शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

केडीएमसी हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाका; आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2021 22:53 IST

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश.

ठळक मुद्देअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीसाठी देण्यात आले निर्देश.

कल्याण : कल्याण-अतिवृष्टीच्या काळात महापालिका हद्दीतील धोकादायक होर्डिग त्वरीत काढून टाकण्यात यावे असे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. तौक्ते वादळाचा फटका कल्याणला बसला होता. त्यावेळी कल्याण शीळ रस्त्यावर चार होर्डिग पडल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यातून दोन जणांना पोलिस व अग्नीशमन दलाने वाचविले होते. तर २२ जण बस चालकाच्या प्रसंगावधानामुळे बचावले होते. त्यामुळे आयुक्तांनी उपरोक्त आदेश दिले आहेत.९ ते १२ जून दरम्यान महापालिका परिसरात अतिवृष्टी होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. अतिवृष्टीत नागरीकांची गैरसोय टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील यासाठी महापालिका आयुक्तानी महापालिका अधिकारी आणि अन्य सरकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांसमवेत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्स घेतली. ९ जूनपासून चार दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने धोकादायक इमारती तातडीने रिकाम्या करण्यात याव्यात. अतिवृष्टीच्या काळात तीन दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा प्रभाग अधिकाऱ्यांनी करुन ठेवावा, जेणेकरुन अतिवृष्टीच्या काळात रुग्णालयांचा विद्युत पुरवठा खंडीत झाल्यास त्याचा फटका व त्रस रुग्णांना सहन करावा लागू नये. जनरेटरची पर्यायी व्यवस्था सुरळीत ठेवावा यासाठी डिझेलचा पुरेसा साठा हवा. महानगरपालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयात विद्युत पुरवठा सतत चालू राहणे आवश्यक असल्यामुळे अतिवृष्टीच्या काळात रिस्टोरेशनची व्यवस्था करणो बाबतच्या सूचना आयुक्तांनी महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना दिल्या.झाडे छाटण्याची कामे करण्यात यावी

जिथे जुनी झाडे पडण्याची शक्यता आहे.  अशी झाडे अतिवृष्टीपूर्वीच छाटण्याची कामे करण्यात यावीत असे आदेश उद्यान अधीक्षक संजय जाधव यांना दिले आहेत. सखल भागात पाणी तुंबू नये यासाठी नाले व गटारं प्राधान्याने साफ करावीत. गोविंदवाडी सारख्या अतिसखल भागात अतिवृष्टीने नागरीकांच्या घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे. या परिसरात म्हशीचे तबले जास्त आहेत. त्यामुळे त्याठिकाणचे तबले रिकामे करण्यात यावे. त्यातील म्हशींची व्यवस्था अन्य ठिकाणी केली जावी. रहिवाशांच्या करिता संक्रमण शिबीरात व्यवस्था करावी. अतिवृष्टीच्या काळात तातडीच्या परिस्थितीसाठी परिवहन विभागाने बसेसची सुविधा नागरीकांसाठी सज्ज ठेवावी असे आदेश परिवहन विभागाचे उपायुक्त दीपक सावंत यांना दिले आहेत. सर्व विभागीय उपायुक्तांनी त्यांच्या प्रभागात भेट घेऊन एकंदर परिस्थितीचा आढावा घ्यावा असे आयुक्तांनी उपायुक्तांना बजावले आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीTauktae Cycloneतौत्के चक्रीवादळ