतीय रेल्वेकडे ४३००० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोकळी आणि रिकामी जमीन असून त्यापैकी मध्य रेल्वेकडे २०२२ एकर मोकळी जमीन आहे.

कल्याण - कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आज अधिवेशनादरम्यान शून्य प्रहर काळामध्ये कल्याण मधील भारतीय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवास स्थानासंबंधित असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या विषय सभागृहात मांडला. सप्टेंबर २०२० मध्ये कल्याणमधील २१ एकर रेल्वेच्या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहत उभारण्यासाठीचे काम रेल्वे लँड डेव्हलोपमेंट ऑथोरिटीकडे देण्यात आले होते. परंतु अद्यापही या जागेवर कोणतेही काम झाले नाही आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी होत असलेला विलंब लक्षात घेता ज्याप्रमाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास पीपीपी तत्वावर केला जात आहे त्याचप्रमाणे रेल्वेच्या जमीन आणि वसाहतींचा पुर्नविकास देखील पीपीपी तत्वावर केला जावा, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात केली.  

भारतीय रेल्वेकडे ४३००० हेक्टर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोकळी आणि रिकामी जमीन असून त्यापैकी मध्य रेल्वेकडे २०२२ एकर मोकळी जमीन आहे. अनेक ठिकाणी रेल्वे कर्मचारी निवासस्थाने आहेत जी सध्या जीर्ण अवस्थेत असून ती आता मोडकळीस आली असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहात दिली. अशा जमिनी आणि इमारतींच्या पुनर्बांधणीचे काम आरएलडीएला म्हणजेच रेल्वे लँड डेव्हलोपमेंट ऑथोरिटीला देण्यात आले असून आरएलडीए देशभरातील ८४ रेल्वे वसाहती, पुनर्विकास प्रकल्प आणि जुन्या स्टाफ क्वार्टर पाडून तेथे निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता विकसित करण्याचे काम करत आहे. यामध्ये जुलै २०२१ मध्ये मुंबई येथील सुपारी बाग कॉलनी तसेच २०२० मध्ये दिल्लीच्या बुलेवर्ड रोड रेल्वे कॉलनी यांचा देखील समावेश आहे. यापैकी सप्टेंबर २०२० मध्ये कल्याण मधील २१ एकर रेल्वेच्या जागेवर रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहत उभारण्यासाठीचे काम रेल्वे लँड डेव्हलोपमेंट ऑथोरिटीकडे देण्यात आले होते. परंतु त्यावर अद्याप कोणतेही काम सुरू झाले नसल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. प्रकल्पांना झालेल्या विलंबामुळे खर्चात वाढ होत आहे आणि त्यामुळे आरएलडीए च्या कार्यक्षमतेवर देखील शंका निर्माण होते त्यामुळे सर्वप्रथम आरएलडीएच्या कार्यप्रणालीचा तात्काळ आढावा घेण्याचा मुद्दा देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अधोरेखित केला.

ज्याप्रमाणे रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास पीपीपी तत्वावर केला जात आहे त्याचप्रमाणे रेल्वेच्या जमीन आणि वसाहतींचा पुर्नविकास देखील पीपीपी तत्वावर केला गेल्यास मुख्य आणि महत्वाच्या ठिकाणी जमीन असल्याने विकासक आणि बिल्डर त्यात गुंतवणूक करण्यास तयार होतील आणि रेल्वे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी निवासी मालमत्ता निर्धारित वेळेत तयार करू शकतील आणि महसूलाच्या दृष्टिकोनातून व्यावसायिक मालमत्ता देखील विकसित केल्या जाऊ शकतील, असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. यासोबतच माझ्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची दुरवस्था झाली असून त्याचा वापर अवैध कामांसाठी होत आहे. त्यामुळे या रेल्वे कर्मचारी निवासस्थानांची पुनर्बांधणी रेल्वे विभागाने करावी. रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी निवासी वसाहती तसेच व्यावसायिक मालमत्ता विकसित केल्यास रेल्वेलाही त्यातून महसूल मिळेल, अशी भूमिका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहासमोर मांडत सदर बांधकाम मुदतीत पूर्ण कराण्याची अपेक्षा व्यक्त केली. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या