शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:53 IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश.

ठळक मुद्देअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश.

कल्याण : कल्याण-अतिवृष्टीच्या काळात महापालिका हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाकण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तौक्ते वादळाचा फटका कल्याणला बसला होता. त्यावेळी कल्याण शीळ रस्त्यावर चार होर्डिग पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातून दोन जणांना पोलिस व अग्नीशमन दलाने वाचविले होते. तर २२ जण बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले होते. त्यामुळे आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले आहेत.९ ते १२ जून दरम्यान महापालिका परिसरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. अतिवृष्टीत नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी महापालिका आयुक्तानी महापालिका अधिकारी आणि अन्य सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. ९ जूनपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्यात याव्यात. अतिवृष्टीच्या काळात तीन दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा प्रभाग अधिकाऱ्यांनी करुन ठेवावा, जेणेकरुन अतिवृष्टीच्या काळात रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा फटका व त्रस रुग्णांना सहन करावा लागू नये. जनरेटरची पर्यायी व्यवस्था सुरळीत ठेवावा यासाठी डिझेलचा पुरेसा साठा हवा. महानगरपालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा सतत चालू राहणे आवश्यक असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात रिस्टोरेशनची व्यवस्था करणो बाबतच्या सूचना आयुक्तांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या.झाडे छाटण्याची कामे करण्यात यावी

जिथे जुनी झाडे पडण्याची शक्यता आहे.  अशी झाडे अतिवृष्टीपूर्वीच छाटण्याची कामे करण्यात यावीत असे आदेश उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत. सखल भागात पाणी तुंबू नये यासाठी नाले व गटारं प्राधान्याने साफ करावीत. गोविंदवाडी सारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीने नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. या परिसरात म्हशीचे तबले जास्त आहेत. त्यामुळे त्याठिकाणचे तबले रिकामे करण्यात यावे. त्यातील म्हशींची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जावी. रहिवाशांच्या करिता संक्रमण शिबीरात व्यवस्था करावी. अतिवृष्टीच्या काळात तातडीच्या परिस्थितीसाठी परिवहन विभागाने बसेसची सुविधा नागरीकांसाठी सज्ज ठेवावी असे आदेश परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना दिले आहेत. सर्व विभागीय उपायुक्तांनी त्यांच्या प्रभागात भेट घेऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा असे आयुक्तांनी उपायुक्तांना बजावले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ