शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला; १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत नेणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:23 IST

शटल सेवा वाढली नाही

डोंबिवली : दिवा-सीएसटी लोकल सुरू न करणे, १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढणे आणि ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा न वाढवणे यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी व अपघात वाढले. रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र तोही मागे पडला.

लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना

डोंबिवलीत पलावा, कल्याण-शीळ रस्त्यावरील गृहसंकुल, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव पट्ट्यात झपाट्याने वाढते शहरीकरण याबाबत रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याने  समस्या वाढत आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन खा. आनंद परांजपे यांनी मध्य रेल्वेने कल्याणपर्यंत येणाऱ्या १५ डबा लोकल या बदलापूर, आसनगावपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड, दिल्ली यांनी मंजूर केला होता, मात्र २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्या विषयाला बगल दिली गेली. १५ डबा लोकलचा प्रस्ताव कागदावर राहिला. त्यामुळे दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील समस्या वाढत असल्याचे परांजपे म्हणाले.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कार्यालयीन कामाच्या वेळा बदलणे, कार्यालये स्थलांतर करणे असा प्रस्ताव दिला होता. सरकारी कार्यालयातील ज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशी खाती उशिरा सुरु करून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा व जी खाती, विभाग जनतेशी संबंधित आहेत त्यांची कामे सकाळी सुरु करावीत, असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव सरकारी व खासगी आस्थापनांनी स्वीकारला असता तर गर्दीचे नियोजन करता आले असते.

मुरबाड, कर्जत पट्ट्यात भरपूर जागा आहे. त्याचा विचार करण्याबाबत पर्याय प्रवासी संघटनांनी सुचवले होते. ते सगळे बासनात गुंडाळले गेले.