शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला; १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत नेणे गरजेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:23 IST

शटल सेवा वाढली नाही

डोंबिवली : दिवा-सीएसटी लोकल सुरू न करणे, १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढणे आणि ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा न वाढवणे यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी व अपघात वाढले. रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र तोही मागे पडला.

लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना

डोंबिवलीत पलावा, कल्याण-शीळ रस्त्यावरील गृहसंकुल, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव पट्ट्यात झपाट्याने वाढते शहरीकरण याबाबत रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याने  समस्या वाढत आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन खा. आनंद परांजपे यांनी मध्य रेल्वेने कल्याणपर्यंत येणाऱ्या १५ डबा लोकल या बदलापूर, आसनगावपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड, दिल्ली यांनी मंजूर केला होता, मात्र २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्या विषयाला बगल दिली गेली. १५ डबा लोकलचा प्रस्ताव कागदावर राहिला. त्यामुळे दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील समस्या वाढत असल्याचे परांजपे म्हणाले.

माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कार्यालयीन कामाच्या वेळा बदलणे, कार्यालये स्थलांतर करणे असा प्रस्ताव दिला होता. सरकारी कार्यालयातील ज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशी खाती उशिरा सुरु करून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा व जी खाती, विभाग जनतेशी संबंधित आहेत त्यांची कामे सकाळी सुरु करावीत, असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव सरकारी व खासगी आस्थापनांनी स्वीकारला असता तर गर्दीचे नियोजन करता आले असते.

मुरबाड, कर्जत पट्ट्यात भरपूर जागा आहे. त्याचा विचार करण्याबाबत पर्याय प्रवासी संघटनांनी सुचवले होते. ते सगळे बासनात गुंडाळले गेले.