शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Updated: March 3, 2024 19:46 IST

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कल्याण- आधीचे महाविकास आघाडीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे सरकार होते. मात्र आमचे सरकार हे सर्व सामन्यांचे अश्रू पुसणारे सरकार आहे अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कल्याण शीळ राेड लगत असलेल्या कोळेगावातील प्रिमियम ग्राऊंडवर आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरोक्त टिका केली.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री शंभराजे देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार किसन कथोरे, संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार रविंद्र फाटक आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की फेसबूक लाईव्ह करुन सरकार चालविता येते नाही. ग्राऊंडवर जाऊन काम करावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतात साचलेला चिखल तुडवित पाहणी करावी लागते. घरात बसून ते काम होत नाही. आमचे सरकार लोकाभिमुख आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून सरकारमधील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचला आहे. या आधीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याचे धाडस नव्हेत. एखाद्या प्रश्नावर आंदोलने होतात. 

तेव्हा त्यांना विश्वास द्यावा लागतो. दिलेला शब्द पाळावा लागतो. दिलेला शब्द पाळण्याचे आणि निर्णय घेण्याचे धाडस आमच्या सरकारने दाखविले आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्याला फायदा केंद्रात कोणताही पाठविलेला विकासाचा प्रस्ताव लगेच मंजूर होतो. त्याचा फायदा जनतेला व्हावा हाच आमच्या सरकारचा उद्देश आहे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या वैयक्तीक फायद्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. सामान्य जनतेच्या फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. मागील सरकारच्या अहंकारी वृत्तीमुळे रखडलेले प्रकल्प आमच्या सरकारने मार्गी लावले आहेत. 

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मोदी यांच्या सत्ता काळात देशातील गरीबी हटविण्याचे काम खऱ्या अर्थाने झाले असल्याची बाबही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केली. १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केली आहे. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा निर्णय लवकर घेऊन त्यांना मा्ेबदला दिला जाणार आहे. तसेच बदलापूर कांजूरमार्ग मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे या गोष्टीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वासित केल्या. खासदार शिंदे म्हणाले आपल्या सरकारच्या काळात एमएमआर रिजनला जास्तीत जास्त विकास निधी मिळाला असल्याने हजोरो कोटीची विकास कामे सुरु आहेत.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते डोंबिवलीतील सुतिका गृह आणि कर्कराेग रुग्णालय, डोंबिवली पश्चिमेतील फिश मार्केट आणि कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा उपस्थितांना मोबाईल टॉर्च पेटवून त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ वाटप करण्यात आला.

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे