शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

आधीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे; मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By मुरलीधर भवार | Updated: March 3, 2024 19:46 IST

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कल्याण- आधीचे महाविकास आघाडीचे सरकार मगरीचे अश्रू ढाळणारे सरकार होते. मात्र आमचे सरकार हे सर्व सामन्यांचे अश्रू पुसणारे सरकार आहे अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. कल्याण शीळ राेड लगत असलेल्या कोळेगावातील प्रिमियम ग्राऊंडवर आज शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले होते. या प्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपरोक्त टिका केली.

या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री शंभराजे देसाई, खासदार श्रीकांत शिंदे, भाजप आमदार किसन कथोरे, संजय केळकर, कुमार आयलानी, निरंजन डावखरे, मनसे आमदार राजू पाटील, शिवसेना आमदार रविंद्र फाटक आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की फेसबूक लाईव्ह करुन सरकार चालविता येते नाही. ग्राऊंडवर जाऊन काम करावे लागते. शेतकऱ्यांच्या शेतात साचलेला चिखल तुडवित पाहणी करावी लागते. घरात बसून ते काम होत नाही. आमचे सरकार लोकाभिमुख आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून सरकारमधील प्रत्येक अधिकारी कर्मचारी हा लाभार्थ्यांच्या घरापर्यंत पोहचला आहे. या आधीच्या सरकारमध्ये निर्णय घेण्याचे धाडस नव्हेत. एखाद्या प्रश्नावर आंदोलने होतात. 

तेव्हा त्यांना विश्वास द्यावा लागतो. दिलेला शब्द पाळावा लागतो. दिलेला शब्द पाळण्याचे आणि निर्णय घेण्याचे धाडस आमच्या सरकारने दाखविले आहे. राज्यात डबल इंजिनचे सरकार आहे. त्याला फायदा केंद्रात कोणताही पाठविलेला विकासाचा प्रस्ताव लगेच मंजूर होतो. त्याचा फायदा जनतेला व्हावा हाच आमच्या सरकारचा उद्देश आहे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या वैयक्तीक फायद्यासाठी आम्ही निर्णय घेतलेला नाही. सामान्य जनतेच्या फायद्यासाठी निर्णय घेतले आहेत. मागील सरकारच्या अहंकारी वृत्तीमुळे रखडलेले प्रकल्प आमच्या सरकारने मार्गी लावले आहेत. 

देशाच्या विकासात महाराष्ट्र राज्याचा माेठा वाटा असल्याने महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. मोदी यांच्या सत्ता काळात देशातील गरीबी हटविण्याचे काम खऱ्या अर्थाने झाले असल्याची बाबही मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केली. १४ गावे नवी मुंबईत समाविष्ट केली आहे. तसेच कल्याण शीळ रस्ते बाधितांच्या मोबदल्याचा निर्णय लवकर घेऊन त्यांना मा्ेबदला दिला जाणार आहे. तसेच बदलापूर कांजूरमार्ग मेट्रोचे काम हाती घेतले जाणार आहे या गोष्टीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी आश्वासित केल्या. खासदार शिंदे म्हणाले आपल्या सरकारच्या काळात एमएमआर रिजनला जास्तीत जास्त विकास निधी मिळाला असल्याने हजोरो कोटीची विकास कामे सुरु आहेत.

मुख्यमंत्र्याच्या हस्ते डोंबिवलीतील सुतिका गृह आणि कर्कराेग रुग्णालय, डोंबिवली पश्चिमेतील फिश मार्केट आणि कल्याण तळोजा मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. मुख्यमंत्री शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या ठिकाणी आले तेव्हा उपस्थितांना मोबाईल टॉर्च पेटवून त्यांचे जोरदार स्वागत केले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध योजनाचा लाभ वाटप करण्यात आला.

टॅग्स :kalyanकल्याणEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरे